इंदापूर:- भारतरत्न डॉक्टर ए .पी .जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जूनियर कॉलेज मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत लेखक महादेव चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले. ते विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांची चार पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. या निमित्ताने वाचनाचे महत्त्व पटवून देताना चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर राहण्याचे आवाहन केले. पुस्तके तुम्हाला जगायला शिकवतात त्यामुळे पुस्तकाच्या सहवासात जास्तीत जास्त काळ घालवला पाहिजे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. थोर शास्त्रज्ञ, भारत देशाचे राष्ट्रपती, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे कार्य किती महान होते हे सांगितले.वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे विद्यार्थ्यांनी वाचन करावे म्हणजे विद्यार्थ्यांचा विकास यातूनच होईल. विद्यालयाचे प्राचार्य भास्कर वाबळे, पर्यवेक्षक विजय शिंदे, लेखक महादेव चव्हाण, हमीदभाई आतार यांच्या हस्ते डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींची डॉक्टर कलाम यांच्या जीवनावर आधारित भाषणे झाली. या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पुस्तक आणि पेन भेट दिला. लेखक महादेव चव्हाण सर,सामाजिक कार्यकर्ते हमीद भाई आतार, यांचा शाळेमार्फत शाल, श्रीफळ ,आणि पुस्तक, पेन, भेट देऊन सत्कार करण्यात आला . ग्रंथपाल पुष्पा लोंढे व संजय गायकवाड यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली . कार्यक्रमाच्या शेवटी लेखक महादेव चव्हाण लिखित ईष्या॔ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या शुभहस्ते करण्यात आले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त सर्व शिक्षकांना पुस्तके भेट दिली . तसेच शाळेतील वाचनाल्यासाठी ५००० रुपयेची देणगी दिली. विद्यार्थ्यांनी वाचनालयात जाऊन पुस्तके वाचावी त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी हाच उद्देश लेखकाचा आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील मोहिते यांनी केले .सूत्रसंचालन प्रिया भोंग यांनी तर पुष्पा लोंढे यांनी आभार मानले.
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या