मुख्य सामग्रीवर वगळा

*कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखे -माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*


कर्मयोगी शंकररावजी पाटील ( भाऊ ) यांच्या 18व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ' एक पेड माँ के नाम ' या उपक्रमांतर्गत राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते 500 रोपांचे विद्यार्थ्यांना वाटप

    माजी खासदार श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या 18व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखे आहे.भाऊंचा 82 वर्षाचा आयुष्यातील प्रवास यशस्वी होता.
    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग , विद्यार्थी कल्याण मंडळ व राष्ट्रीय छात्रसेना आयोजित श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील ( भाऊ  ) यांच्या 18व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ' एक पेड माँ के नाम ' या उपक्रमांतर्गत राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते 500 रोपांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
    हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' भाऊंनी आपल्या कर्तुत्वाने आणि सर्वांच्या सहकार्याने इंदापूर तालुक्याचे नाव दिल्लीच्या संसदेपर्यंत नेले. भाऊ हे उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे ,दूरदृष्टीचे नेते होते. भाऊंनी पुढील 50 वर्षाचा दृष्टिकोन समोर ठेवून उजनी धरण तसेच कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना , शैक्षणिक संस्था , कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापना करून इंदापूर तालुक्याचा विकास केला. आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचे कार्य भाऊंनी केले.
     भाऊ असतानाचा काळ आणि नंतरचा काळ आपण सर्वांनी पाहिला. भाऊ नंतर ही सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर आली .गेल्या 18 वर्षांनंतर देखील खंबीरपणे भाऊंच्या मार्गदर्शनानुसार आपण ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत पुढे जात आहोत. अनेक अडचणी आल्या , राजकारणात अडथळे निर्माण केले गेले परंतु यातून मार्ग काढत आपण पुढे गेलो .नवीन पिढीने भाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे.
   यावेळी ॲड.राकेश शुक्ला यांनी आपले मनोगत व्यक्त केले.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. उत्तम माने यांनी ' एक पेड माँ के नाम '  या उपक्रमाचा उद्देश सांगितला.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भरत भुजबळ आणि श्याम सातार्ले यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...