मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

वैचारिक,  अभ्यासू , दिलखुलास व्यक्तिमत्व,   प्रामाणिक आणि सुसंस्कृत महिला नेतृत्व म्हणून समाजात ओळखल्या जाणाऱ्या प्रा. जयश्री गटकुळ या  विश्व प्रतिष्ठान इंदापूर या शैक्षणिक संस्थेच्या संस्थापक- अध्यक्षा , जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्षा आणि इंदापूर महाविद्यालयांमध्ये  प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.  दूरदृष्टी आणि अष्टपैलू  व्यक्तिमत्व असलेल्या प्रा.डॉ जयश्री गटकुळ उर्फ माई महिलांसाठी नव्हे तर सर्व  समाजासाठी एक प्रेरणास्थान आहे ,  विचारवंत आणि सामाजिक बांधिलकीची जाण ठेवणाऱ्या असून  गरजूंना मदत करणे, अन्याय झाला तर आवाज उठविणे, अशावेळी आक्रमक भूमिका घेऊन न्याय मिळवून देणे, पारदर्शकता ठेवणे, गरीब विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करून खूप मोठ्या पदापर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शन करणे, कठीण काळात मदतीसाठी धावून जाणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. सतत विधायक कामात राहून लहान-थोरांचा आदर करणे ही त्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत.
त्यांचा अनेक विषयाचा दांडगा व्यासंग इतिहास, विज्ञान, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडी या विषयावर त्यांचे कमालीचे प्रभुत्व आहे, एखादा विषय समजून घेण्यासाठी त्यांचा मोठा ध्यास असतो. महिला - युवा पिढी विकास आणि शिक्षण या विचारावर त्यांची नितांत निष्ठा आहे.
लहानपणापासूनच अत्यंत जिज्ञासू प्रवृत्ती, बुद्धिवान असल्यामुळे  इयत्ता चौथी आणि सातवी मध्ये ग्रामीण भागात स्कॉलरशिप  परीक्षा मध्ये प्रथम नंबर मिळवला. अशा लहान वयातच माढा तालुक्यात त्यांनी नावलौकिक  मिळविला होता पुढील महाविद्यालयीन शिक्षण संगमेश्वर कॉलेज सोलापूर आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून घेतले. पर्यावरण शास्त्र विषयातून मुक्त विद्यापीठ नाशिक येथून एम फिल पदवी घेतली आणि रसायनशास्त्र विषयांमध्ये पुणे विद्यापीठाची पीएचडी मिळविली.
प्रा.डॉ. जयश्री गटकुळ हे अत्यंत सुखवस्तू कुटुंबातून पुढे आलेले आहेत. त्यांना जसा संपत्तीचा वारसा लाभला आहे, तसाच सुसंस्कृतपणा, ज्ञान, कर्तृत्व, सामजिक बांधिलकी जपण्याचा देखील वारसा लाभला आहे. माहेर आणि सासर प्रगतशील बागायतदार आणि शेतकरी कुटुंब अशा मोठ्या घराण्यातून आल्याचा मोठेपणा नाही. अहंकार तर नाहीच पण त्यांच्याजवळ प्रचंड नम्रता, शांतता आणि संयम आहे. अन्याय विरुद्ध आक्रमक पवित्रा घेणाऱ्या आणि अन्यायग्रस्त शोषित महिलांना न्याय देणाऱ्या प्रा. डॉ जयश्री गटकुल इंदापूरच्या सामजिक क्षेत्रातील आयडॉल आहेत. त्यांना भावी आयुष्यात खुप मोठं यश आणि उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा..वाढदिवसानिमित्त खुप खुप हार्दिक शुभेच्छा
शब्दांकन- प्राचार्य राजश्री जगताप

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...