मुख्य सामग्रीवर वगळा

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये भव्य आंतरशालेय, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.*


जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,
 प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेच्या उपाध्यक्षा मा.सौ.चित्रलेखा ढोले मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त JBVP चषक, भव्य आंतरशालेय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
 *ही स्पर्धा दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे.*
स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून या स्पर्धेद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांचे उज्वल भविष्य घडावे, आदर्श पिढी निर्माण व्हावी, उत्तम वक्ता हा शालेय जीवनापासूनच घडत असतो म्हणूनच या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
*स्पर्धेची विभागणी तीन गटांमध्ये करण्यात आलेली आहे.*

*लहान गट* इयत्ता पहिली ते चौथी
*विषय*-1)सांग सांग भोलानाथ आईचा मोबाईल हरवेल काय?
2) मला घडवते माझी शाळा.
3 )माझी आई माझा गुरु.
4)संतांची शिकवण.

*मध्यम गट* इयत्ता पाचवी ते सातवी
*विषय*
1) शिवरायांची शिकवण. 
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण.
3) सुविधा नको संस्कार द्या. 
4) माझी सावित्री.

*मोठा गट* इयत्ता आठवी ते बारावी 
*विषय* 
1)देशभक्ती की धर्म भक्ती. 
2)हे विश्वचि माझे घर.
3)स्त्रियांना हवे काय?
3)हे जीवन सुंदर आहे.
*इत्यादी विषयावर गटानुसार स्पर्धा होणार असून विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, JBVP चषक, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांनाही आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येईल.*
*विजेत्यांना खालील प्रमाणे पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.*
*लहान गट* इयत्ता पहिली ते चौथी 
*प्रथम क्रमांक*-1001रु चषक व प्रमाणपत्र
*द्वितीय क्रमांक*-701रु चषक व प्रमाणपत्र
*तृतीय क्रमांक*-501रु चषक व प्रमाणपत्र
*उत्तेजनार्थ क्रमांक* 1)501 रु प्रमाणपत्र 
2)501रु व प्रमाणपत्र

*मध्यम गट* इयत्ता पाचवी ते सातवी
*प्रथम क्रमांक* 3001रु चषक व प्रमाणपत्र
*द्वितीय क्रमांक*- 2001रु चषक व प्रमाणपत्र
*तृतीय क्रमांक*- 1001रु चषक व प्रमाणपत्र
*उत्तेजनार्थ क्रमांक* 1)501रु प्रमाणपत्र 
2)501रु प्रमाणपत्र 

*मोठा गट* इयत्ता आठवी ते बारावी 
*प्रथम क्रमांक*-5001रु चषक व प्रमाणपत्र 
 *द्वितीय क्रमांक*- 3001रु चषक व प्रमाणपत्र
*तृतीय क्रमांक*- 2001रु चषक व प्रमाणपत्र
*उत्तेजनार्थ क्रमांक* 1)501रु प्रमाणपत्र 
2)501रु प्रमाणपत्र

*स्पर्धेमध्ये सहभाग विनामूल्य आहे. नाव नोंदणीसाठी दिनांक 4 ऑक्टोंबर दुपारी 2 वाजेपर्यंत 9860058081,9890137827 या क्रमांकावर संपर्क करावा.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते