मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

जय भवानी गड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी यांच्या वतीने बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील शेकडो कुटुंबियांना दिपावली निमित्त आनंद भेट

इंदापूर (प्रतिनिधी):गरीब कुटुंबात राहून गरीबी च्या झळा, वेदना ज्यांनी सोसल्या आहेत.आशा ढोले कुटुंबीयांनी या  लाखेवाडी परिसरातील शेकडो उपेक्षित,गरीब कुटुंबीयांना दिपवाली सणानिमित्त आनंद भेट वितरण कार्यक्रमामुळे, राज्यावर कोरोना तसेच आपत्तीचे संकट असताना देखील गरीबांना गोड घास खाता येणार असल्याचे गौरवोद्गार कामधेनू सेवा परिवाराचे प्रमुख डॉ.लक्ष्मणराव आसबे यांनी काढले.


         जय भवानी गड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी तालुका इंदापूर या संस्थेचे संस्थापक श्रीमंत ढोले यांनी आयोजित केलेल्या दिवाळी आनंद भेट विशेष कार्यक्रमात कामधेनू सेवा परिवाराचे प्रमुख डॉ. लक्ष्मणराव आसबे बोलत होते.बावडा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक बि.एन.लातूरे,इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,मुख्य मार्गदर्शक प्रदीप गुरव,या संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले,संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा निरिक्षक शौकतभाई तांबोळी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचाचे तालुका अध्यक्ष निलकंठ मोहिते,सागर शिंदे , श्रमिक पत्रकार संघ इंदापुर तालुका अध्यक्ष सुरेशराव मिसाळ, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद इंदापुर तालुका सचिव धनंजय कळमकर ,महेश स्वामी,   बाळासाहेब सुतार, दिपक शिंदे, जितेंद्र जाधव, दिपक खिलारे, तात्याराम पवार, इमतीयाज मुलाणी, आबासाहेब उगलमोगले, संदिप सुतार,सोमनाथ ढोले,भिमराव आरडे,उदयसिंह जाधव,रामदास पवार,शिवकुमार गुणवरे,आदम पठाण,भिमसेन उबाळे,राजेंद्र भोसले,अक्षय आरडे,तसेच लाखेवाडी गावचे सरपंच सोमनाथ भिंगारदिवे,यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


                  पुढे बोलताना डॉ.आसबे म्हणाले की, गोरगरिबांच्या समस्या ज्यांना कळतात ते खर्यां अर्थांने सामाजिक जिवणात यशस्वी होतात.यासाठी दानत हि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.अशीच गोरगरिबांच्या अडचणी दुख: जानणारा ढोले परीवार असुन,आपले धन सुध्दा उत्तम व्यवहारात गुंतवणूक करण्यासाठी सज्ज असतात.ज्या लोकांची मने सर्व दृष्टीने तृप्त झालेले आहेत.तेच लोक दानधर्म करत असतात त्यामुळे याचे सर्व श्रेय त्यांच्या माता-पित्यांना जात असते.एका गरीब कुटुंबातून जन्म घेऊन,गरिबांच्या हजारो मुलाबाळांना अद्ययावत शिक्षण प्रणाली देण्याची भूमिका श्रीमंत ढोले यांनी घेतलेली आहे.  माणसाने वासनेला जाळून बहिण-भावाचे नाते निर्माण केले पाहिजे.तरच खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होतो,
या वेळी चित्रलेखा ढोले यांनी उपस्थितांना दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या,

            यावेळी उपस्थितांचे स्वागत करताना जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीमंत ढोले म्हणाले की,संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत करण्याची भूमिका सातत्याने ठेवलेली आहे.तर ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षणात पुढे गेला पाहिजे,यासाठी लातूर पॅटर्न ही संस्था राबवत असून,कमी वयाची संस्था असून देखील राज्यांमध्ये अनेक परीक्षेत प्रथम येण्याचा मान या संस्थेतील विद्यार्थ्यांनी मिळवला आहे.

तर कोरोना च्या कालावधीत परिसरातील गावांना स्वच्छ-सुंदर आरोग्य राहण्यासाठी,संस्थेने वेळोवेळी मदत केली आहे.तसेच लाखेवाडी परिसरामध्ये 50 हजार वृक्षलागवड संस्थेच्या माध्यमातून झालेले आहे.आपत्ती ग्रस्त शेतकरी व कोरूना पार्श्वभूमीवर गरीब कुटुंबांचे प्रचंड हाल चालले आहे.त्यामुळे रितीरिवाजाप्रमाणे सालाबाद प्रमाणे दिपवाळी सण या कुटुंबात साजरा व्हावा.या उद्देशाने दिवाळी आनंद भेट मधून सणा साठी लागणारे सर्व साहित्य मोफत वाटप करण्यात आले आहे.आगामी काळात देखील सामाजिक जाणिवेतून काम केले जाईल अशी ग्वाही श्रीमंत ढोले यांनी दिली.

              यावेळी उपस्थितांचे स्वागत संस्थेच्या वतीने श्रीमंत ढोले संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले व संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे,यांनी केले तर आभार प्रदिप गुरव यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...