मुख्य सामग्रीवर वगळा

*अल्पसंख्यांक विभाग इंदापूरच्या वतीने लहान मुलांना बिस्किट आणि मिठाईची वाटप-अहेमद रजा सय्यद*


इंदापूर:- सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा जशने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त निघणाऱ्या जुलूस मध्ये आझम फाउंडेशन इंदापूर आणि राष्ट्रवादी काँग्रस पार्टी अल्पसंख्यांक विभाग इंदापूरच्या वतीने लहान मुलांना बिस्किट आणि मिठाईची वाटप इंदापूर नगरीचे मा. नगराध्यक्ष विठ्ठलराव (आप्पा)ननवरे, समाजसेवक प्रा. अशोक मखरे सर, मा. नगरसेवक दादासाहेब सोनवणे, राष्ट्रवादी इंदापूर शहर युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक इंदापूर शहराध्यक्ष अहेमदरजा (तशुभाई) सय्यद मा. नगरसेवक अँड मा. नगरसेवक इब्राहिम (बाबा) शेख गिरीशजी शहा, मौलाना हाजी हाफिज अब्दुल करीम मुशाहिद, आझादभाई पठाण, अँड फिरोजभाई सय्यद, अलीभाई मोमीन, आझम फाउंडेशन इंदापूरचे सदस्य सुभाषशेठ ननवरे, अँड आनंदजी केकान, शरीफभाई शेख, जुबेरभाई सय्यद, आशपाकभाई शेख, मोरे महाराज, मुन्नाभाई बागवान, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मखरे, शाहरुखभाई कुरेशी, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व धर्मीय नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. *कार्यक्रमाचे आयोजन आझम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अहेमदरजा (तशुभाई) सय्यद आणि उपाध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी केले होते या वेळी बोलताना अहेमद रजा सय्यद म्हणाले की,या दिवशी रात्रभर अल्लाहचे पठण केले जाते. पवित्र कुराण घरे आणि मशिदींमध्ये वाचले जाते. ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने सर्वत्र मिरवणुका काढण्यात येतात. मशिदीमध्ये नमाज पडण्यात येतात, त्याचवेळी पैगंबरांचा संदेशाचा सर्वत्र प्रसार करण्यात येतो. आजच्या दिवशी गरिबांमध्ये अन्नाचे दान केलं जातं. ईद मिलाद उन नबीच्या दिवशी प्रार्थना आणि संदेश वाचण्याबरोबरच गरीबांना देणगी देखील दिली जाते. त्यांना जेवण दिले जाते. या दिवशी जे लोक मशिदीत जाऊ शकत नाहीत, ते त्यांच्या घरी कुराण पठण करतात. इस्लाममध्ये असा विश्वास आहे की ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या दिवशी कुराण पठण केल्याने अल्लाहची दया येते आसे मत सय्यद यांनी व्यक्त केले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...