मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज


          - भाजपची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
 - शेतमजूरांना धान्य वाटप करा
इंदापूर:प्रतिनिधी दि.9/11/20
          अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या संपुर्ण क्षेत्राचे पंचनामे करण्यात यावेत व दिवाळीपूर्वी शेतकरी व घरांचे नुकसान झालेल्या ग्रामस्थांना शासनाकडून नुकसानीची आर्थिक मदत मिळावी तसेच अतिवृष्टीमुळे शेतमजूरांच्या हाताला काम नसल्याने त्यांना  मोफत धान्य वाटप करण्यात यावे,अशी मागणी  जिल्हा भाजपच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचेकडे करण्यात आली आहे,अशी माहिती भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज सोमवारी (दि.9) दिली.
                  राज्यात अतिवृष्टीने सर्वात जास्त नुकसान पुणे जिल्ह्यात झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी  डॉ.राजेश देशमुख यांची शनिवारी सायंकाळी भेट घेतली व चर्चा केली. यावेळी गावोगावच्या शेतमजुरांच्या हाताला काम उपलब्ध करुन देण्यात यावे,  परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या कामगारांची योग्य ती नोंद जिल्हाधिकारी व अप्पर कामगार आयुक्तांकडे  ठेवण्यात यावी,या मागण्याही  करण्यात आल्या. या सर्व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी  खा.गिरीश बापट, माजी मंत्री संजय भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार बाबुराव पाचार्णे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंधर कामठे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, रविंद्र भेगडे, धर्मेंद्र खांडरे आदीसह  भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व मागण्यांवर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
चौकट :-
       जिल्हा पोलीस प्रमुखांशीही चर्चा !
-----------------------------------
तसेच पुणे जिल्हा भाजपच्या या शिष्टमंडळाने नव्याने नियुक्त झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला व विविध विषयावरती संवाद साधला. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यात यावा, सर्व जनतेला समान न्याय मिळावा, राजकीय हस्तक्षेप होत आहे तो होऊ नये, पोलिसांना निर्भयपणे काम करता आले पाहिजे, अशा मागण्या यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.देशमुख यांच्याकडे केल्याची माहिती भाजपचे नेते व  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
_______________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...