मुख्य सामग्रीवर वगळा

इंदापूर शहर पिंजून काढत घर टू घर तुतारी चा प्रचार जोरदार तर लोकांचा उत्फुर्त प्रतिसाद-भरतशेठ शहा

इंदापूर:- बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रियाताई सुळे यांचा जनाधार वाढवण्यासाठी इंदापूर शहरातून नेते मंडळींनी नव्हे पण सामान्य कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे,नेते एकीकडे आणि मतदार एकीकडे आहे, राम कृष्ण हरी वाजवा तुतारी,ही सामान्य जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक विरोधकांना भारी पडल्याशिवाय राहणार नाही आणि इंदापूर शहरातून तीन हजार मतांनी सुप्रियाताई सुळे यांना लिड देऊ आसे भरतशेठ शहा म्हणाले, समोर कितीही मोठे नेते असले तरी मतदार व जनसामान्य माणसं हेच जाणता राजा शेतकऱ्यांचे कैवारी शरदचंद्र पवार यांची ताकद असून त्यांची कन्या सुप्रियाताई सुळे या इंदापूर तालुक्यातून लाखांच्या मतांनी पुन्हा खासदार होतील आसे भरतशेठ शहा म्हणाले,यावेळी बापूराव जामदार, शकिलभाई सय्यद,प्रमोद राऊत, श्रीकांत मखरे, समदभाई सय्यद,सुनिल तळेकर, अरबाज शेख,सह इतर मान्यवर उपस्थित होते. 
 आमच्याकडे कोणीही वरिष्ठ मोठा नेता नसला तरी आमच्याकडे मतदार मात्र तगडे आहेत आम्ही त्यांच्यापर्यंत घराघरात पोहोचून मतदान करण्यास त्यांना विनंती करून मतदान करण्यास सांगू ,सर्व इंदापूर करांनी तुतारी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे, आसे आवाहन इंदापूर चे दमदार नेतृत्व मा.भरतशेठ शहा यांनी केले आहे. या वेळी बोलताना भरतशेठ शहा म्हणाले की,राम कृष्ण हरी वाजवा तुतारी आसे ही ते म्हणाले,दुध दरवाढ नाही,दुष्काळ जाहीर नाही,दुष्काळ निधी नाही, पाणीटंचाई, जनावरांचा चाराप्रश्न,उजणी धरण रिकामं झाले,शेतकरी कर्जबाजारी झाले,बेरोजगारी वाढली,व्यापारी हतबल झाले,यावर कोणीच बोलत नाही,नेते मालामाल,जनता बेहाल,म्हणून आपण यावर आवाज उठवणाऱ्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांना निवडून देऊ आसे भरतशेठ शहा म्हणाले, त्यांनी इंदापूर शहरातील जैन मंदीर परिसरातून सुरूवात करून, आय काॅलेज परीसरात पाटील बंगला पर्यंत सर्व परीसर पिंजून काढत घर टू घर तुतारी चा प्रचार जोरदार करत आहेत त्यांना लोकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे,आसे मत बापूराव जामदार यांनी व्यक्त केले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...