मुख्य सामग्रीवर वगळा

*प्रा.डॉ.भिमाजी भोर यांनी शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले -हर्षवर्धन पाटील*

 इंदापूर :- तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील कला शाखा प्रमुख व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. भिमाजी काशिबा भोर यांच्या सेवापुर्ती कार्यक्रमाचे व अर्थशास्त्र विभागातील माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन शाहीर अमर शेख सभागृह येथे करण्यात आले होते. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, प्रा. डॉ. भोर सर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
    हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रा.डॉ.भोर आणि त्यांच्या पत्नी कल्पना भोर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
      प्रा. डॉ. भिमाजी भोर यांनी सहकार्याच्या भावनेतून इंदापूर महाविद्यालयासाठी 30 मंच ( podium,dais) दिले.
   हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' नव्या पिढीने प्रा. डॉ. भोर सर यांचा आदर्श घ्यावा. भोर सर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. दृढ निश्चय करीत आपले शिक्षण पूर्ण केले तसेच शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. समाज अर्थ साक्षर होणे काळाची गरज असून भोर सर यांनी पुढे या क्षेत्रात प्रबोधन करावे.
   यावेळी संस्थेचे संचालक विलासराव वाघमोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी मनोगत व्यक्त केले.
  प्रा. डॉ.भिमाजी भोर सर म्हणाले की,' आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना 'तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार ' या वृत्तीतून संघर्ष करीत शिक्षण पूर्ण केले. मोठे भाऊ यांनी इंदापूर येथे अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन करण्याची संधी दिली. आपणा सर्वांच्या सहकार्याने विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून मी शिक्षण क्षेत्रात कार्य केले आहे.
    यावेळी संस्थेचे सचिव ॲड. मनोहर चौधरी , सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके , संचालक तुकाराम जाधव , गणपत भोंग , सुरेश मेहेर तसेच मेघ:शाम पाटील , धनंजय पाटील , प्रा. कृष्णाजी ताटे , विशाल बोंद्रे ,अंकुश पाडुळे , उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे,आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव लोंढे ,पारगाव वि.का.सो.चे चेअरमन रमेश बोत्रे , सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.हरिभाऊ भोर ,डॉ. राजाराम तांबे, ग्रामसेवक अनंथा तांबे , वळती वि.का. सो.चे चेअरमन नारायण भोर , डीआरडीओ चे संशोधक निवृत्ती वाळुंज , निवृत्ती मुळे , रामदास मस्के , सौरभ वाळुंज , हरिदास मस्के , संतोष भोर , डॉ. अनिल खरमाळे , चंद्रकांत भोर , दत्तात्रय सुर्वे , सामाजिक कार्यकर्ते निमेष पोटकर उपस्थित होते.
      अर्थशास्त्र विभागाचे प्रा. शाम सातारर्ले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
     विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर यांनी आभार मानले.
     प्रा. डॉ. भिमाजी भोर यांच्या सेवापूर्ती समारंभानिमित्त त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी यावेळी मोठ्या संख्येने समूदाय उपस्थित होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते