मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

महिला दिन केवळ एकच दिवसापूरता साजरा न  होता वर्षभर महिलांना आदर व सन्मानाची वागणूक देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे-अंकिता पाटील-ठाकरे 
 इंदापूर:-दि . ०८ मार्च 2022 रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त महाविद्यालयात मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून मा. श्रीमती एस. डी. वडगावकर(सह दिवाणी न्यायाधीश, दिवाणी व फौजदारी न्यायालय इंदापूर) व मा. अंकिताताई पाटील ठाकरे (सदस्या, पुणे जिल्हा परिषद, पुणे , सह अध्यक्षा इसमा कायदेशीर समिती) म्हणून उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले . यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्व पटवून सांगितले. महिलांनी केवळ चूल आणि मूल यापुरतेच मर्यादित राहायचा काळ नसून शिक्षणाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची आवश्यकता आहे असेही ते म्हणाले. 
कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाची दिशा ही त्या देशातील महिलांच्या सक्षमी करणावरती अवलंबून असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. 
मा. वडगावकर यांनी महिलांचे हक्क व कायदेशीर तरतुदी याविषयावर सविस्तर व अभ्यासपूरक माहिती उपस्थित श्रोत्यांना सांगितली.  महिलांच्या हक्कांविषयी घटनात्मक तरतुदींचा उल्लेख  त्यांनी केला. समाजातील समानता, बंधुता आणि एकात्मता या तत्वांना अनुसरून घटनात्मक तरतुदींच्या साहाय्याने महिलांनी आपले हक्क घेण्यासाठी सक्षम होणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. 
महिलांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपली आर्थिक व सामाजिक प्रगती घडवून आणने आवश्यक आहे असे देखील त्या म्हणाल्या. महिलांच्या बाबत घडणाऱ्या अनुचित घटनांचा देखील त्यांनी लेखाजोखा मांडला. 

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मा. अंकिताताई पाटील ठाकरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्या असे म्हणाल्या की, महिलांनी आत्मविश्वासाने प्रत्येक क्षेत्रात संधी निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच आजच्या आधुनिक युगामध्ये विज्ञान- तंत्रज्ञान, व्यापार, शिक्षण यासारख्या सर्वच क्षेत्रामध्ये महिलांची आघाडी असल्याचे दिसून येते. महिला दिन केवळ एकच दिवसापूरता साजरा न  होता वर्षभर महिलांना आदरयुक्त व सन्मानाची वागणूक देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आज सर्वांना पत्नी, आई, बहीण या भूमिकेसाठी स्त्री हवी आहे परंतु मुलगी नको असं म्हणणारा देखील एक वर्ग २१ व्या शतकात असल्याची खंत यावेळी त्यांनी बोलून दाखविली. येणाऱ्या काळामध्ये मुलींनी व महिलांनी व्यावसायीक शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक व सामाजिक प्रगती करून घेणे आवश्यक आहे असे मत मांडले.


यावेळी उपप्राचार्य नागनाथ ढवळे, प्रा. विद्या गायकवाड, प्रा. मृदुल कांबळे, प्रा. दमयंती जाधव, प्रा, कल्पना अहिवळे, प्रा. सुवर्णा जाधव, प्रा. जयश्री सरवदे, प्रा. स्वाती राऊत, प्रा. शुभांगी कारंडे, प्रा. डॉ. मोना पाटील, प्रा. प्रांजली नलवडे, प्रा. सारिका पाटील, प्रा. दीक्षा बोगाणे, प्रा. निकम, प्रा. रुपाली मिसाळ, प्रा. पुजा भोसले तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात हजर होत्या.

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. तानाजी कसबे यांनी केले तर आभार प्रा. मनीषा गायकवाड यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते