मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभीकरण व विकसित करण्यासाठी १० कोटी तातडीने मंजूर - दत्तात्रय भरणे
इंदापूर:-डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभीकरण व विकसित करण्यासाठी १० कोटी तातडीने मंजूर करणार,विश्वरत्न,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त वालचंदनगर येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील जयंती कार्यक्रमाप्रसंगी राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांची उपस्थितांना दिली जाहिर ग्वाही.........
               ना. श्री.दत्तात्रय (मामा)भरणे  यांच्या प्रयत्नांतून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वालचंदनगर परिसरातील दलित वस्तीमधिल विविध विकासकामांकरीता ४ कोटी ६० लाख रुपये मंजूर झाल्याने वालचंदनगर परिसरातील नागरिकांनी मानले नामदार श्री भरणे मामा यांचे जाहीर आभार*
                  विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त वालचंदनगर येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिमेस राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री दत्तात्रय (मामा)भरणे यांनी पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करून उपस्थित आंबेडकरप्रेमी जनतेला जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नामदार श्री दत्तात्रय (मामा)भरणे यांनी माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या कार्यकर्त्याच्या राजकीय, सामाजिक जीवनात नेहमीच वालचंदनगरवासीय व येथील आंबेडकरप्रेमी जनता सदैव पाठीशी खंबीरपणे उभी रहात आल्याने माझ्यासारख्याला विविध पदे भुषवता आली व सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे सांगून देशभरासह जगातील कोट्यावधी जनतेचे श्रध्दास्थान व प्रेरणास्थान असलेले विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य जागा उपलब्ध असणारे वालचंदनगर येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे इंदापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण असून अशा सुंदर उद्यानाच्या सुशोभीकरण व विकासाकरीता तातडीने १० कोटी रूपयांचा विकास आराखडा तयार करून तो तत्परतेने मंजूर करणार असल्याची जाहिर ग्वाही नामदार श्री भरणे मामा यांनी उपस्थितांना दिली.तसेच १० कोटी रूपयांच्या विकासकामांवर स्वतः लक्ष देऊन उद्यानातील विकासकामे दर्जेदार होण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचेही यावेळी जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात नामदार श्री भरणे मामा यांच्या घोषणेला प्रतिसाद दिला.
              या कार्यक्रमाच्या प्रसंगी नामदार श्री भरणे मामा यांनी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वालचंदनगर परिसरातील दलित वस्तीमधिल विविध विकासकामांकरीता ४ कोटी ६० लाख रुपये मंजूर झाल्याचे सांगून सदर कामांना येत्या काही दिवसांत सुरवात होणार असल्याची माहिती नामदार श्री भरणे मामा यांनी दिली.वालचंदनगर परिसरातील दलित वस्तीमधिल विविध विकासकामांकरीता भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी नामदार श्री भरणे मामा यांचे जाहीर आभार मानले.यावेळी वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडचे एम डी ॲन्ड सीईओ श्री चिरागशेठ दोशी, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री प्रदीपदादा गारटकर, पुणे जिल्हा परिषद सदस्य श्री प्रतापराव पाटील,फॅक्टरी मॅनेजर श्री धिरज केसकर,वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री लातुरे साहेब, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री सचिन सपकळ, इंदापूर तालूका संजय गांधी निराधार समितीचे  अध्यक्ष श्री सागर मिसाळ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री शुभम निंबाळकर यांच्यासह वालचंदनगर परिसरातील आंबेडकरप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...