मुख्य सामग्रीवर वगळा

*एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा!- चालु वर्षी नवीन ॲडमिशनचा 700 चा टप्पा पार*

इंदापूर : 
               शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित वनगळी (ता. इंदापूर) येथील एस बी पाटील महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी, डिप्लोमा व एमसीए अभ्यासक्रमासाठी चालू शैक्षणिक वर्ष सन 2024-25 साठी विद्यार्थी ॲडमिशनचा 700 चा टप्पा पार करून, शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
     चालू शैक्षणिक वर्षांमध्ये सर्वोत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रात्यक्षिकांवरती आधारित ज्ञान व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या माध्यमातून उच्चतम पगाराची नोकरी उपलब्ध करून देणे हे संस्थेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. 
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री मा. श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील मुलांना उच्च तंत्रशिक्षण क्षेत्रात सर्वोत्तम शिक्षण सोयी सुविधा निर्माण करू दिल्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना या संस्थेने जागतिक व्यासपीठ करून दिले आहे.
   एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सन 2009 पासून सुरू झाले. सध्या या महाविद्यालयामध्ये पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिलेले आहेत.
या महाविद्यालयामध्ये कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, माहिती तंत्रज्ञान आदी अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. 
या महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदे (नॅक ) कडून अ श्रेणी प्राप्त झाली आहे. या महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी, डिप्लोमा, एमसीएचे हजारो विद्यार्थी सध्या देश व परदेशात नामांकित कंपन्यांमध्ये उच्चपदावर काम करीत आहेत, 
    सदरच्या कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सचिव भाग्यश्री पाटील, उपाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, विश्वस्त राजवर्धन पाटील यांनी प्राचार्य, ॲकडमिक डीन, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.


शैक्षणिक वर्ष 2021 22 पासून या संस्थेने औषध निर्माण शास्त्रामधील डिप्लोमा व डिग्री अर्थात डी फार्म, बी फार्म याचे देखील आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रयोगशाळा, उत्तम शिक्षण देण्याची सुविधा निर्माण करून दिलेली आहे. याचा देखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या गुणवत्तेसाठी उपयोग करून घ्यावा, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते