मुख्य सामग्रीवर वगळा

*एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा!- चालु वर्षी नवीन ॲडमिशनचा 700 चा टप्पा पार*

इंदापूर : 
               शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित वनगळी (ता. इंदापूर) येथील एस बी पाटील महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी, डिप्लोमा व एमसीए अभ्यासक्रमासाठी चालू शैक्षणिक वर्ष सन 2024-25 साठी विद्यार्थी ॲडमिशनचा 700 चा टप्पा पार करून, शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
     चालू शैक्षणिक वर्षांमध्ये सर्वोत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रात्यक्षिकांवरती आधारित ज्ञान व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या माध्यमातून उच्चतम पगाराची नोकरी उपलब्ध करून देणे हे संस्थेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. 
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री मा. श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील मुलांना उच्च तंत्रशिक्षण क्षेत्रात सर्वोत्तम शिक्षण सोयी सुविधा निर्माण करू दिल्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना या संस्थेने जागतिक व्यासपीठ करून दिले आहे.
   एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सन 2009 पासून सुरू झाले. सध्या या महाविद्यालयामध्ये पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिलेले आहेत.
या महाविद्यालयामध्ये कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, माहिती तंत्रज्ञान आदी अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. 
या महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदे (नॅक ) कडून अ श्रेणी प्राप्त झाली आहे. या महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी, डिप्लोमा, एमसीएचे हजारो विद्यार्थी सध्या देश व परदेशात नामांकित कंपन्यांमध्ये उच्चपदावर काम करीत आहेत, 
    सदरच्या कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सचिव भाग्यश्री पाटील, उपाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, विश्वस्त राजवर्धन पाटील यांनी प्राचार्य, ॲकडमिक डीन, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.


शैक्षणिक वर्ष 2021 22 पासून या संस्थेने औषध निर्माण शास्त्रामधील डिप्लोमा व डिग्री अर्थात डी फार्म, बी फार्म याचे देखील आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रयोगशाळा, उत्तम शिक्षण देण्याची सुविधा निर्माण करून दिलेली आहे. याचा देखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या गुणवत्तेसाठी उपयोग करून घ्यावा, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...