मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

                   इंदापुर; संपूर्ण देशामध्ये मंदिरे व धार्मिक स्थळे उघडी असताना, महाराष्ट्र राज्यातच मंदिरे व धार्मिक स्थळांना उघडण्यास बंदी घालण्यात आली आहे, ही निषेधार्ह बाब आहे. राज्य शासनाने जनतेच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तात्काळ मंदिरे सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
                श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर (ता.इंदापूर) येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मी- नृसिंह मंदिरासमोर शनिवारी (दि.29) राज्यातील मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, या मागणीसाठी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करून  'उद्धवा दार उघड ' अशी  जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 
                   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारने देशातील मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिलेली आहे, त्यामुळे तिरुपती बालाजीसह देशभरातील मंदिरे व धार्मिक स्थळे सुरू करण्यात आली आहेत. राज्यात इतर सर्व व्यवहार सुरू असताना फक्त मंदिराचे दरवाजे राज्य शासनाने बंद केले आहेत. मात्र राज्यातील सर्व मंदिरे जनतेला दर्शनासाठी उघडण्यासाठी राज्य सरकारला भाजप भाग पाडले.
        मार्च महिन्यांपासून मंदिरे बंद असल्याने मंदिरे असलेल्या गावातील हजारो लोकांची  उपजीविका धोक्यात आली आहे, त्यामुळे शासनाने नियम व अटी घालून मंदिरे व धार्मिक स्थळे जनतेसाठी खुली करावीत,अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
               यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावास तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले निष्क्रिय मंत्री जबाबदार असल्याची टीका केली. तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंत्र्याकडे नियोजनाचा अभाव आहे तसेच कोरोना रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका केली.
      यावेळी धार्मिक संघटनांच्या वतीने मंदिरासमोर भजन करण्यात आले.श्री लक्ष्मी- नरसिंह देवस्थान हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे.
             यावेळी इंदापूर तालुका भाजपचे नूतन अध्यक्ष शरद जामदार, तानाजी थोरात, मारुती वनवे, ह.भ.प.अंकुश रणखांबे, सचिन सावंत यांची भाषणे झाली. या आंदोलनामध्ये नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह  पाटील, मयूरसिंह पाटील, महेंद्र रेडके, महादेव घाडगे, किरण पाटील, श्रीमंत ढोले, अमरसिंह पाटील, मनोज पाटील, राम आसबे, हरिभाऊ घोगरे, बाळासाहेब मोहिते, नाथाजी मोहिते, आण्णा काळे, राजेंद्र मोहिते, हनुमंत काळे, संतोष मोरे, विलास ताटे, किशोर मोहिते, पवन घोगरे, सुभाष काळे, शंकर घोगरे, प्रदीप बोडके, अभय वांकर, भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ व धार्मिक क्षेत्रातील मंडळींनी सहभाग घेतला.
________________________________
 
संपादक विलासराव गाढवे,संपादक धनंजय कळमकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...