मुख्य सामग्रीवर वगळा

*उप प्रादेशिक कार्यालयामार्फत बारामती, इंदापूर व दौंड तालुक्यात रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती*

पुणे,: उप प्रादेशिक कार्यालयामार्फत आयोजित 'बारामती रस्ता सुरक्षा अभियान-२०२५' अंतर्गत बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यात रस्ते सुरक्षाबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली.

इंदापूर बसस्थानक येथे प्रवाशी, बसचालकांना रस्ता सुरक्षा नियम तसेच बसमधून प्रवास करतांना घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बसस्थानका बाहेर रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली.दौंड येथे अनुज्ञप्ती चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये रस्ता सुरक्षानियमाविषयक जनजागृती करण्यात आली.


उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती व इंदापूर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर येथे विद्यार्थ्याना रस्ता सुरक्षा अभियनांतर्गत वाहतुकीचे नियम तसेच अपघाताची प्रमुख कारणे आणि सुरक्षात्मक उपाययोजनांबाबत प्रबोधन करण्यात आले. अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूलयेथे 'रस्ता सुरक्षा काळाची गरज' या विषयी मार्गदर्शन करून रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा घेण्यात आली. डॉ.हर्षल राठी डोळ्यांचा दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने खाजगी प्रवासी, शाळा बस चालकांचे नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.

विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा बारामती येथे शालेय विद्यार्थ्याना रस्त्यावर चालतांना घ्यावयाची काळजी, वाहतुकीच्या नियमाबद्दल महिती देण्यात आली.
कै. ग.भि देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बारामती येथे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजित करण्यात आले.


रयत शिक्षण संस्था आर एन अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्यूनियर कॉलेज बारामती येथे शालेय विद्यार्थ्यासाठी 'वॉक ऑन राईट' मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा विषयक नियमांची माहिती देवून माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...