इंदापूर, ता. २२ तरंगवाडी ( ता. इंदापूर ) येथील ह.भ.प मल्हारी रामचंद्र खिलारे (गुरुजी) वय (८४ वर्षे) यांचे अकलूज येथीलखासगीरुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे दि.१९ ऑगस्ट रोजी निधन झाले. मागील आठवड्यामध्ये त्यांना न्यूमोनिया या आजाराने ग्रासले होते. त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाल्यामुळे त्यांची अँटिजेन रॅपिड टेस्ट करण्यात आली. यामध्ये ते कोरोना बाधीत असल्याचे आढळून आल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता अकलुज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.तब्बल सहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती.परंतु अचानक त्यांच्या प्रकृतीत बिघाड होवून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागील दहा वर्षापूर्वी त्यांच्यावर अँजोप्लास्टीकरण्यात आली होती. त्यांना उच्च रक्तदाब, दमा, साखर यासारखे आजार त्यांना होते. मल्हारी खिलारे यांनी खडतर परिस्थितीमध्ये आई-वडील अशिक्षित असतानासुद्धा शिक्षण घेवून गुरुजी ही पदवी घेवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरीकेली. पिटकेश्वर पंचक्रोशीत न्यायनिवाड्यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या दोन्ही मुला-मुलींना उच्चशिक्षित केल्याने त्यांनाहीनोकरीला लावले.त्याचबरोबर दोन लहान भाऊ यांना उच्चपदी सरकारी नोकरदार बनवले.त्यानंतर सेवानिवृत्तीस काही वर्ष बाकी असताना ते कुटुंबासह तालुक्यातील तरंगवाडी येथेस्थायिक झाले. ते सुरवाती पासून वारकरीसांप्रदायिक होते. त्यांना वाचन,गायनाची आवड होती. त्यांचे अनेक अभंग,गौळणी,चालीरितीसह तोंडपाठ होत्या. घराण्याचा वारसा पुढे सुरु रहावा याकरिता त्यांनी तरंगवाडी-गोखळी या दोन गावांची एकत्रित मिळून रामकृष्ण हरी सांप्रदायिक पायी दिंडीची स्थापना केली.श्री. संत तुकाराम महाराज पायीपालखीसोहळ्यात ते पंचवीस वर्षापासून दिंडीसह सहभागी होत होते. तरंगवाडी गावात अखंड हरिनामसप्ताह सुरु करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदानदिले आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबाहेर चलन लिहिण्याचे काम केले. त्यांनी निराधार,विधवा महिला यांना सरकारी योजनेचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे तरंगवाडी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.पत्रकार दीपक खिलारे यांचे ते आजोबा होते.
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या