मुख्य सामग्रीवर वगळा

*हर्षवर्धन पाटील यांना सागर बंगल्यावर बुधवारी बोलविल्याची चर्चा - देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन पाटील यांना कोणता शब्द देणार ?*

  इंदापूर:- बारामती लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी सुरु झालेली काटे की टक्कर लक्षात घेता, राज्यातील महायुतीचे जेष्ठ नेते या मतदारसंघाकडे विशेष लक्ष देत आहेत. या मतदारसंघांमध्ये लोकसभेच्या गेल्या 4 ही निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका बजावणारे माजी मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सागर बंगल्यावर बुधवारी दि.20 चर्चेसाठी बोलविल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात व मतदारसंघांमध्ये सध्या सुरू आहे. या चर्चेत देवेंद्र फडणवीस हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभे संदर्भात कोणता शब्द देतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
               भाजपचे जेष्ठ हर्षवर्धन पाटील हे राज्याच्या राजकारणामध्ये संयमी नेते म्हणून ओळखले जातात. बारामती लोकसभेच्या सन 2004, 2009, 2014, 2019 या चारही निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करीत किंगमेकर ची भूमिका बजावली. मात्र नंतर झालेल्या 4 ही वेळा झालेल्या इंदापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत दिलेला शब्द पाळला गेला नाही याची खंत त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. सलग 4 वेळा इंदापूर विधानसभेला फसविण्यात आल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली तीव्र नाराजी मुंबई-दिल्ली पर्यंत प्रसार माध्यमांद्वारे पोहचलेली आहे.
             देशातील सर्वात हाय व्होल्टेज लढत बारामतीत लोकसभा मतदार संघात होत असल्याने, महायुती व महाविकास आघाडीचे नेते मतदारसंघांमध्ये सूक्ष्म नियोजन करीत, कोठेही कमी पडणार नाही याची दक्षता घेत आहेत. या लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांची भूमिका निर्णय ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटत आहे. या पार्श्वभूमीवरती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी  भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या होणाऱ्या चर्चेकडे राज्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले.
-------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...