मुख्य सामग्रीवर वगळा

*इंदापूर महाविद्यालयामध्ये वृक्षारोप व व्याख्यानाचे आयोजन करून राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा*

इंदापूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे 24 सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण व व्याख्यानाचे आयोजन करून हा राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला.
    सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे , विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी स्वयंसेवक कुमार शिंदे व आशिष माने उपस्थित होते. 
    अध्यक्ष मनोगत प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्य सर्वोत्कृष्ट चालू आहे व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन श्रमदान सामाजिक कार्य कसे करावे, यातून स्वतःची प्रगती, स्वतःचा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा होतो व भारताचा अतिशय सुजन नागरिक कसा बनतो आणि तो दुसऱ्याला बनवण्यास भाग पडतो यासंदर्भात मार्गदर्शन केले.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा. उत्तम माने यांनी केले. सदर प्रास्ताविकामध्ये राष्ट्रीय सेवा योजना केव्हा स्थापन झाली, राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास व चिन्ह आणि कर्तव्य या संदर्भामध्ये माहिती दिली. 
   या कार्यक्रमांमध्ये कुमार शिंदे व आशिष माने यांनी आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेतील कार्यकाळातील अनुभव कथन केले व आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कसे घडलो आणि इंदापूर महाविद्यालयाचे नाव हे विद्यापीठ आणि राज्य स्तरावर कसे पोहोचवले या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. 
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. साठे पी. व्ही. यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. मनीषा गायकवाड यांनी मानले.    
    कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. यानंतर महाविद्यालयाच्या बॉटनिकल गार्डन मध्ये मोहोगणी, चिंच, पिंपळ, बांबू सीताफळ, कडूलिंब अशा विविध प्रकारचे 200 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...