मुख्य सामग्रीवर वगळा

*सेंटर ऑफ एक्सलन्स इन रोबोटिक्स ॲण्ड ऑटोमेशनचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन*

 

पुणे दि.१६: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि शासकीय तंत्रनिकेतन पुणेच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन रोबोटिक्स ॲण्ड ऑटोमेशनचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक स्तरावर मागणी येईल असे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शासकीय तंत्रनिकेतन येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार सिद्धार्थ शिरोळे, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ.प्रमोद नाईक, विभागीय सहसंचालक डॉ.दत्तात्रय जाधव, सचिव डॉ. महेंद्र चितलांगे, प्राचार्य डॉ.राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, उत्तमता वाढविल्याशिवाय देशातील मनुष्यबळ आणि उत्पादनाला जागतिक पातळीवर मागणी वाढणार नाही. त्यादृष्टीने शासकीय तंत्रनिकेतनच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे. शासकीय संस्थांनी उद्योगांसोबत सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. केंद्र सरकारही शासकीय तंत्रशिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी निधी देण्यास तयार आहे. त्यामुळे शासकीय तंत्रनिकेतन संस्थांनी नव्या कल्पना समोर आणाव्यात, त्यानुसार उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शासकीय तंत्रनिकेतन अधिक समृद्ध आणि परिपूर्ण करण्यावर शासनाचा भर आहे. जगभरात आज कुशल मनुष्यबळ आवश्यक असताना अशा संस्था उत्तमरीतीने चालविणे, तेथे सुविधा देणे गरजेचे आहे. म्हणून शासनाने अशी राज्यात तीन उत्कृष्टता केंद्र मंजूर केली असून त्यातील पहिले पुण्यात सुरू होत आहे. ४१ तंत्रनिकेतनमध्ये १ हजार ६०० विद्यार्थ्यांसाठी सीईटीची क्षमता वाढवून त्यासाठी संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत.

मुलींच्या शिक्षणाला शासन प्रोत्साहन देत असून त्यांना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत मुलींचे वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव दिल्यास त्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. पाटील म्हणाले.  

आमदार शिरोळे म्हणाले, शासकीय तंत्रनिकेतन इमारतीला ऐतिहासिक महत्त्व असून अशा इमारतीत पहिले उत्कृष्टता केंद्र स्थापित होण्याला वेगळे महत्व आहे. तंत्रनिकेतमध्ये अनुभवाधारीत शिक्षण मिळत असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणे महत्त्वाचे असते. शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत अशा सुविधा असल्याने जागतिक पातळीवर यश मिळविणारे विद्यार्थी संस्थेतून घडावेत, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ.नाईक म्हणाले, तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेले आणि उद्योगाचे आधुनिक तंत्रज्ञान असलेले अशा स्वरूपाचे हे पहिलेच उत्कृष्टता केंद्र आहे. उद्योगातील रोबोटिक्स तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध झाल्याने रोजगार मिळवून देण्यासाठी आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्राचार्य डॉ.पाटील यांनी प्रास्ताविकात सेंटर ऑफ एक्सलन्स इन रोबोटिक्स ॲण्ड ऑटोमेशन आणि शासकीय तंत्रनिकेतन विषयी माहिती दिली. 

यावेळी मंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते बहुउद्देशीय संगणक प्रयोगशाळेचेही उद्घाटन करण्यात आले.
0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...