मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

नवनाथ रणखांबे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर  राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान
   इंदापूर:-  नवनाथ रणखांबे यांच्या अमुल्य योगदानाबद्दल  जागतिक आंबेडकरवादी  साहित्य महामंडळाच्यावतीने   दीक्षाभूमी , नागपूर  येथील ऑडिटोरियम सभागृहात  दुपारी १२ वाजता  प्रमुख अतिथी भंते नागार्जून सुरई ससाई ( अध्यक्ष, प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती) यांच्या हस्ते    डॉ. बाबासाहेब आंबेडकर  राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार  नवनाथ रणखांबे  यांना देऊन गौरविण्यात आले आहे.   जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा  वर्धापन दिन ,पुरस्कार वितरण समारंभ , ग्रंथ प्रकाशन  व सत्कार सोहळा मोठ्या थाटामाटात  संपन्न झाला. यावेळी प्रा. दीपककुमार खोब्रागडे  ( अध्यक्ष , जागतिक आंबेडकरी साहित्य महामंडळ) , उदघाटन  डॉ. चंद्रशेखर मेश्राम ( आंतरराष्ट्रीय मेंदूरोग तज्ञ),  
डॉ.रवींद्र तिरपुडे (कार्यवाह)  
डॉ. गोविंदराव कांबळे ( कार्याध्यक्ष)  ,  सुजित मुरमाडे ( सरचिटणीस )   डॉ. सुमा  टी.  रोडनवर ( हिंदी विभाग प्रमुख  ,  मंगलूर विद्यापीठ )   आदी मान्यवर उपस्थित होते. 
        नवनाथ रणखांबे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्य वैचारिक चळवळच्या आंदोलनात आघाडीवर असणारे व्यक्तिमत्त्व  आहे.  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा  आपल्या लेखणीच्या  माध्यमातून  ते प्रचार आणि प्रसार करीत  आहेत .
     " नागपूर हे ऐतिहासिक शहर प्रज्ञासूर्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  घेतलेल्या धम्मदीक्षा सोहळ्यामुळे  या शहराची नोंद जगाच्या इतिहास झाली आहे. बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र, धम्मक्रांतीचे विध्यपीठ , प्रेरणापीठ, क्रांतिपीठ, विचरपीठ, तत्वज्ञानपीठ, शक्तीपीठ, वैचारिक आंदोलनाचे नागपूर शहर याठिकाणी  आज पहिल्यादाच आलो आहे. तो ही  डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी!  नागपूरच्या साहित्यिकांनी  माझ्य 'जीवन संघर्ष'  पुस्तकावर  परीक्षणे लिहिल्यामुळे येथील साहित्यिक आणि   या शहरातील प्रसार माध्यमाद्वारे मी अगोदरच येथे पोहचलो आहे.  या शहराचा  आणि माझा पिढ्यानपिढ्याचा संबंध आहे. डॉ. बाबासाहेब हेच माझी प्रेरणा , ऊर्जा आणि शक्ती  आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन मी  विविध क्षेत्रात कार्य करीत आहे. आज त्यांच्या नावाने मिळणारा मानाचा पुरस्कार  दीक्षाभूमीवर  मला मिळतो आहे याचा आनंद होतो आहे. सद कार्य करण्यासाठी   मला ऊर्जा आणि प्रेरणा मिळली आहे.  आता अजून  माझ्यावर सामाजिक   जबाबदारी आणि बांधिलकी  वाढलीआहे."
    असे नवनाथ रणखांबे यांनी यावेळी बोलतांना  मत व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते