इंदापूर (प्रतिनिधी):गरीब कुटुंबात राहून गरीबी च्या झळा, वेदना ज्यांनी सोसल्या आहेत.आशा ढोले कुटुंबीयांनी या लाखेवाडी परिसरातील शेकडो उपेक्षित,गरीब कुटुंबीयांना दिपवाली सणानिमित्त आनंद भेट वितरण कार्यक्रमामुळे, राज्यावर कोरोना तसेच आपत्तीचे संकट असताना देखील गरीबांना गोड घास खाता येणार असल्याचे गौरवोद्गार कामधेनू सेवा परिवाराचे प्रमुख डॉ.लक्ष्मणराव आसबे यांनी काढले.
जय भवानी गड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी तालुका इंदापूर या संस्थेचे संस्थापक श्रीमंत ढोले यांनी आयोजित केलेल्या दिवाळी आनंद भेट विशेष कार्यक्रमात कामधेनू सेवा परिवाराचे प्रमुख डॉ. लक्ष्मणराव आसबे बोलत होते.बावडा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक बि.एन.लातूरे,इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,मुख्य मार्गदर्शक प्रदीप गुरव,या संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले,संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा निरिक्षक शौकतभाई तांबोळी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचाचे तालुका अध्यक्ष निलकंठ मोहिते,सागर शिंदे , श्रमिक पत्रकार संघ इंदापुर तालुका अध्यक्ष सुरेशराव मिसाळ, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद इंदापुर तालुका सचिव धनंजय कळमकर ,महेश स्वामी, बाळासाहेब सुतार, दिपक शिंदे, जितेंद्र जाधव, दिपक खिलारे, तात्याराम पवार, इमतीयाज मुलाणी, आबासाहेब उगलमोगले, संदिप सुतार,सोमनाथ ढोले,भिमराव आरडे,उदयसिंह जाधव,रामदास पवार,शिवकुमार गुणवरे,आदम पठाण,भिमसेन उबाळे,राजेंद्र भोसले,अक्षय आरडे,तसेच लाखेवाडी गावचे सरपंच सोमनाथ भिंगारदिवे,यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.आसबे म्हणाले की, गोरगरिबांच्या समस्या ज्यांना कळतात ते खर्यां अर्थांने सामाजिक जिवणात यशस्वी होतात.यासाठी दानत हि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.अशीच गोरगरिबांच्या अडचणी दुख: जानणारा ढोले परीवार असुन,आपले धन सुध्दा उत्तम व्यवहारात गुंतवणूक करण्यासाठी सज्ज असतात.ज्या लोकांची मने सर्व दृष्टीने तृप्त झालेले आहेत.तेच लोक दानधर्म करत असतात त्यामुळे याचे सर्व श्रेय त्यांच्या माता-पित्यांना जात असते.एका गरीब कुटुंबातून जन्म घेऊन,गरिबांच्या हजारो मुलाबाळांना अद्ययावत शिक्षण प्रणाली देण्याची भूमिका श्रीमंत ढोले यांनी घेतलेली आहे. माणसाने वासनेला जाळून बहिण-भावाचे नाते निर्माण केले पाहिजे.तरच खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होतो,
या वेळी चित्रलेखा ढोले यांनी उपस्थितांना दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या,
यावेळी उपस्थितांचे स्वागत करताना जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीमंत ढोले म्हणाले की,संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत करण्याची भूमिका सातत्याने ठेवलेली आहे.तर ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षणात पुढे गेला पाहिजे,यासाठी लातूर पॅटर्न ही संस्था राबवत असून,कमी वयाची संस्था असून देखील राज्यांमध्ये अनेक परीक्षेत प्रथम येण्याचा मान या संस्थेतील विद्यार्थ्यांनी मिळवला आहे.
तर कोरोना च्या कालावधीत परिसरातील गावांना स्वच्छ-सुंदर आरोग्य राहण्यासाठी,संस्थेने वेळोवेळी मदत केली आहे.तसेच लाखेवाडी परिसरामध्ये 50 हजार वृक्षलागवड संस्थेच्या माध्यमातून झालेले आहे.आपत्ती ग्रस्त शेतकरी व कोरूना पार्श्वभूमीवर गरीब कुटुंबांचे प्रचंड हाल चालले आहे.त्यामुळे रितीरिवाजाप्रमाणे सालाबाद प्रमाणे दिपवाळी सण या कुटुंबात साजरा व्हावा.या उद्देशाने दिवाळी आनंद भेट मधून सणा साठी लागणारे सर्व साहित्य मोफत वाटप करण्यात आले आहे.आगामी काळात देखील सामाजिक जाणिवेतून काम केले जाईल अशी ग्वाही श्रीमंत ढोले यांनी दिली.
यावेळी उपस्थितांचे स्वागत संस्थेच्या वतीने श्रीमंत ढोले संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले व संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे,यांनी केले तर आभार प्रदिप गुरव यांनी मानले.
टिप्पण्या