मुख्य सामग्रीवर वगळा

१० वी,१२वी बोर्ड परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये आयोजन

इंदापूर:- जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचालित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी मध्ये दिनांक 16 मे 2025 रोजी इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला. त्यासाठी इंदापूर तालुक्यातील 63 शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला . प्रत्येक विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक आलेल्या एकूण 189 विद्यार्थ्यांचा, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
विद्येची आराध्य देवता सरस्वती पूजनाने व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संस्थेतील कु.ज्ञानेश्वरी नाथाजी मोहिते व कु.मृण्मयी अतुल शिंदे दोन विद्यार्थिनींनी तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला तसेच कु.ज्ञानेश्वरी नाथाजी मोहिते हिने गणित या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला, त्याबद्दल संस्थेच्या वतीने तिचे व इंदापूर तालुक्यातील यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक करण्यात आले. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज ढोले यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, संस्थेमध्ये तुम्हाला शहरापेक्षा जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील तसेच जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मोबाईलच्या आहारी न जाता आपले ध्येय साध्य करावे. मैदानी खेळ खेळावे पण मोबाईल सारख्या व्यसनापासून दूर राहावे असा मोलाचा सल्ला दिला, जिद्द चिकाटीच्या जोरावर यश संपादन करता येते. तसेच
संस्थेचे संस्थापक ,अध्यक्ष श्री. श्रीमंत ढोले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना तुम्ही रत्नाची खान आहात *यशस्वी भव! असे शुभ आशीर्वाद दिले.
प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरवावे व त्यानुसार योग्य तो मार्ग निवडावा. आपल्या परिसराचे नाव उज्वल करावे व देशाची व समाजाची सेवा करावी असे सांगितले तसेच संस्थेत गुणवंत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, जसे स्कॉलरशिप याविषयीचे मार्गदर्शन केले.
इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. सचिन खुडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की गुणगौरव समारंभ हा अभिमानाचा व कौतुकाचा, आनंदाचा क्षण आहे.
दहावी व बारावी मध्ये यश संपादन करणे एवढे सोपे नाही ,आणि त्यापेक्षाही तालुक्यात येणे सोपे नाही, स्पर्धेत टिकायचे असेल तर मानसिकता व गुणवत्ता महत्त्वाची आहे. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन बदलायला हवा तरच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो असे अनमोल मार्गदर्शन केले.
 यशस्वी विद्यार्थ्यांच्या उपस्थित पालकांनी ही आपले मनोगत व्यक्त केले व त्यांनी आपल्या पाल्याच्या मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे व मार्गदर्शक शिक्षकांचे आभार मानले,
गुणगौरव समारंभ कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्याचे इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी 
श्री. सचिन खुडे, जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष श्री. श्रीमंत ढोले, उपाध्यक्ष 
सौ. चित्रलेखा ढोले , 
सचिव श्री. हर्षवर्धन खाडे, सहसचिव सौ.पौर्णिमा खाडे, विश्वस्त श्री. पृथ्वीराज ढोले, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य
 श्री. गणेश पवार, 
प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य श्री.सम्राट खेडकर, यशस्वी विद्यार्थी, पालक,मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते