मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज, शिवसृष्टी न्यूज


पद्माकर बाबर ला जमीन मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,विनाकारण महिलेला पुढे करून पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांना गोवण्याचा प्रयत्न -संजय सोनवणे

  इंदापूर :कांदलगाव येथील जमीन ही पद्माकर बाबर यांच्या मालकीची असून त्यांचे चुलत बंधू प्रवीण बाबर, चुलते गणपत बाबर, चुलत बंधू सचिन बाबर,व चुलती सुमन बाबर गेल्या पंचवीस वर्षापासून त्या जमिनीवर अतिक्रमण करत असून ती जमीन मालकी हक्काची असल्याचा दावा रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले की कांदलगांव ता.इंदापुर जि.पुणे.येथील मराठा कुटूंबातील गरिब शेतकरी पद्माकर बाबर यांची स्वताची जमीन कागदपत्रे असताना अनेक गुन्हे दाखल असलेला गुंडप्रवृतीचे  प्रविन गणपत बाबर जिवे मारण्याची धमकी देऊन गेली 25 वर्ष गाळपेर नसलेली जमीन वहिवाट करत आहे यावर्षी पद्माकर बाबर यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी जमीनिची दोघांनाही कागदपत्रे घेऊन बोलावले तर प्रविन बाबर चर्चेला सुद्धा आले नाही पोलिसांनी पद्माकर बाबर यांची जमीनीची कागदपत्रे पाहून पद्माकरच्या तक्रारीवरून प्रविन वर 379 गुन्हा दाखल केला आहे, तो खोटा नाही पोलिसांनी सगळ्यांना चांगली वागणूक दिलेली आहे कुणावरही अन्याय केलेला नाही इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सारंगकर साहेबांचं काम अन्याय झाला त्याला न्याय देण्याच आहे, आणि ते न्याय देतात ज्यांच्या खोट्या केसेस साहेब घेत नाहीत ते साहेबांना बदनाम करण्याच काम करत आहेत पद्माकर ची जमीन 


बळकावण्यासाठी दोन मुलांनी आईला थायमिट चे खडे खायला देण ही दुर्देवी घटना घडली आहे,असेही सोनवणे म्हणाले, पुढे म्हणाले की,  त्यांचं गोष्टी चा दबाव टाकून जमिन मिळवण्याचा प्रयत्न आम्हाला दिसुन येत आहे लवकर आम्ही गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेब यांना भेटून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे माहीती संजय सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिलीया वेळी पद्माकर पांडुरंग बाबर, व इतर कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी बोलताना सोनवणे म्हणाले की ती जमीन पद्माकर बाबर यांच्या मालकीची असून तिच्यावर कोणत्याही प्रकारचे गायरान, वन विभाग, किंवा इतर हक्कात ती जमीन नाही, त्या जमिनीचा सातबारा हा पद्माकर यांच्या नावावर असून त्यावर गेली पंचवीस वर्ष बाबर कुटुंब दहशतीने अतिक्रमण करत आहेत.
यावेळी बोलताना सोनवणे म्हणाले की यामध्ये विनाकारण महिलांना पुढे करून इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांना गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे,तसेच प्रवीण बाबर व त्याचे कुटुंबीय हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून यापूर्वी त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे विविध ठिकाणी दाखल आहेत, दबावाच्या व दहशतीच्या जोरावर पंचवीस वर्ष पद्माकर यांच्या मालकीच्या जमीनीवर ते अतिक्रमण करत आहेत, आता पद्माकर याला जमीन मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा यावेळी सोनवणे यांनी दिला.हा कार्यक्रम सोशलडीस्टन्स ठेवून सॅनिटायझ व मास्कचा वापर करून पार पडला,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते