निराशेपोटी भाजपाच्या तालुक्यातील नेत्यांनी नको त्या वल्गना करू नये-राष्ट्रवादी
इंदापूर: "हर घर जल ही योजना काय आहे? तिची रचना काय आहे? याचा अभ्यास या भाजपचा विद्वान मंडळींनी करावा व नंतर टीकाटिप्पणी करावी. तुमच्या कर्तृत्वहीन नेतृत्वामुळे या तालुक्यातील हुशार मतदाराने तुम्हाला दोन वेळा घरी बसवून देखील तुम्ही अशा हुशार कि च्या बाता कशा मारता हा सवाल या तालुक्यातील सूज्ञ जनतेला पडतो.नीरा देवधरचे पाणी भाजपच्या काळात एका खासदाराच्या सांगण्यावरून नजीकच्या जिल्ह्यात वळवले होते त्याचा परिणाम कायमस्वरूपी इंदापूर तालुक्यातील शेतीला होणार होता त्या पाण्याचे कायदेशीर बाबी तपासून पहिल्याच अधिवेशनात इंदापूरला नीरा डावा कालवा मध्ये पहिल्या प्रमाणात पुन्हा तेवढेच पाणी मंजूर केले त्याबाबत तुम्ही कधी बोलला नाहीत हाच तुमचा दुटप्पीपणा. विकास काय असतो आणि तो कसा केला पाहिजे तो रक्ता मध्ये कशा पद्धतीने भिनलेला असावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे या राज्याचे मंत्री नामदार दत्तामामा भरणे होय . मामा तालुक्यामध्ये विकासाची गंगा खेचून आणत आहेत आणि कुठेतरी नैराश्य पोठी न बघवल्यासरखे आपण अभ्यास न करता टीकाटिप्पणी करत आहात याच्यावरून आपल्या बालिश बुद्धीचे दर्शन इंदापूरच्या जनतेला होत आहे. हर घर जल ही योजना राज्य शासनाचे जल जीवन मिशन या नावाने कार्यान्वित आहे. जल जीवन मिशन योजना राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे राबविण्यात येते याचे नियोजन राज्य शासनाच्या वतीने करून ते मंजूर केले जाते.हर घर जल योजनेमध्ये केंद्र शासन 50 टक्के राज्य शासन 50 टक्के असे समान निधीचे वाटप असते. यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय समिती नेमली जाते या समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री असतात व त्या जिल्ह्यातील आमदार व खासदार त्याचे सदस्य असतात या कमिटीच्या माध्यमातून या योजनेचा आराखडा तयार केला जातो व तो मंजुर केला जातो. म्हणून या कमिटीमध्ये मामांनी हा आराखडा मांडून या तालुक्यासाठी मंजूर करून घेतला आहे हे एवढं चांगलं काम करून देखील आपण त्या कामाला गालबोट लावण्याचे काम करत आहात हे तुम्हाला चांगले काम बघवत नाही म्हणून असे नैराश्याने बोलता हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडल्याशिवाय राहात नाही. भाजपाचे तालुकाध्यक्ष म्हणतात की नको त्या विकासकामांची घोषणा राज्य मंत्री करतात अरे तुमच्या डोळ्यावरचा चष्मा बदला म्हणजे तुम्हाला सर्व काही चांगलं दिसेल अध्यक्षांच्या बेलवाडी गावामध्ये जी विकास कामे चालू आहेत ती तरी तुम्ही उघड्या डोळ्याने मान्य करा.बावडा गावांमध्ये तुमच्या वेगवेगळे विकास कामे चालू आहेत ती तरी उघड्या डोळ्यांनी बघा.मागील वीस वर्षात विकासाच्या मुद्द्यावर गप्पा मारून तुम्ही तालुक्याचे खोटं राजकारण केलं म्हणून का तुमच्या नेतृत्वाला जनतेने घरी बसवलं हा प्रश्न मनाला पडल्याशिवाय राहत नाही. खोट बोल पण रेटून बोल ती तुमची संस्कृती आणि तुम्ही आमच्या कर्तुत्वान नेतृत्वावर टीका करता हे का तुमचं विद्वान पण? ग्रामपंचायत सरपंच निवडीवरून देखील तुम्ही खोटं बोललाततिथे देखील तुमचा खोटेपणा आम्ही जनतेपुढे उघड केला तेव्हा कुठे तुम्ही गप्प बसला.येणाऱ्या काळामध्ये जी होणारी विकास कामे आहेत ती विकास कामे बघून नक्कीच तुमचं तोंड बंद झाल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे म्हणून खोटे व बिनबुडाचे आरोप करू नका. येणाऱ्या काळामध्ये राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांचे विकास कामाचे माणस आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगतो हे ऐकूनच तुमचं तोंड बंद होईल.तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लाकडी लिंबोडी उपसा जलसिंचन योजना, शेटफळगडे उपसा जलसिंचन योजना, उजनी धरणातील बुडीत बंधारे, नीरा नदीवरील बंधारे , भाटनिमगाव चे बंधारे, खोरोची मधील बंधारे शेटफळ तलावाची उंची वाढवणे या कामासाठी सर्वस्वी प्रयत्न करून खूप मोठ्या प्रमाणात निधी इंदापूर तालुक्याचा आणण्याचा मानस या नेतृत्वाचा आहे.इंदापूर तालुक्यातील रस्ते चकाचक होत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्या रस्त्यावरून जात _येत असताना देखील तुम्हाला विकास दिसत नाही ही शोकांतिका आहे त्यावेळी तुम्ही तर तुमची नैतिकता विसरु नका जे सत्य आहे ते स्वीकारा असेआव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे कार्याध्यक्ष अतुल (शेठ) झगडे तालुका उपाध्यक्ष नवनाथ रूपनवर, जिल्हा सरचिटणीस शिंदे सर यांनी भाजपाच्या स्वयंघोषित विद्वान मंडळींना केले.
टिप्पण्या