मुख्य सामग्रीवर वगळा

*डॉ. उषा भोईटे पवार यांचे अनुभूतींचे धागे दिल्लीत प्रकाशित*

 इंदापूर:-दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लुमेवाडी येथे कार्यरत असलेल्या निमगाव केतकीच्या डॉ. उषा भोईटे पवार यांच्या अनुभुतींचे धागे या ललित साहित्याचे प्रकाशन अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्य व साहित्यिक राजन लाखे यांच्या हस्ते २२फेब्रुवारी २०२५ रोजी झाला. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे रविंद्र बेडकिहाळ , अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्य डॉ. मनोज वराडे, गोमंतक साहित्य मंडळ गोवाचे कोषाध्यक्ष राजमोहन शेट्ये, आणि दिल्ली अखिल भारतीय साहित्य संमेलन काव्यकट्टा समन्वयक गोपाळ कांबळे हे उपस्थित होते.
      डॉ. उषा भोईटे पवार यांचे पहिलेच पुस्तक राजधानी दिल्लीत प्रकाशित झाले ही इंदापूर साठी अभिमानाची बाब आहे.त्यांचे हे पुस्तक शब्द शिवार प्रकाशनने प्रकाशित केले असून काजवाकार पोपट काळे यांनी प्रस्तावना दिली आहे. आजवर प्रकाशित व अप्रकाशित लेखांचा संग्रह म्हणजे अनुभुतींचे धागे हा ललित संग्रह आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असा काहीसा अनुभव या निमित्ताने आल्याचे डॉ. भोईटे यांनी सांगितले. या साहित्य संमेलनात बी.बी. सी. न्युज यांनी देखील डॉ. भोईटे यांना संमेलनाध्यक्ष डॉ.ताराबाई भवाळकर यांच्या भाषणाविषयी मत विचारले. अतिशय उत्साहात आणि दर्जेदार असे साहित्य संमेलन राजधानी दिल्ली येथे पार पडले.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक कवी,साहित्यीक, रसिक या साहित्य संमेलनासाठी आले होते. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले,स्वागताध्यक्ष पद्मविभूषण शरद पवार तर संमेलनाध्यक्ष डॉ. ताराबाई भवाळकर या होत्या.
      ७१ वर्षांनंतर राजधानी दिल्ली येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले. याच साहित्य संमेलनात पहिलेच पुस्तक प्रकाशित होण्याचा मान इंदापूर तालुक्यातील डॉ. उषा भोईटे यांना मिळाला असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.सध्या त्या लुमेवाडी येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.इंदापुर तालुक्यातील डाॅक्टरेट मिळविलेल्या प्रथम प्राथमिक शिक्षिका आहेत.आदिवासी शाळांतील मुलांसाठी त्यांनी अभ्यासक्रम करून दिलेबद्दल मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले होते.त्यांचे आजवर अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्या लेखिका, कवयित्री,व्याख्याता, इतिहास संशोधक आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...