मुख्य सामग्रीवर वगळा

*ग्रामपंचायती व शाळांनी शालेय गड किल्ले बनविण्याच्या स्पर्धेत सहभाग घ्यावा- डॉ. सुहास दिवसे यांचे आवाहन*

पुणे, दि. १५ :  गड किल्ले जागतिक वारसा स्थळ नामांकन जनजागृती मोहिमेत ग्रामपंचायत, शाळा यांना  सहभागी करुन घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शालेय गड किल्ले बनविणे स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात येणार असून जिल्ह्यातील ग्रामपंचायत व शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. या स्पर्धेत गडकिल्ल्यांची आकर्षक, ऐतिहासिक दृष्टीकोनातून तयार केलेली प्रतिकृती, गाव व शाळा स्तरावर गडकिल्ले यांचे जतन, संवर्धन व स्वच्छता बाबत राबविण्यात येणारे अभिनव उपक्रम व कार्यक्रम, माहितीपट, पारंपरिक नाणी, शस्त्र, भांडी आदी संग्रहाचे प्रदर्शन, ग्रामपंचायत अथवा शाळेमध्ये उपलब्ध असणारे शिवचरित्र, गडकिल्ले, मराठा साम्राज्याशी ऐतिहासिक व संदर्भिय साहित्य, गावस्तरावर घेण्यात आलेल्या शिवचरित्र, गडकिल्ले, ऐतिहासिक व संदर्भिय स्पर्धा, व्याख्याने, गावामध्ये शिवकालीन पारंपारिक साहसी खेळांच्या स्पर्धा, प्रदर्शन, लुप्त होणाऱ्या कलाविष्कारांचे संवर्धन आदी विषय समाविष्ट करण्यात आले आहेत.
जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक विजेत्यास ५ लाख, द्वितीय क्रमांकास २ लाख ५० हजार तर तृतीय क्रमांकास १ लाख २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. याव्यतिरिक्त उत्कृष्ट पद्धतीने सहभागी होणाऱ्या ५ गावांनादेखील जनसुविधा, नागरी सुविधा या योजनांतर्गत प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. 
तालुकास्तरीय प्रथम क्रमांक विजेत्यास १ लाख, द्वितीय क्रमांकास ५० हजार तर तृतीय क्रमांकास २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. याशिवाय उत्कृष्ट पद्धतीने सहभागी होणाऱ्या ५ गावांना जनसुविधा, नागरी सुविधा या योजनांतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येईल.
स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी, स्पर्धेचे परिपूर्ण अर्ज संबंधितांनी जिल्ह्यातील तहसीलदार, गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात १८ ते १९ सप्टेंबरपर्यंत सादर करावेत. 
अधिक माहितीसाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयातील गटशिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते