मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

साखरे वस्तीच्या शाळेत भरला आनंदी मेळावा आठवडे बाजार,या मुळे मुलांच्या अर्थिक ज्ञानात भर-सौ.अनिताताई नानासाहेब खरात 

 इंदापूर:- जि प शाळा साखरे वस्ती केंद्र रेडणी तालुका इंदापूर या ठिकाणी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता.
  या कार्यक्रमास साखरे वस्ती व परिसरातील नागरिक महिला पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी झाले,मेळावाचे उद्घाटन तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन अनिताताईंच्या हस्ते करण्यात आले.बाजारासाठी सर्व प्रकारचा भाजीपाला 
,खाऊ गल्ली, यांचीदुकाने लावली होती. बाजारामध्ये मुले आपला माल विकताना व्यवहारातील भाषा वापरत होते, विक्रेता व ग्राहक यांच्यामध्ये सुसंवाद होत
होता ,पालक आपल्या पाल्याकडून शेतीमाल विकत घेताना त्यांच्या चेहऱ्यावर अविस्मरणीय आनंद अनुभवल्यास मिळाला. या बाजारात मुले व्यवहारातील सुट्टी व बंदे पैसे याचा उत्तम वापर करताना दिसून आली. आजच्या बाजारामध्ये पालकांचा व ग्रामस्थांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता, या आठवडी बाजाराच्या उपक्रमाला ग्रामस्थांनी प्रतिसाद तर दिलाच पण कौतुक ही केले सदर बाजाराची उलाढाल चार हजार 4944 रुपये झाली. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षा अनिताताई म्हणाल्या की साखरे वस्ती शाळेमध्ये आजच्या आठवड्या बाजाराचे नियोजन अतिशय सुंदर केले, साखरे वस्ती शाळेत जाधव गुरुजी व वच्चे गुरुजी यांच्या माध्यमातून नेहमीच सहशालेय उपक्रम लहान मोठ्या स्पर्धा असे वेगवेगळे उपक्रम घेऊन जाधव गुरुजी व वच्चे गुरुजी अतिशय चांगल्या प्रमाणात शाळेचे नियोजन करत असतात, तसेच शाळेचा पट हळूहळू वाढत आहे आणि खरंच मराठी शाळेत मुलांना जे शिक्षण मिळते त्याला तोड नाही आणि म्हणूनच मराठी शाळेंना शासनाने जास्तीत जास्त मदत करून त्या उत्कृष्ट कशा चालतील याचे धोरण आखावे आम्ही तेजप्रुथ्वी ग्रुपच्या माध्यमातून मराठी शाळेच्या भल्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो मी जाधव गुरुजी,वच्चे गुरुजी तसेच अंगणवाडी सेविका कुंभार  व मुलानी  यांनी या आनंदी मेळाव्याचे अतिशय सुंदर नियोजन केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानते.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक जाधव गुरुजी यांनी शाळेच्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली.
तसेच शेवटी आभार प्रदर्शन करताना वच्चे गुरुजी म्हणाले की आम्ही शाळेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम घेत असतो अनिताताई याच शाळेच्या विद्यार्थिनी आहेत, त्या जरी आता इंदापूर मधे राहत असल्या तरी शाळेची सर्व छोट्या-मोठ्या गोष्टीची त्या आमच्याकडून नेहमी माहिती जाणून घेत असतात. त्यांचे शाळेला सर्व गोष्टीत खूप मोठे सहकार्य असते आम्हाला कधीही कसली अडचण आली तरी आम्ही अनिताताईंना हक्काने सांगतो. अनिताताई सारखे सामाजिक काम करण्यास इतरही महिलांनी पुढे यावे हीच आमची अपेक्षा आहे.
या आठवडी बाजारामध्ये जाधववस्ती शाळेचे विद्यार्थी व मनीषा आरडक  उपस्थित होत्या.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेशजी साखरे इंदापूरचे विशाल म्हेत्रे तसेच ग्रामस्थ खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते