मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज


 इंदापूर, ता. २२ तरंगवाडी ( ता. इंदापूर ) येथील ह.भ.प मल्हारी रामचंद्र खिलारे (गुरुजी) वय (८४ वर्षे) यांचे अकलूज येथीलखासगीरुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे दि.१९ ऑगस्ट रोजी निधन झाले. मागील आठवड्यामध्ये त्यांना न्यूमोनिया या आजाराने ग्रासले होते. त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाल्यामुळे त्यांची अँटिजेन रॅपिड टेस्ट करण्यात आली. यामध्ये ते कोरोना बाधीत असल्याचे आढळून आल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता अकलुज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.तब्बल सहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती.परंतु अचानक त्यांच्या प्रकृतीत बिघाड होवून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागील दहा वर्षापूर्वी त्यांच्यावर अँजोप्लास्टीकरण्यात आली होती. त्यांना उच्च रक्तदाब, दमा, साखर यासारखे आजार त्यांना होते. मल्हारी खिलारे यांनी खडतर परिस्थितीमध्ये आई-वडील अशिक्षित असतानासुद्धा शिक्षण घेवून गुरुजी ही पदवी घेवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरीकेली. पिटकेश्वर पंचक्रोशीत न्यायनिवाड्यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या दोन्ही मुला-मुलींना उच्चशिक्षित केल्याने त्यांनाहीनोकरीला लावले.त्याचबरोबर दोन लहान भाऊ यांना उच्चपदी सरकारी नोकरदार बनवले.त्यानंतर सेवानिवृत्तीस काही वर्ष बाकी असताना ते कुटुंबासह तालुक्यातील तरंगवाडी येथेस्थायिक झाले. ते सुरवाती पासून वारकरीसांप्रदायिक होते. त्यांना वाचन,गायनाची आवड होती. त्यांचे अनेक अभंग,गौळणी,चालीरितीसह तोंडपाठ होत्या. घराण्याचा वारसा पुढे सुरु रहावा याकरिता त्यांनी तरंगवाडी-गोखळी या दोन गावांची एकत्रित मिळून रामकृष्ण हरी सांप्रदायिक पायी दिंडीची स्थापना केली.श्री. संत तुकाराम महाराज पायीपालखीसोहळ्यात ते पंचवीस वर्षापासून दिंडीसह सहभागी होत होते. तरंगवाडी गावात अखंड हरिनामसप्ताह सुरु करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदानदिले आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबाहेर चलन लिहिण्याचे काम केले. त्यांनी निराधार,विधवा महिला यांना सरकारी योजनेचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे तरंगवाडी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.पत्रकार दीपक खिलारे यांचे ते आजोबा होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...