मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

निराशेपोटी भाजपाच्या तालुक्यातील नेत्यांनी नको त्या वल्गना करू नये-राष्ट्रवादी 

इंदापूर:   "हर घर जल ही योजना काय आहे? तिची रचना काय आहे? याचा अभ्यास या भाजपचा विद्वान मंडळींनी करावा व नंतर टीकाटिप्पणी करावी. तुमच्या कर्तृत्वहीन नेतृत्वामुळे या तालुक्यातील हुशार मतदाराने तुम्हाला दोन वेळा घरी बसवून देखील तुम्ही अशा हुशार कि च्या बाता कशा मारता हा सवाल या तालुक्यातील सूज्ञ जनतेला पडतो.नीरा देवधरचे पाणी भाजपच्या काळात एका खासदाराच्या सांगण्यावरून नजीकच्या जिल्ह्यात वळवले होते त्याचा परिणाम कायमस्वरूपी इंदापूर तालुक्यातील शेतीला होणार होता त्या पाण्याचे कायदेशीर बाबी तपासून पहिल्याच अधिवेशनात इंदापूरला नीरा डावा कालवा मध्ये पहिल्या प्रमाणात पुन्हा तेवढेच पाणी मंजूर केले त्याबाबत तुम्ही कधी बोलला नाहीत हाच तुमचा दुटप्पीपणा. विकास काय असतो आणि तो कसा केला पाहिजे तो रक्ता मध्ये कशा पद्धतीने भिनलेला असावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे या राज्याचे मंत्री नामदार दत्तामामा भरणे होय . मामा तालुक्यामध्ये विकासाची गंगा खेचून आणत आहेत आणि कुठेतरी नैराश्य पोठी न बघवल्यासरखे आपण अभ्यास न करता टीकाटिप्पणी करत आहात याच्यावरून आपल्या बालिश बुद्धीचे दर्शन इंदापूरच्या जनतेला होत आहे. हर घर जल ही योजना राज्य शासनाचे जल जीवन मिशन या नावाने कार्यान्वित आहे. जल जीवन मिशन योजना राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे राबविण्यात येते याचे नियोजन राज्य शासनाच्या वतीने करून ते मंजूर केले जाते.हर घर जल योजनेमध्ये केंद्र शासन 50 टक्के राज्य शासन 50 टक्के असे समान निधीचे वाटप असते. यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय समिती नेमली जाते या समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री असतात व त्या जिल्ह्यातील आमदार व खासदार त्याचे सदस्य असतात या कमिटीच्या माध्यमातून या योजनेचा आराखडा तयार केला जातो व तो मंजुर केला जातो. म्हणून या कमिटीमध्ये मामांनी हा आराखडा मांडून या तालुक्यासाठी मंजूर करून घेतला आहे हे एवढं चांगलं काम करून देखील आपण त्या कामाला गालबोट लावण्याचे काम करत आहात हे तुम्हाला चांगले काम बघवत नाही म्हणून असे नैराश्याने बोलता हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडल्याशिवाय राहात नाही. भाजपाचे तालुकाध्यक्ष म्हणतात की नको त्या विकासकामांची घोषणा राज्य मंत्री करतात अरे तुमच्या डोळ्यावरचा चष्मा बदला म्हणजे तुम्हाला सर्व काही चांगलं दिसेल अध्यक्षांच्या बेलवाडी गावामध्ये जी विकास कामे चालू आहेत ती तरी तुम्ही उघड्या डोळ्याने मान्य करा.बावडा गावांमध्ये तुमच्या वेगवेगळे विकास कामे चालू आहेत ती तरी उघड्या डोळ्यांनी बघा.मागील वीस वर्षात विकासाच्या मुद्द्यावर गप्पा मारून तुम्ही तालुक्याचे खोटं राजकारण केलं म्हणून का तुमच्या नेतृत्वाला जनतेने घरी बसवलं हा प्रश्न मनाला पडल्याशिवाय राहत नाही. खोट बोल पण रेटून बोल ती तुमची संस्कृती आणि तुम्ही आमच्या कर्तुत्वान नेतृत्वावर टीका करता हे का तुमचं विद्वान पण? ग्रामपंचायत सरपंच निवडीवरून देखील तुम्ही खोटं बोललाततिथे देखील तुमचा खोटेपणा आम्ही जनतेपुढे उघड केला तेव्हा कुठे तुम्ही गप्प बसला.येणाऱ्या काळामध्ये जी होणारी विकास कामे आहेत ती विकास कामे बघून नक्कीच तुमचं तोंड बंद झाल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे म्हणून खोटे व बिनबुडाचे आरोप करू नका. येणाऱ्या काळामध्ये राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांचे विकास कामाचे माणस आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगतो हे ऐकूनच तुमचं तोंड बंद होईल.तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लाकडी लिंबोडी उपसा जलसिंचन योजना, शेटफळगडे उपसा जलसिंचन योजना, उजनी धरणातील बुडीत बंधारे, नीरा नदीवरील बंधारे , भाटनिमगाव चे बंधारे, खोरोची मधील बंधारे शेटफळ तलावाची उंची वाढवणे या कामासाठी सर्वस्वी प्रयत्न करून खूप मोठ्या प्रमाणात निधी इंदापूर तालुक्याचा आणण्याचा मानस या नेतृत्वाचा आहे.इंदापूर तालुक्यातील रस्ते चकाचक होत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्या रस्त्यावरून जात _येत असताना देखील तुम्हाला विकास दिसत नाही ही शोकांतिका आहे त्यावेळी  तुम्ही तर तुमची नैतिकता विसरु नका जे सत्य आहे ते स्वीकारा असेआव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे कार्याध्यक्ष अतुल (शेठ) झगडे तालुका उपाध्यक्ष नवनाथ  रूपनवर, जिल्हा सरचिटणीस शिंदे सर यांनी भाजपाच्या स्वयंघोषित विद्वान मंडळींना केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...