मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापुर:माजी सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते , सोमवार दि.५/१०/२०२० रोजी  श्री. केतकेश्वर मंगल कार्यालय निमगाव केतकी येथे श्रमीक पत्रकार संघ, इंदापूर तालुका अखिल भारतीय गरीब निर्मुल समिती विश्व वारकरी सेना संघटना या सर्व प्रमुख पदाधिकारी व जेष्ठ पत्रकार यांचा  गौरव समारंभ संपन्न झाला.हर्षवर्धन पाटील  यावेळी बोलताना म्हणाले की ,"श्रमिक  पत्रकार संघ हा पत्रकारिता क्षेत्रातील प्रामाणिक पणे काम करणारे संघटन असून, आपली नैतिकता जपून समाजहित करण्याकडे त्यांचा स्थापनेपासूनच मोठा वाटा आहे. ही पत्रकारिता क्षेत्रातील एक चळवळ असून या चळवळीशी जोडलेल्या सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो या वेळी तालुका अध्यक्ष सुरेशराव मिसाळ,  
देविदास राखुंडे, राहुल ढवळे, विजयराव शिंदे, शिवाजी पवार, इमतीयाज मुलाणी, इ,पदाधिकारी यांचा सन्मान हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, 
अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समिती च्या  नवनिर्वाचित पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष काकासाहेब मांढरे तर पुणे जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय कळमकर ,प्रशिध्दीप्रमुख दिपकराव खिलारे, उपाध्यक्ष असिफभाई शेख, हमीदभाई आतार या पदाधिकाऱ्यांचे सन्मान करण्यात आला, 
  गरिबी निर्मुलनाची चळवळ इंदापुरात प्रभावीपणे राबवावी . कोणत्याही पदाच्या जबाबदाऱ्या ह्या अधिकारा सहीत असतात  त्यासाठी  प्रामाणिक काम करण्याची तयारी ठेवावी लागते  यासाठी  आपणाला मनःपूर्वक शुभेच्छा देतो आपले हार्दिक अभिनंदन करतो . ते पुढे म्हणाले   विश्व वारकरी सेना संघटना च्या सर्व ह. भ. प .महाराजांनी तालुक्यात वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान 
उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. नैतीक आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे संस्कार आपल्या किर्तनाच्या माध्यमातून  व्हावे . वारकरी संप्रदायाची परंपरा खूप मोठी असून या परंपरेत विचारांचं अधिष्ठान मोठे आहे माऊली सुद्धा 
स्वतःला महत्त्व न देता वाचावी ज्ञानेश्वरी असे म्हणतात त्यामुळे ग्रंथ हाच गुरु असतो.  ज्ञानेश्वरीचे तत्वज्ञान हे जगातील महान तत्त्वज्ञान आहे  हे तत्वज्ञान आपल्या माध्यमातून  सर्वसामान्य लोकांपर्यंत  गेले पाहिजे त्यादृष्टीने प्रयत्न आपण करावेत .आपणा सर्व पदाधिकाऱ्याना माझ्या व संपूर्ण इंदापूर तालुक्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो अशा शब्दात माननीय हर्षवर्धन पाटील साहेबांनी सर्वच पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले आणि  सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे   आयोजन श्री.अमोलराजे इंगळे मित्र परिवार यांनी केले होते. सौजन्य शिवराज ज्वेलर्स  यांचे लाभले  होता त्यांचेही यावेळी उत्तम आयोजनासाठी हर्षवर्धन पाटील यांनी  विशेष  आभार मानले.
या वेळी जेष्ठ पत्रकार विकास शहा, संदेश शहा, राजेंद्र कवडे देशमुख, धनंजय कळमकर, शौकतभाई तांबोळी,काकासाहेब मांढरे, कैलास(भाऊ) पवार, दिपक खिलारे, संतोष दहिदुले, सिध्दार्थ मखरे, जावेद मुलाणी, नानासाहेब चांदणे, जितेंद्र जाधव,प्रविण  नगरे, मयूर देवकर, असिफभाई शेख, इतर पत्रकार उपस्थित होते हा कार्यक्रम सोशल डिस्टंनस पाळून सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला आहे, 
या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम कैलास भाऊ पवार यांनी घेतले आहे, तरी त्यांना साथ जितेंद्र जाधव, दिपकराव खिलारे, यांनी दिली, तर या कार्यक्रमाचे सौजन्य शिवराज ज्वेलर्स चे मालक व भावी जिल्हा परिषद सदस्य अमोलराजे इंगळे यांनी केले आहे, 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते