इंदापूर:प्रतिनिधी
श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर येथील महापुराची भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.15) पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिक व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
या भेटीच्या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामस्थांना दिलासा दिला व सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,अशी ग्वाही दिली.घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरलेल्या ग्रामस्थांना व दुकानदारांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. तसेच भीमा व नीरेच्या पुराने पाण्याखाली गेलेल्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली.
दरम्यान, गुरुवारी दिवसभरात पुणे जि.प. सदस्या कु.अंकिता पाटील तसेच नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनीही श्रीक्षेत्र निरा नरसिंहपूरला भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली व अडचणी कळात आंम्ही तुमच्या बरोबर आहोत,अशी ग्वाही दिली.
_______________________________
टिप्पण्या