मुख्य सामग्रीवर वगळा

अवकाळी पावसाने व पुराने नुकसानग्रस्त पिकांचे व मालमत्तांचे पंचनामे करून भरपाई द्यावी- हर्षवर्धन पाटील


इंदापूर : 
                           इंदापूर तालुक्यामध्ये रविवारी (दि.25) झालेल्या ढगफुटीसदृश अवकाळी पावसाने शेती पिकांचे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच नीरा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे, फळबागांचे व मालमत्तांचे तात्काळ पंचनामे सुरु करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.25) केली. या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याशी रविवारी संपर्क साधून चर्चा केली.
       हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यातील भिगवण, सणसर परिसरातील सुमारे 12 ते 15 गावांना या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये जांब, कुरवली, चिखली, सणसर, उद्धट, लाकडी, निंबोडी, शेटफळ गढे, मदनवाडी, भिगवण, भिगवन स्टेशन आदी गावांसह आणि निरा नदीकाठच्या पूरग्रस्त गावांचा समावेश आहे. या सर्व परिसरातील नागरिकांच्या राहत्या घरांमध्ये पाणी शिरल्याने सुमारे 200 ते 250 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. 
            ढगफुटीसदृश अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेती पिके, फळबागा, घरे व मालमत्तांचे पंचनामे हे कृषी, महसूल, ग्रामविकास खात्याने तातडीने पूर्ण करावेत, एकही शेतकरी पंचनाम्या पासून वंचित राहू नये, अशी सूचनाही हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
       ते पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस द्राक्षे, डाळिंब, केळी, पेरू आदी या फळबागांचे तसेच मका, कांदा, भुईमूग, चारा पिकांसह शेतातील इतर सर्व उभ्या पिकांचे नुकसान झालेले आहे. तसेच ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक गावातील शेतातील माती वाहून गेली आहे, तसेच पशुधनाचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे सरकारने विना विलंब पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
      सदरच्या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवरील पुलांची हानी झाली आहे, त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. तसेच शेतातील अनेक ठिकाणची माती वाहून गेली आहे, त्याचप्रमाणे पशुधनाचे नुकसान झाले आहे. या सर्वांचेही पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. दरम्यान, नीरा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांमधील लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. तसेच जनतेला काही अडचण आल्यास माझ्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
_____________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते