मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज,शिवसृष्टी न्युज

नीरा-भीमा कारखान्याच्या इथेनॉलचे 1कोटी 8 लाख लि. उत्पादन तरआगामी हंगामात 1कोटी 75 लाख लि.चे उद्दिष्ट-हर्षवर्धन पाटील 
         इंदापूर:-तालुक्यातील  शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 च्या हंगामात इथेनॉलचे 1 कोटी 8 लाख लि.चे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. तसेच कारखान्याचा  प्रतिदिनी 1 लाख लि. उत्पादन क्षमतेचा इथेनॉलचा नवीन प्रकल्प पुढील वर्षीच्या इथेनॉल हंगामापासून कार्यान्वित होईल. त्यामुळे कारखान्याची इथेनॉलची उत्पादन क्षमता प्रतिदिनी 2 लाख लि. एवढी होणार आहेत. दरम्यान, चालु होणाऱ्या हंगामामध्ये कारखान्याने 1कोटी 75 लाख लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.16) दिली.
           शहाजीनगर येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2020-21 च्या इथेनॉल  हंगामाची सांगता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इथेनॉलचे पूजनाने आज करण्यात आली. सदर प्रसंगी मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते.
           नीरा भीमा कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचा हंगाम 17 नोव्हेंबर 2020 रोजी सुरू झाला. त्यानंतर 207 दिवस इथेनॉलचा हंगाम चालला. या हंगामामध्ये दैनिक 52 हजार लि. क्षमतेने प्रकल्पाच्या 120 टक्के कार्यक्षमतेचा वापर करीत 1 कोटी 8 लाख लि. इथेनॉलचे उत्पादन घेण्यात आले व तेल कंपन्यांना कराराप्रमाणे पुरवठा करण्यात आला आहे. तसेच हंगामात रेक्टिफाईड स्पिरिटचे 1 कोटी 18 लाख लि. उत्पादन घेऊन त्यापैकी 3.18 लाख लि. विक्री करण्यात येऊन उर्वरित रेक्टिफाईड स्पिरिटचा इथेनॉल उत्पादनासाठी वापरण्यात आला आहे. सध्या राज्यातील साखर उद्योग काहीसा अडचणीत असला तरी येत्या काळात अडचणी निश्चितपणे दूर होतील, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
       देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी इथेनॉलचे दीर्घकालीन असे उत्कृष्ट धोरण जाहीर केल्याने साखर उद्योगाला इथेनॉलचा मोठा आधार प्राप्त झाला आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात नमूद केले.
       या कार्यक्रमामध्ये इथेनॉलचा हंगाम यशस्वीरित्या पार पडलेबद्दल इथेनॉल प्रकल्पाचे इन्चार्ज सुधीर गेंगे-पाटील, अधिकारी, कर्मचारी यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
     याप्रसंगी अध्यक्ष लालासाहेब पवार, कार्यकारी संचालक डी.एन.मरकड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, हरिदास घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, कमाल जमादार उपस्थित होते.  तत्पूर्वी संचालक भागवत गोरे व सुनीता गोरे या उभयतांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे तर आभार सुधीर गेंगे-पाटील यांनी मानले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...