मुख्य सामग्रीवर वगळा

भांडगाव येथे भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यासाठी प्रयत्न - हर्षवर्धन पाटील

इंदापूर        भांडगाव-आलेगाव खुर्द येथे भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर जलसंपदाचे अधिकारी व संबंधितांची आठ दिवसात बैठक घेतली जाईल, तसेच जलसंपदा मंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडून या बंधार्‍याच्या मंजुरीसाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.11) दिली.
         भीमा नदी पात्रात भांडगाव (ता. इंदापूर )- आलेगाव खुर्द (ता. माढा) दरम्यान भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात यावा, या मागणीसाठी माढा तालुक्यातील आलेगाव खुर्द, रुई, गारअकोले तसेच इंदापूर तालुक्यातील भांडगाव, सुरवड, बावडा परिसरातील शेतकऱ्यांनी भीमा नदीपात्रात आलेगाव खर्द (ता. माढा ) हद्दीत गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले होते. या धरणे आंदोलनसंदर्भात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी प्रशासन व आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधून 
सोलापूर जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग, पालकमंत्री यांची बैठक घेऊन बंधारा बांधणे व इतर मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली. त्यानंतर प्रशासनाच्या विनंतीनुसार आंदोलनकर्त्यांनी सोमवारी (दि.11) आंदोलन मागे घेतले.
     सदर धरणे आंदोलन समाप्ती प्रसंगी माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे, टेभुर्णी चे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड. शरद जामदार, इंदापूर तालुका भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष राहुल पाटील, निरा भिमा कारखाना संचालक दादासाहेब घोगरे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, किसन जावळे, सुभाष गायकवाड, सुरवड-भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय घोगरे, अंकुश गायकवाड, तात्यासाहेब कोरटकर आदीसह शेतकरी उपस्थित होते. दरम्यान या धरणे आंदोलनास पाठिंबा दिल्याबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खा.सुप्रिया सुळे, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, अभिजित पाटील, रणजित शिंदे आदींचे आंदोलनकर्ते शेतकरी हरिभाऊ माने व सहकाऱ्यांनी आभार व्यक्त केले.
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 यावेळी धरणे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी टणू, भाटनिमगाव, शेवरे येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याने भरून घेण्याची मागणी केली. सदरची आंदोलनकर्त्यांची मागणी योग्य असून शासनाकडून मागणी मान्य करून घेऊ, असे हर्षवर्धन पाटील यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना नमूद केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...