महिला दिन केवळ एकच दिवसापूरता साजरा न होता वर्षभर महिलांना आदर व सन्मानाची वागणूक देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे-अंकिता पाटील-ठाकरे
इंदापूर:-दि . ०८ मार्च 2022 रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त महाविद्यालयात मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून मा. श्रीमती एस. डी. वडगावकर(सह दिवाणी न्यायाधीश, दिवाणी व फौजदारी न्यायालय इंदापूर) व मा. अंकिताताई पाटील ठाकरे (सदस्या, पुणे जिल्हा परिषद, पुणे , सह अध्यक्षा इसमा कायदेशीर समिती) म्हणून उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले . यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्व पटवून सांगितले. महिलांनी केवळ चूल आणि मूल यापुरतेच मर्यादित राहायचा काळ नसून शिक्षणाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची आवश्यकता आहे असेही ते म्हणाले.
कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाची दिशा ही त्या देशातील महिलांच्या सक्षमी करणावरती अवलंबून असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
मा. वडगावकर यांनी महिलांचे हक्क व कायदेशीर तरतुदी याविषयावर सविस्तर व अभ्यासपूरक माहिती उपस्थित श्रोत्यांना सांगितली. महिलांच्या हक्कांविषयी घटनात्मक तरतुदींचा उल्लेख त्यांनी केला. समाजातील समानता, बंधुता आणि एकात्मता या तत्वांना अनुसरून घटनात्मक तरतुदींच्या साहाय्याने महिलांनी आपले हक्क घेण्यासाठी सक्षम होणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.
महिलांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपली आर्थिक व सामाजिक प्रगती घडवून आणने आवश्यक आहे असे देखील त्या म्हणाल्या. महिलांच्या बाबत घडणाऱ्या अनुचित घटनांचा देखील त्यांनी लेखाजोखा मांडला.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मा. अंकिताताई पाटील ठाकरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्या असे म्हणाल्या की, महिलांनी आत्मविश्वासाने प्रत्येक क्षेत्रात संधी निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच आजच्या आधुनिक युगामध्ये विज्ञान- तंत्रज्ञान, व्यापार, शिक्षण यासारख्या सर्वच क्षेत्रामध्ये महिलांची आघाडी असल्याचे दिसून येते. महिला दिन केवळ एकच दिवसापूरता साजरा न होता वर्षभर महिलांना आदरयुक्त व सन्मानाची वागणूक देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आज सर्वांना पत्नी, आई, बहीण या भूमिकेसाठी स्त्री हवी आहे परंतु मुलगी नको असं म्हणणारा देखील एक वर्ग २१ व्या शतकात असल्याची खंत यावेळी त्यांनी बोलून दाखविली. येणाऱ्या काळामध्ये मुलींनी व महिलांनी व्यावसायीक शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक व सामाजिक प्रगती करून घेणे आवश्यक आहे असे मत मांडले.
यावेळी उपप्राचार्य नागनाथ ढवळे, प्रा. विद्या गायकवाड, प्रा. मृदुल कांबळे, प्रा. दमयंती जाधव, प्रा, कल्पना अहिवळे, प्रा. सुवर्णा जाधव, प्रा. जयश्री सरवदे, प्रा. स्वाती राऊत, प्रा. शुभांगी कारंडे, प्रा. डॉ. मोना पाटील, प्रा. प्रांजली नलवडे, प्रा. सारिका पाटील, प्रा. दीक्षा बोगाणे, प्रा. निकम, प्रा. रुपाली मिसाळ, प्रा. पुजा भोसले तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात हजर होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. तानाजी कसबे यांनी केले तर आभार प्रा. मनीषा गायकवाड यांनी मानले.
टिप्पण्या