इंदापूर, ता. २२ तरंगवाडी ( ता. इंदापूर ) येथील ह.भ.प मल्हारी रामचंद्र खिलारे (गुरुजी) वय (८४ वर्षे) यांचे अकलूज येथीलखासगीरुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे दि.१९ ऑगस्ट रोजी निधन झाले. मागील आठवड्यामध्ये त्यांना न्यूमोनिया या आजाराने ग्रासले होते. त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाल्यामुळे त्यांची अँटिजेन रॅपिड टेस्ट करण्यात आली. यामध्ये ते कोरोना बाधीत असल्याचे आढळून आल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता अकलुज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.तब्बल सहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती.परंतु अचानक त्यांच्या प्रकृतीत बिघाड होवून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागील दहा वर्षापूर्वी त्यांच्यावर अँजोप्लास्टीकरण्यात आली होती. त्यांना उच्च रक्तदाब, दमा, साखर यासारखे आजार त्यांना होते. मल्हारी खिलारे यांनी खडतर परिस्थितीमध्ये आई-वडील अशिक्षित असतानासुद्धा शिक्षण घेवून गुरुजी ही पदवी घेवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरीकेली. पिटकेश्वर पंचक्रोशीत न्यायनिवाड्यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या दोन्ही मुला-मुलींना उच्चशिक्षित केल्याने त्यांनाहीनोकरीला लावले.त्याचबरोबर दोन लहान भाऊ यांना उच्चपदी सरकारी नोकरदार बनवले.त्यानंतर सेवानिवृत्तीस काही वर्ष बाकी असताना ते कुटुंबासह तालुक्यातील तरंगवाडी येथेस्थायिक झाले. ते सुरवाती पासून वारकरीसांप्रदायिक होते. त्यांना वाचन,गायनाची आवड होती. त्यांचे अनेक अभंग,गौळणी,चालीरितीसह तोंडपाठ होत्या. घराण्याचा वारसा पुढे सुरु रहावा याकरिता त्यांनी तरंगवाडी-गोखळी या दोन गावांची एकत्रित मिळून रामकृष्ण हरी सांप्रदायिक पायी दिंडीची स्थापना केली.श्री. संत तुकाराम महाराज पायीपालखीसोहळ्यात ते पंचवीस वर्षापासून दिंडीसह सहभागी होत होते. तरंगवाडी गावात अखंड हरिनामसप्ताह सुरु करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदानदिले आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबाहेर चलन लिहिण्याचे काम केले. त्यांनी निराधार,विधवा महिला यांना सरकारी योजनेचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे तरंगवाडी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.पत्रकार दीपक खिलारे यांचे ते आजोबा होते.
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या