मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

भारतात ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता- तज्ञ

इंदापूर:-देशात कोरोना व्हायरसने गेल्या वर्षभरापासून कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत असला तरी बाधितांची संख्या कमी-जास्त होताना दिसतेय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून थोडा दिलासा मिळाल्यानंतर आता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या रॉयटर्सच्या सर्वेक्षणानुसार, भारतात ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणानुसार, नागरिकांना किमान एक वर्ष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या सर्वेक्षणात जगभरातील ४० आरोग्य तज्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक, विषाणूशास्त्रज्ञ, साथीच्या रोगाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांचा समावेश होता. त्यांच्याकडून ३ ते १७ जून दरम्यान कोरोना व्हायरस संदर्भात अभिप्राय घेण्यात आला. सर्वेक्षणानुसार, ८५ टक्क्यांहून अधिक म्हणजे २४ पैकी २१ जणांनी असे सांगितले की, ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट देशात येणार आहे. त्यापैकी ३ जणांनी ऑगस्टच्या सुरूवातीस आणि १२ जणांनी सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविला. उर्वरित तिघांनी नोव्हेंबर आणि फेब्रुवारी दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येईल असे सांगितले. यासह ७० टक्क्यांहून अधिक तज्ज्ञ म्हणजेच ३४ पैकी २४ जणांनी असे सांगितले की, कोरोनाची तिसरी लाट ही कोरोनाच्या दुसर्‍यापेक्षा चांगल्या प्रकारे हाताळली जाऊ शकते. सध्या देशात असणारी कोरोनाची लाट अधिक प्राणघातक ठरली. त्यामुळे या काळात आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आल्याचे देखील समोर आले.

यासह दुसरीकडे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल असे सांगितले, येणाऱ्या नवीन तिसऱ्या लाटेवर सध्या असलेल्या परिस्थितीपेक्षा आणखी नियंत्रण असेल. तिसरी लाट येईपर्यंत बर्‍याच लोकांना कोरोनाची लस दिलेली असेल. तर लहान मुलांसह १८ वर्षांखालील मुलांवर संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेसंदर्भात तज्ज्ञांची मतं वेगवेगळी आहे. ४० पैकी २६ तज्ज्ञांनी असे सांगितले की, तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम होईल. तर यातील १४ जणांनी याउलट परिस्थिती असल्याचे सांगत मुलांना धोका नसल्याचे मत व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...