मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज, शिवसृष्टी न्यूज


इंदापूर: केंद्रशासनाच्या इथेनॉल उत्पादनाच्या धोरणामुळे साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळून उभारी घेणेस मदत होईल. तसेच अतिरिक्त साखर साठयाच्या प्रश्नावर पर्याय निघून कारखान्यांवरील कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी, तथा कारखान्याचे अध्यक्ष मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो, यांनी कर्मयोगी कारखान्याच्या बी हेवी मोलॅसिस उत्पादन शुभारंभावेळी व्यक्त केले. सदर बी हेवी मोलॅसिस उत्पादन शुभारंभ मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील व मा.श्रीमती पद्माताई भोसले व्हाईस चेअरमन यांचे शुभहस्ते आज करणेत आला.
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू असून केंद्रशासन व महाराष्ट शासन निर्णयानुसार कारखान्याने बी हेवी मोलॅसिसचे उत्पादन सुरू केलेले आहे. सदर बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल उत्पादन करुन ऑईल कंपनीला पुरवठा करणेत येणार आहे. बी हेवी मोलॅसिस मुळे कारखान्याच्या उत्पादन खर्चात बचत होवून उत्पादित इथेनॉल ऑईल कंपन्यांना पुरवठा केलेने सभासदांना चांगला ऊसाचा दर मिळू शकणार आहे. सध्या देशामध्ये जवळपास 600 कोटी लिटर्स इथेनॉलची मागणी आहे. त्यापैकी महाराष्ट राज्याचे 108 कोटी लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेणेचे उदिदष्ठ आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने या हंगामात 80 लाख ते 1 कोटी लिटर्स इथेनॉल उत्पादनाचे उदिदष्ठ ठेवलेले आहे. त्यास प्रतिलिटर 57 रूपयेप्रमाणे दर मिळणार आहे. महाराष्ट राज्यामध्ये बी हेवी मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मिती करणारे 48 कारखाने आहेत, यामध्ये नव्याने उतरलेले 23 कारखाने आहेत. महाराष्ट शासनाने सहकारी साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती करणेसाठी भांडवलाकरिता व्याज अनुदान दयावे असेही ते म्हणाले.
इथेनॉल प्रकल्पाकरिता केंद्रसरकार 6 टक्के अनुदान देत असून महाराष्ट शासनाने देखील 6 टक्के अनुदान देवून इथेनॉल निर्मितीस सहकारी साखर कारखान्यांना हातभार लावावा. याबाबत साखर संघ, नॅशनल फेडरेशन व संबंधित पेटोलियम कंपन्यांशी पाठपुरावा करीत असलेचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
या हंगामामध्ये 30 टक्के साखर उत्पादन कमी करून त्याऐवजी इथेनॉल निर्मिती वाढविणे हा एकमेव पर्याय साखर कारखानदारीपुढे राहिलेला आहे. भविष्यामध्ये इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरण करणे ही काळाची गरज आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास दुधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील, निरा-भिमा कारखान्याचे संचालक शिर्के दादा, मेघ:शाम पाटील, इंदापूर नगरपालिका उपाध्यक्ष धनंजय पाटील, शेटे सर तसेच कारखान्याचे संचालक श्री. भरत शहा, श्री. भास्कर गुरगुडे, श्री. विष्णू मोरे, श्री. हनुमंत जाधव, श्री. मच्छिंद्र अभंग, श्री. अंकुश काळे, श्री. सुभाष काळे, श्री. प्रशांत सुर्यवंशी, श्री. यशवंत वाघ, श्री. मानसिंग जगताप, श्री. राजेंद्र गायकवाड, श्री. राहूल जाधव, श्री. अंबादास शिंगाडे, श्री. वसंत मोहोळकर, श्री. केशव दुर्गे, श्री. अतुल व्यवहारे, श्री. राजेंद्र चोरमले, श्री. पांडुरंग गलांडे, श्री. सुभाष भोसले, सौ. जयश्री नलवडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.बाजीराव जी. सुतार, व सर्व खाते विभागप्रमुख उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते