मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

(21 मार्च) कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखान्याची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन कॉन्फरन्सिंगव्दारे कोरोनाचे सर्व नियम पाळून कारखान्याचे आदरणीय चेअरमन मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो, यांचे अध्यक्षतेखाली व कारखान्याच्या व्हाईस चेअरमन मा.श्रीमती पद्माताई भोसले ,भरतशेठ शहा, तसेच सर्व संचालक मंडळ, निरा-भिमा सह. साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. लालासाहेब पवार, व्हाईस चेअरमन मा.श्री. कांतीलाल झगडे, ऍ़ड. कृष्णाजी यादव यांचे उपस्थितीमध्ये तसेच सभासदांचे ऑनलाईन उपस्थितीव्दारे उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न झाली.

    विषयपञिकेवरील विषयांचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार यांनी केले. व त्यास सभासदांनी हात वर करून मंजुरी दिली.  
    विषयपञिकेवरील सर्व विषयांचे मंजुरीनंतर सभासदांनी कारखान्यासाठी काही विधायक सुचना केल्या. त्यानंतर कारखान्याच्या उपाध्यक्षा मा.श्रीमती पद्माताई भोसले यांनी सन 2019-20 मधील गाळप हंगामाचा सविस्तर आढावा सादर केला व गाळप हंगाम यशस्वी करणेसाठी ऊस उत्पादक सभासद, वाहतुकदार, ऊसतोडणी कामगार, कारखान्याचे कामगार व अधिकारी यांनी केलेल्या प्रयत्नाबददल आभार मानले.
   कारखान्याचे अध्यक्ष मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील यांनी केंद्रशासनाचे इथेनॉल व साखर निर्यात धोरणासंदर्भात विशेष अभिनंदन करुन केंद्रसरकारकडे समक्ष भेट घेवून आणखी मागण्या करणार असलेचे त्यांनी सुचित केले. त्यामध्ये विशेषत: इथेनॉलचे धोरण दहा वर्षासाठी आहे ते पंचवीस वर्षाचे करणेत यावे, पेट्रोलमध्ये सध्या 10 टक्के इथेनॉल मिसळले जाते ते प्रमाण 20 टक्के करणेत यावे, सध्या इथेनॉल फक्त पेट्रोलमध्ये मिसळले जाते ते डिझेलमध्ये मिसळण्याचेही धोरण करावे व तशा प्रकारची वाहननिर्मिती करावी अशा सुचना वाहननिर्मिती करणा-या वाहन कंपन्यांना करण्यात याव्यात, इथेनॉल डिलीव्हरी व पेमेंट त्वरीत व्हावे, इत्यादी मागण्या पुढील आठवडयात केंद्रसरकारमधील संबंधीत केंद्रीय मंञी व अधिकारी यांना समक्ष भेटून करणार असलेचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर सर्व उपस्थितांचे आभार कारखान्याचे संचालक श्री. राहूल जाधव यांनी मानले व राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते