मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर:- भारतरत्न डॉक्टर ए .पी .जे.  अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जूनियर कॉलेज मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत लेखक महादेव चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले. ते विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांची चार पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. या निमित्ताने वाचनाचे महत्त्व पटवून देताना चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर राहण्याचे आवाहन केले. पुस्तके तुम्हाला जगायला शिकवतात त्यामुळे पुस्तकाच्या सहवासात जास्तीत जास्त काळ घालवला पाहिजे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.  थोर शास्त्रज्ञ, भारत देशाचे राष्ट्रपती, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे कार्य किती महान होते हे सांगितले.वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे विद्यार्थ्यांनी वाचन करावे म्हणजे विद्यार्थ्यांचा विकास यातूनच होईल.  विद्यालयाचे प्राचार्य भास्कर वाबळे, पर्यवेक्षक विजय शिंदे, लेखक महादेव चव्हाण, हमीदभाई आतार यांच्या हस्ते डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींची डॉक्टर कलाम यांच्या जीवनावर आधारित भाषणे झाली.  या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये  प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पुस्तक आणि पेन  भेट दिला. लेखक महादेव चव्हाण सर,सामाजिक कार्यकर्ते हमीद भाई आतार, यांचा शाळेमार्फत शाल, श्रीफळ ,आणि पुस्तक, पेन, भेट देऊन सत्कार करण्यात आला . ग्रंथपाल पुष्पा लोंढे व  संजय गायकवाड यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली . कार्यक्रमाच्या शेवटी लेखक महादेव चव्हाण लिखित ईष्या॔ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या  शुभहस्ते करण्यात आले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त सर्व शिक्षकांना पुस्तके भेट दिली . तसेच शाळेतील वाचनाल्यासाठी ५००० रुपयेची देणगी दिली. विद्यार्थ्यांनी वाचनालयात जाऊन पुस्तके वाचावी त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी हाच उद्देश लेखकाचा आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील मोहिते यांनी केले .सूत्रसंचालन प्रिया भोंग  यांनी तर पुष्पा लोंढे यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...