मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

                   इंदापुर; संपूर्ण देशामध्ये मंदिरे व धार्मिक स्थळे उघडी असताना, महाराष्ट्र राज्यातच मंदिरे व धार्मिक स्थळांना उघडण्यास बंदी घालण्यात आली आहे, ही निषेधार्ह बाब आहे. राज्य शासनाने जनतेच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तात्काळ मंदिरे सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
                श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर (ता.इंदापूर) येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मी- नृसिंह मंदिरासमोर शनिवारी (दि.29) राज्यातील मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, या मागणीसाठी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करून  'उद्धवा दार उघड ' अशी  जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 
                   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारने देशातील मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिलेली आहे, त्यामुळे तिरुपती बालाजीसह देशभरातील मंदिरे व धार्मिक स्थळे सुरू करण्यात आली आहेत. राज्यात इतर सर्व व्यवहार सुरू असताना फक्त मंदिराचे दरवाजे राज्य शासनाने बंद केले आहेत. मात्र राज्यातील सर्व मंदिरे जनतेला दर्शनासाठी उघडण्यासाठी राज्य सरकारला भाजप भाग पाडले.
        मार्च महिन्यांपासून मंदिरे बंद असल्याने मंदिरे असलेल्या गावातील हजारो लोकांची  उपजीविका धोक्यात आली आहे, त्यामुळे शासनाने नियम व अटी घालून मंदिरे व धार्मिक स्थळे जनतेसाठी खुली करावीत,अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
               यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावास तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले निष्क्रिय मंत्री जबाबदार असल्याची टीका केली. तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंत्र्याकडे नियोजनाचा अभाव आहे तसेच कोरोना रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका केली.
      यावेळी धार्मिक संघटनांच्या वतीने मंदिरासमोर भजन करण्यात आले.श्री लक्ष्मी- नरसिंह देवस्थान हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे.
             यावेळी इंदापूर तालुका भाजपचे नूतन अध्यक्ष शरद जामदार, तानाजी थोरात, मारुती वनवे, ह.भ.प.अंकुश रणखांबे, सचिन सावंत यांची भाषणे झाली. या आंदोलनामध्ये नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह  पाटील, मयूरसिंह पाटील, महेंद्र रेडके, महादेव घाडगे, किरण पाटील, श्रीमंत ढोले, अमरसिंह पाटील, मनोज पाटील, राम आसबे, हरिभाऊ घोगरे, बाळासाहेब मोहिते, नाथाजी मोहिते, आण्णा काळे, राजेंद्र मोहिते, हनुमंत काळे, संतोष मोरे, विलास ताटे, किशोर मोहिते, पवन घोगरे, सुभाष काळे, शंकर घोगरे, प्रदीप बोडके, अभय वांकर, भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ व धार्मिक क्षेत्रातील मंडळींनी सहभाग घेतला.
________________________________
 
संपादक विलासराव गाढवे,संपादक धनंजय कळमकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते