मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज


इंंदापूर: कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखान्याची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन कॉन्फरन्सिंगव्दारे कोरोनाचे सर्व नियम पाळून कारखान्याचे आदरणीय चेअरमन मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो, यांचे अध्यक्षतेखाली व कारखान्याच्या व्हाईस चेअरमन मा.श्रीमती पद्माताई भोसले ,भरतशेठ शहा, तसेच सर्व संचालक मंडळ, निरा-भिमा सह. साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. लालासाहेब पवार, व्हाईस चेअरमन मा.श्री. कांतीलाल झगडे, ऍ़ड. कृष्णाजी यादव यांचे उपस्थितीमध्ये तसेच सभासदांचे ऑनलाईन उपस्थितीव्दारे उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न झाली.

    विषयपञिकेवरील विषयांचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार यांनी केले. व त्यास सभासदांनी हात वर करून मंजुरी दिली.  
    विषयपञिकेवरील सर्व विषयांचे मंजुरीनंतर सभासदांनी कारखान्यासाठी काही विधायक सुचना केल्या. त्यानंतर कारखान्याच्या उपाध्यक्षा मा.श्रीमती पद्माताई भोसले यांनी सन 2019-20 मधील गाळप हंगामाचा सविस्तर आढावा सादर केला व गाळप हंगाम यशस्वी करणेसाठी ऊस उत्पादक सभासद, वाहतुकदार, ऊसतोडणी कामगार, कारखान्याचे कामगार व अधिकारी यांनी केलेल्या प्रयत्नाबददल आभार मानले.
   कारखान्याचे अध्यक्ष मा.श्री. हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रशासनाचे इथेनॉल व साखर निर्यात धोरणासंदर्भात विशेष अभिनंदन करुन केंद्रसरकारकडे समक्ष भेट घेवून आणखी मागण्या करणार असलेचे त्यांनी सुचित केले. त्यामध्ये विशेषत: इथेनॉलचे धोरण दहा वर्षासाठी आहे ते पंचवीस वर्षाचे करणेत यावे, पेट्रोलमध्ये सध्या 10 टक्के इथेनॉल मिसळले जाते ते प्रमाण 20 टक्के करणेत यावे, सध्या इथेनॉल फक्त पेट्रोलमध्ये मिसळले जाते ते डिझेलमध्ये मिसळण्याचेही धोरण करावे व तशा प्रकारची वाहननिर्मिती करावी अशा सुचना वाहननिर्मिती करणा-या वाहन कंपन्यांना करण्यात याव्यात, इथेनॉल डिलीव्हरी व पेमेंट त्वरीत व्हावे, इत्यादी मागण्या पुढील आठवडयात केंद्रसरकारमधील संबंधीत केंद्रीय मंञी व अधिकारी यांना समक्ष भेटून करणार असलेचे त्यांनी सांगितले. सर्व उपस्थितांचे आभार कारखान्याचे संचालक श्री. राहूल जाधव यांनी मानले व राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...