मुख्य सामग्रीवर वगळा

*मलिदा गॅंग हटाव इंदापूर तालुका बचाव - अंकिता पाटील ठाकरे*

 व्याहळी येथून अंकिता पाटील ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ
इंदापूर तालुक्यात गेल्या दहा वर्षांमध्ये बेरोजगार युवक, महिला यांच्या हाताला काम प्रयत्न झालेला नाही. तसेच दूरदृष्टीच्या नेतृत्वाअभावी तालुका हा सर्वांगीण विकासा कामांमध्ये पिछाडीवर गेला आहे. सध्या तालुक्यात फक्त मलिदा गँगच्या ठराविक लोकांचा विकास झाला आहे. त्यामुळे विकासाची निकृष्ट कामे करणारी मलिदा गॅंग हटवून इंदापूर तालुका बचावची गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी व्याहळी (ता. इंदापूर) येथे जनसंवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी रविवारी (दि.13) केले.
        अंकिता पाटील ठाकरे यांच्या इंदापर तालुक्यातील जनसंवाद यात्रेचा शुभारंभ व्याहळी येथील भैरवनाथ मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी मलिदा गॅंग हटाव इंदापूर बचाव चा नारा दिला. या जनसंवाद यात्रेमध्ये अंकिता पाटील ठाकरे तालुक्यातील जनतेशी गावोगावी संवाद साधणार आहे. 
             इंदापूर तालुक्यात 5500 कोटींच्या विकास झाला आहे असे सांगितले जाते, परंतु जनतेला तर विकास दिसत नाही, मग विकासाचा निधी गेला कुठे, असा सवाल करून अंकिता पाटील ठाकरे पुढे म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील यांनी आणलेल्या लोणी देवकर येथील पंचतारांकित एमआयडीसी मध्ये आपणास नवीन उद्योगधंदे आणायचे आहेस. शेती, सिंचन, आरोग्य, शिक्षण आदि क्षेत्राच्या विकासासाठी आपणास काम करायचे आहे, त्यासाठी हर्षवर्धन पाटील यांना विधिमंडळात पाठविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांनी घेतला आहे. खा. सुप्रिया सुळे आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे निवडणूकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणणेसाठी हर्षवर्धनभाऊ पाटील यांना साथ द्यावी, असे आवाहन अंकिता पाटील ठाकरे यांनी यावेळी केले.
    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष सागरबाबा मिसाळ यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आणणेसाठी व राष्ट्रीय नेते खा.शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांचे हात मजबूत करणेसाठी हर्षवर्धनभाऊ पाटील यांना विधानसभेत विकमी बहुमताने पाठवा, असे आवाहनही सागरबाबा मिसाळ यांनी भाषणात केले.
     प्रास्ताविक व्याहळी विकास सोसायटीचे माजी चेअरमन डी. के. गोळे यांनी केले. यावेळी इंदापूर तालुका महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर, अँड. आशुतोष भोसले, राजेंद्र पवार, पै. कांतीलाल जाधव, अतुल वाघमोडे, बबलू पठाण, विकास चितारे आदींनी मनोगते व्यक्त केली. या जनसंवाद यात्रा शुभारंभ कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार वाल्मिकी शिंदे यांनी मानले.

चौकट:-
 सर्व महापुरुषांच्या व
इंदापूर येथील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास व
 इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते, कर्मयोगी शंकररावजी पाटील (भाऊ) यांच्या पुतळ्यास अंकिता पाटील ठाकरे यांनी रविवारी सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व त्यानंतर परंपरेप्रमाणे व्याहळी येथील भैरवनाथ मंदिर येथे नारळ फोडून अंकिता पाटील ठाकरे यांनी जनसंवाद यात्रेचा शुभारंभ केला. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...