मुख्य सामग्रीवर वगळा

*कर्मयोगी शंकररावजी पाटील व नीरा भीमा कारखान्याकडून रु. 200 प्रमाणे ऊस बिलाचा हप्ता बँकेत वर्ग -राजवर्धन पाटील व लालासाहेब पवार यांची माहिती*

इंदापूर : प्रतिनिधी दि.21/10/24
             इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर (बिजवडी ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून गळीत हंगाम सन 2023-24 साठी ऊस बिलाचा दिवाळीसाठी प्रति टन रु. 200 प्रमाणे हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज मंगळवारी (दि.21) वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील व निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी इंदापूर येथे मंगळवारी (दि.21) दिली.
       माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली हे दोन्ही कारखाने उत्कृष्टरित्या कार्यरत आहेत. या दोन्ही कारखान्यांनी यापूर्वी शेतकऱ्यांना रु. 2700 प्रमाणे ऊस बिलाची रक्कम वेळेवरती अदा केलेली आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भिमा कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना ऊस बिलाचा दिपावलीसाठी रु.200 प्रमाणे हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती राजवर्धन पाटील व लालासाहेब पवार यांनी दिली.
     तसेच या दोन्ही कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून दिवाळीसाठी देण्यात येणार आहे. आगामी सन 2024-25 च्या गळीत हंगामासाठी दोन्ही कारखाने सज्ज झाले आहेत. आगामी गळीत हंगाम यशस्वी करणेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही याप्रसंगी त्यांनी केले.
  या दोन्ही कारखान्यांमध्ये कामगारांचे पगार नियमितपणे होत आहेत, मात्र गैरसमज निर्माण केला जातो, कारखान्याचे बदनामी केली जात आहे. कारखान्या संदर्भात चुकीच्या गोष्टी करू नका, या संस्था शेतकऱ्यांच्या आहेत, असे आवाहन यावेळी राजवर्धन पाटील यांनी केले. याप्रसंगी नीरा भीमा कारखान्याचे संचालक विलासराव  वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दोन्ही कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक उपस्थित होते.
----------------------------------------
विद्यमान लोकप्रतिनिधीकडे दुग्धविकास खाते होते, तरीही त्यांनी तालुक्यामध्ये दुध डेअरी का काढली नाही? 10 वर्षाच्या काळात त्यांनी  सहकारी संस्था का निर्माण केल्या नाहीत? तसेच 10 वर्षात एकही शाळा-महाविद्यालय का काढले नाही? विद्यमान लोकप्रतिनिधी संचालक असलेल्या छत्रपती कारखान्याची 2 वर्षे वार्षिक सर्वसाधारण सभा का घेतली नाही? छत्रपती कारखान्याच्या सध्याच्या संचालक मंडळाला 10 वर्षे होत आली तरीही निवडणूक का घेत नाहीत? या सर्व प्रश्नांची उत्तरे विरोधक का देत नाहीत, असा सवाल राजवर्धन पाटील यांनी टीका करण्याचा अधिकार विरोधकांना आहे का? केला. इंदापूर तालुक्यात अनेक सहकारी संस्था निर्माण करून, त्याद्वारे रोजगार निर्माण करून, सतत येणाऱ्या विविध अडचणीवर मात करून  संस्था यशस्वीपणे चालविण्यासाठी हिम्मत लागते, ती हिंमत फक्त हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आहे. हर्षवर्धन पाटील यांनी कष्ट घेऊन, सतत वेळ देऊन, त्रास सहन करून, जिद्दीने व मेहनतीने उभारलेल्या संस्थांवर राजकीय स्वार्थासाठी टीका करणे सोपे असते, असा टोला राजवर्धन पाटील यांनी विरोधकांना लागावला.
----------------------------------
कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भीमा कारखाने चांगल्या पद्धतीने चालत आहेत. ऊस बिले वेळेवर अदा केली आहेत. कर्मचाऱ्यांचे नियमित पगार होत आहेत. मात्र ज्यांना संस्था काढून रोजगार देण्याचे माहित नाही, तेच कर्मचाऱ्यांच्या पगारा संदर्भात गैरसमज पसरवत आहेत. या चांगल्या चालत असलेल्या दोन्ही  संस्था आगामी काळात निश्चितपणे महाराष्ट्रात नावारूपास येतील, असा विश्वास यावेळी बोलताना निरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते