मुख्य सामग्रीवर वगळा

*देवेंद्र फडणवीस व हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत इंदापूर च्या भाजप कार्यकर्त्यांची शुक्रवारी बैठक*


इंदापूर : प्रतिनिधी दि.27/3/24
                उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची मुंबईत शुक्रवारी (दि.29) उपमुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरती देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
                बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा ही महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे गेली आहे. इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून भाजप नेते व कार्यकर्त्यांना खालच्या पातळीवरील भाषेमध्ये बोलून मानहानीचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात इतर मुद्द्यांवरती भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी सागर बंगल्यावर चालू महिन्यात दि.20 व दि.25 मार्च रोजी याप्रमाणे 2 वेळा बैठक झाली आहे. या बैठकांना अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील हेही उपस्थित होते.
           बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सध्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिले. या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीमध्ये काटे की टक्कर लक्षात घेता, महायुतीचे नेते या मतदारसंघाकडे विशेष लक्ष देत आहेत. या मतदारसंघांमध्ये लोकसभेच्या सन 2004, 2009, 2014, 2019 या 4 ही निवडणुकांमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करीत विजयासाठी निर्णायक अशी किंगमेकर ची भूमिका बजावली आहे.
       भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे राज्याच्या राजकारणामध्ये संयमी नेते म्हणून ओळखले जात आहेत. इंदापूर विधानसभेच्या मागील 4 निवडणुकांमध्ये दिलेला शब्द पाळला गेला नाही, याची नाराजी इंदापूर तालुक्यातील गावोगावच्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या दिसून येत आहे. इंदापूर विधानसभेची जागा भाजपकडे असावी, अशी तीव्र मागणी भाजप  कार्यकर्त्यांमध्ये आहे. देशातील हाय व्होल्टेज लढत बारामतीत लोकसभा मतदारसंघांमध्ये होत असल्याने देवेंद्र फडणवीस व हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थित इंदापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या सदर बैठकीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...