मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

 इंदापूर:-राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी १ लाख रूपयांचा धनादेश देऊन राधा खुडे हिचा गौरव करून हजारोंच्या साक्षीने पार पडलेल्या नेत्रदिपक सत्कार सोहळ्याप्रसंगी खुडे हिचे पालकत्वही स्विकारले

                सुर नवा ध्यास नवा या कलर्स मराठी वाहिनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो जनतेच्या मनावरती आपल्या पहाडी आवाजाने मंत्रमुग्ध करून अधिराज्य गाजवणारी कु.राधा खुडे हिचा नेत्रदिपक सत्कार सोहळा कळंब ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हजारोंच्या साक्षीने फटाक्यांच्या आतिषबाजीत उत्साही वातावरणात संपन्न झाला.
              यावेळी नामदार श्री भरणे मामा यांनी कु.राधा खुडे हिचा १ लाख रूपयांचा धनादेश देऊन सत्कार करून यापुढील काळात तिच्या पालकत्वाची जबाबदारी घेणार असल्याचे जाहीर करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कळंब ग्रामपंचायतीचे मा.सरपंच व मा.पंचायत समिती सदस्य श्री सुहासदादा डोंबाळे पाटील, 
पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री संजयभैय्या सोनवने, सामाजिक कार्यकर्ते धनंजय नाना तांबिले ,इंदापूर तालूका शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष व मा.जि.प.सदस्य श्रीमंत ढोले सर, इंदापूर तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री हनुमंत कोकाटे पाटील,मा.जि.प.सदस्य श्री प्रतापराव पाटील यांनी कु.राधा खुडे यांचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
             सत्काराला उत्तर देताना कु.राधा खुडे हिने सर्वप्रथम नामदार श्री भरणे मामा यांनी केलेल्या जाहीर कौतुकाचे तसेच पालकत्वाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांचे आभार मानले.तसेच कळंब,रणगांव, वालचंदनगर,चिखलि,लासुर्णे परिसरातील व इंदापूर तालुक्यातील सर्वच घटकातील व्यक्तिंनी दिलेल्या शुभेच्छा व प्रेमाचे उपकार न विसरण्यासारखे असल्याचे सांगून यापुढील काळात इंदापूर तालूक्याचे नाव जास्तीत जास्त प्रयत्नांची पराकाष्ठा करून आणखी उज्वल करणार असल्याची ग्वाही देऊन आपल्या पहाडी आवाजाने गीत गात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.संजय गांधी निराधार समितीचे शासकीय अध्यक्ष श्री सागर मिसाळ यांनी कु.राधा खुडे हिच्या वडिलांना दहा हजार दोनशे बावीस रूपयांचा धनादेश नामदार श्री भरणे मामा यांच्या शुभहस्ते दिला.
              या कार्यक्रमाच्या प्रसंगी वालचंदनगर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी श्री दिलिप पवार साहेब, बारामतीच्या नगरसेविका सौ ओव्हाळ ताई,जेष्ठ नेते श्री बाळासाहेब करगळ, श्री धनंजय तांबिले, कळंब विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री आप्पासाहेब अर्जुन,मा.चेअरमन श्री दत्तात्रय जानकर,चिखलिचे सरपंच श्री शिवाजीराव अर्जून,मा.सरपंच श्री हरिश्चंद्र बंडगर, श्री अरूणशेठ वीर,मा.चेअरमन श्री संजय खरात, इंदापूर तालूका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री शुभम निंबाळकर, श्री बाळासाहेब जाधव, श्री नवनाथ धांडोरे, श्री रविराज खरात, श्री हर्षवर्धन गायकवाड, श्री पिनु झेंडे, श्री महेश बोंद्रे,कळंबच्या सरपंच सौ विद्याताई अतुल सावंत, ग्रामपंचायत सदस्य श्री ज्ञानेश्वर मेटकरी, ईक्बाल शेख,श्री राजेंद्र डोंबाळे, श्री संदिप पाटील, श्री योगेश डोंबाळे, श्री प्रमोद खंडागळे, श्री सागर कोळी, रणगाव हायस्कूचे प्राचार्य श्री निडबने सर, श्री संतोष रणमोडे, श्री राहुल अर्जून, श्री धनश्याम निंबाळकर, श्री शेखर काटे, श्री विजय बनसोडे, श्री राहुल रणमोडे सर, श्री नितिन जानकर, श्री रोहन पांढरमिसे, श्री पोपट मेटकरी, श्री गणेश चव्हाण सर,श्री अमोल अर्जून, श्री राहुल अर्जून सर, श्री महेश धायगुडे यांच्यासह कळंब, वालचंदनगर, रणगांव, लासुर्णे परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री सर्वगोड सर यांनी केले व आभार श्री राऊत सर यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...