मुख्य सामग्रीवर वगळा

*मलिदा गॅंग हटाव इंदापूर तालुका बचाव - अंकिता पाटील ठाकरे*

 व्याहळी येथून अंकिता पाटील ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ
इंदापूर तालुक्यात गेल्या दहा वर्षांमध्ये बेरोजगार युवक, महिला यांच्या हाताला काम प्रयत्न झालेला नाही. तसेच दूरदृष्टीच्या नेतृत्वाअभावी तालुका हा सर्वांगीण विकासा कामांमध्ये पिछाडीवर गेला आहे. सध्या तालुक्यात फक्त मलिदा गँगच्या ठराविक लोकांचा विकास झाला आहे. त्यामुळे विकासाची निकृष्ट कामे करणारी मलिदा गॅंग हटवून इंदापूर तालुका बचावची गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी व्याहळी (ता. इंदापूर) येथे जनसंवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी रविवारी (दि.13) केले.
        अंकिता पाटील ठाकरे यांच्या इंदापर तालुक्यातील जनसंवाद यात्रेचा शुभारंभ व्याहळी येथील भैरवनाथ मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी मलिदा गॅंग हटाव इंदापूर बचाव चा नारा दिला. या जनसंवाद यात्रेमध्ये अंकिता पाटील ठाकरे तालुक्यातील जनतेशी गावोगावी संवाद साधणार आहे. 
             इंदापूर तालुक्यात 5500 कोटींच्या विकास झाला आहे असे सांगितले जाते, परंतु जनतेला तर विकास दिसत नाही, मग विकासाचा निधी गेला कुठे, असा सवाल करून अंकिता पाटील ठाकरे पुढे म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील यांनी आणलेल्या लोणी देवकर येथील पंचतारांकित एमआयडीसी मध्ये आपणास नवीन उद्योगधंदे आणायचे आहेस. शेती, सिंचन, आरोग्य, शिक्षण आदि क्षेत्राच्या विकासासाठी आपणास काम करायचे आहे, त्यासाठी हर्षवर्धन पाटील यांना विधिमंडळात पाठविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांनी घेतला आहे. खा. सुप्रिया सुळे आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे निवडणूकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणणेसाठी हर्षवर्धनभाऊ पाटील यांना साथ द्यावी, असे आवाहन अंकिता पाटील ठाकरे यांनी यावेळी केले.
    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष सागरबाबा मिसाळ यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आणणेसाठी व राष्ट्रीय नेते खा.शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांचे हात मजबूत करणेसाठी हर्षवर्धनभाऊ पाटील यांना विधानसभेत विकमी बहुमताने पाठवा, असे आवाहनही सागरबाबा मिसाळ यांनी भाषणात केले.
     प्रास्ताविक व्याहळी विकास सोसायटीचे माजी चेअरमन डी. के. गोळे यांनी केले. यावेळी इंदापूर तालुका महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर, अँड. आशुतोष भोसले, राजेंद्र पवार, पै. कांतीलाल जाधव, अतुल वाघमोडे, बबलू पठाण, विकास चितारे आदींनी मनोगते व्यक्त केली. या जनसंवाद यात्रा शुभारंभ कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार वाल्मिकी शिंदे यांनी मानले.

चौकट:-
 सर्व महापुरुषांच्या व
इंदापूर येथील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास व
 इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते, कर्मयोगी शंकररावजी पाटील (भाऊ) यांच्या पुतळ्यास अंकिता पाटील ठाकरे यांनी रविवारी सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व त्यानंतर परंपरेप्रमाणे व्याहळी येथील भैरवनाथ मंदिर येथे नारळ फोडून अंकिता पाटील ठाकरे यांनी जनसंवाद यात्रेचा शुभारंभ केला. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...