मुख्य सामग्रीवर वगळा

*शिवाजीनगर, इंदापूर येथील सागर गोविंद पिसे यांची महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक अभियंता पदी निवड.*

इंदापूर:- IBPS द्वारे घेतल्या जाणाऱ्या सहाय्यक अभियंता महापारेषण (ऊर्जा विभाग) पदासाठीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी या परीक्षा घेण्यात आल्या होत्या व रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी याचा निकाल जाहीर झाला. यामध्ये शिवाजीनगर इंदापूर येथील सागर गोविंद पिसे यांनी बाजी मारली आहे. 
अगदी गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या सागर गोविंद पिसे यांचे प्राथमिक शिक्षण बेडशिंगे तर विद्यालयीन शिक्षण श्री हनुमान विद्यालय अवसरी तसेच शंभू महादेव विद्यालय दगडवाडी या ठिकाणी झाले असून, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण वर्धमान महाविद्यालय वालचंदनगर येथे पूर्ण करून पुढे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही पदवी इंदापूर येथील एस बी पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथून प्राप्त केली.
आई-वडील गोविंद पिसे आणि अनिता पिसे यांनी मोलमजुरी करून आपल्या मुलांना शिकवले. पदवीनंतरच्या शिक्षणानंतर सागर याने पुणे येथे अभ्यास करत स्वतःचा खर्च भागवण्यासाठी Zomato पार्सल बॉय म्हणून काम केले. दिवसभर अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून नंतर झोमॅटो चे पार्सल पुरवण्याचे काम सागर करत असे. निकाल जाहीर झाला त्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफीसाठीची क्रिकेट मॅच असल्यामुळे त्या दिवशी मॅच पाहण्यासाठी त्याने सुट्टी घेतली होती. या मॅचमध्ये भारतीय संघाने पाकिस्तान संघाला हरवून विजय प्राप्त केला व त्याच वेळी रात्री साडेदहा वाजता सागरचा मित्र धावत त्याच्या रूमवर आला आणि म्हणाला सागर सर तुम्ही साहेब झाला आणि लागलेला निकाल दाखवला. यावेळी मात्र सागरने ही त्याच्या आतापर्यंतच्या अपयशांना हरवून विजय प्राप्त केला होता आणि नकळत डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. प्रतिकूल परिस्थितीची जाणीव, कसलेही आर्थिक पाठबळ नसताना घेतलेले कष्ट, जिद्द व चिकाटीच्या जोरावर रात्रंदिवस केलेला अभ्यास यामुळे सागर इथपर्यंत पोहचला आहे. गरिबी आणि प्रतिकूल परिस्थितींचा सामना करत हे यश प्राप्त केल्यामुळे सागरचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...