मुख्य सामग्रीवर वगळा

भांडगाव येथे भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यासाठी प्रयत्न - हर्षवर्धन पाटील

इंदापूर        भांडगाव-आलेगाव खुर्द येथे भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर जलसंपदाचे अधिकारी व संबंधितांची आठ दिवसात बैठक घेतली जाईल, तसेच जलसंपदा मंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडून या बंधार्‍याच्या मंजुरीसाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.11) दिली.
         भीमा नदी पात्रात भांडगाव (ता. इंदापूर )- आलेगाव खुर्द (ता. माढा) दरम्यान भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात यावा, या मागणीसाठी माढा तालुक्यातील आलेगाव खुर्द, रुई, गारअकोले तसेच इंदापूर तालुक्यातील भांडगाव, सुरवड, बावडा परिसरातील शेतकऱ्यांनी भीमा नदीपात्रात आलेगाव खर्द (ता. माढा ) हद्दीत गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले होते. या धरणे आंदोलनसंदर्भात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी प्रशासन व आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधून 
सोलापूर जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग, पालकमंत्री यांची बैठक घेऊन बंधारा बांधणे व इतर मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली. त्यानंतर प्रशासनाच्या विनंतीनुसार आंदोलनकर्त्यांनी सोमवारी (दि.11) आंदोलन मागे घेतले.
     सदर धरणे आंदोलन समाप्ती प्रसंगी माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे, टेभुर्णी चे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड. शरद जामदार, इंदापूर तालुका भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष राहुल पाटील, निरा भिमा कारखाना संचालक दादासाहेब घोगरे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, किसन जावळे, सुभाष गायकवाड, सुरवड-भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय घोगरे, अंकुश गायकवाड, तात्यासाहेब कोरटकर आदीसह शेतकरी उपस्थित होते. दरम्यान या धरणे आंदोलनास पाठिंबा दिल्याबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खा.सुप्रिया सुळे, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, अभिजित पाटील, रणजित शिंदे आदींचे आंदोलनकर्ते शेतकरी हरिभाऊ माने व सहकाऱ्यांनी आभार व्यक्त केले.
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 यावेळी धरणे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी टणू, भाटनिमगाव, शेवरे येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याने भरून घेण्याची मागणी केली. सदरची आंदोलनकर्त्यांची मागणी योग्य असून शासनाकडून मागणी मान्य करून घेऊ, असे हर्षवर्धन पाटील यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना नमूद केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते