मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

वैचारिक,  अभ्यासू , दिलखुलास व्यक्तिमत्व,   प्रामाणिक आणि सुसंस्कृत महिला नेतृत्व म्हणून समाजात ओळखल्या जाणाऱ्या प्रा. जयश्री गटकुळ या  विश्व प्रतिष्ठान इंदापूर या शैक्षणिक संस्थेच्या संस्थापक- अध्यक्षा , जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्षा आणि इंदापूर महाविद्यालयांमध्ये  प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.  दूरदृष्टी आणि अष्टपैलू  व्यक्तिमत्व असलेल्या प्रा.डॉ जयश्री गटकुळ उर्फ माई महिलांसाठी नव्हे तर सर्व  समाजासाठी एक प्रेरणास्थान आहे ,  विचारवंत आणि सामाजिक बांधिलकीची जाण ठेवणाऱ्या असून  गरजूंना मदत करणे, अन्याय झाला तर आवाज उठविणे, अशावेळी आक्रमक भूमिका घेऊन न्याय मिळवून देणे, पारदर्शकता ठेवणे, गरीब विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करून खूप मोठ्या पदापर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शन करणे, कठीण काळात मदतीसाठी धावून जाणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. सतत विधायक कामात राहून लहान-थोरांचा आदर करणे ही त्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत.
त्यांचा अनेक विषयाचा दांडगा व्यासंग इतिहास, विज्ञान, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडी या विषयावर त्यांचे कमालीचे प्रभुत्व आहे, एखादा विषय समजून घेण्यासाठी त्यांचा मोठा ध्यास असतो. महिला - युवा पिढी विकास आणि शिक्षण या विचारावर त्यांची नितांत निष्ठा आहे.
लहानपणापासूनच अत्यंत जिज्ञासू प्रवृत्ती, बुद्धिवान असल्यामुळे  इयत्ता चौथी आणि सातवी मध्ये ग्रामीण भागात स्कॉलरशिप  परीक्षा मध्ये प्रथम नंबर मिळवला. अशा लहान वयातच माढा तालुक्यात त्यांनी नावलौकिक  मिळविला होता पुढील महाविद्यालयीन शिक्षण संगमेश्वर कॉलेज सोलापूर आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून घेतले. पर्यावरण शास्त्र विषयातून मुक्त विद्यापीठ नाशिक येथून एम फिल पदवी घेतली आणि रसायनशास्त्र विषयांमध्ये पुणे विद्यापीठाची पीएचडी मिळविली.
प्रा.डॉ. जयश्री गटकुळ हे अत्यंत सुखवस्तू कुटुंबातून पुढे आलेले आहेत. त्यांना जसा संपत्तीचा वारसा लाभला आहे, तसाच सुसंस्कृतपणा, ज्ञान, कर्तृत्व, सामजिक बांधिलकी जपण्याचा देखील वारसा लाभला आहे. माहेर आणि सासर प्रगतशील बागायतदार आणि शेतकरी कुटुंब अशा मोठ्या घराण्यातून आल्याचा मोठेपणा नाही. अहंकार तर नाहीच पण त्यांच्याजवळ प्रचंड नम्रता, शांतता आणि संयम आहे. अन्याय विरुद्ध आक्रमक पवित्रा घेणाऱ्या आणि अन्यायग्रस्त शोषित महिलांना न्याय देणाऱ्या प्रा. डॉ जयश्री गटकुल इंदापूरच्या सामजिक क्षेत्रातील आयडॉल आहेत. त्यांना भावी आयुष्यात खुप मोठं यश आणि उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा..वाढदिवसानिमित्त खुप खुप हार्दिक शुभेच्छा
शब्दांकन- प्राचार्य राजश्री जगताप

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते