इंदापूर: शहर नागरी संघर्ष समिती व जय इन्स्टिट्यूट यांच्यावतीने दत्तनगर येेथील नर्सिंग कॉलेज येथे कारगील मधील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले, तसेच मुंबई येथील श्री, माने व सौ. वैशाली माने यांनी कोरोनात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी जयंत नायकुडे , प्रा. कृष्णा ताटे , अॅड. नारायणराव ढावरे, गफुरभाई सय्यद सामाजिक कार्यकर्ते संतोषराव देवकर, हर्षवर्धन कांबळे , प्रवीण पवार, मोहन शुक्ल, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते,
या वेळी अशोकराव पोळ यांनी समता सैनिक दल यांच्यावतीने उभयतांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला या कार्यक्रमांमध्ये श्री व सौ माने यांचा सत्कार करण्यात आला माने यांची यशोगाथा सांगताना प्रा. कृष्णा ताटे बोलताना म्हणाले श्री. माने दाम्पत्यांची यशोगाथा फार मोठी आहे कोरोना काळात त्यांनी केलेली कामगिरी ही अभिमानस्पद आहे, भारत देशाला अशा कोविड योध्या ची गरज आहे. सौ.वैशाली माने यांनी स्वतः रुग्णांची सेवा केली जय इन्स्टिट्यूटच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी असलेल्या सौ.माने मुंबईतील हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत त्या शासकीय सेवेत असल्यातरी जनसेवा म्हणूनच त्या
कोरोनाग्रस्तची सेवा करत आहेत वैशाली माने या प्रेग्नेंट असतानाही ही प्रेग्नन्सी रजा न घेता रुग्णांची सेवा केली अनेक रुग्णांना मदत केली, अनेक रुग्ण बरे होण्यासाठी त्यांना औषध उपचार पुरवला आपल्या व्यवसायिक तत्त्वाला बांधील राहून त्यांनी मुंबईमध्ये चार महिने सेवा केली.
बारावी विज्ञान ची परीक्षा पास झाले एम एस सी केली एम एस सी नंतर शरीर विज्ञान शास्त्र या विषयांमध्ये पीएचडी करून डॉक्टरेट मिळवली कोरोना च्या काळामध्ये हजारो रुग्ण मृत्युमुखी पडले ज्या रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक त्यांना पाहण्यासाठी सुद्धा येत नव्हते त्यांच्या अंत्यविधीची जबाबदारी घेत नव्हते अशा परिस्थितीत माने यांनी या हजारो मृत कोरोना.
रूग्णा वरती अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी घेतली अंत्यसंस्कार केले प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक केली ते कधीही कोरूना पॉझिटिव्ह झाले नाहीत दोघेही पती-पत्नी रात्रंदिवस कष्ट करून कोरोणा रुग्णाची सेवा आपापल्या कार्यक्षेत्रात करत होते अशा या पती-पत्नीचा सत्कार इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला हा सत्कार घडवून आणण्यासाठी जय इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष जयंत नायकुडे यांनी पुढाकार घेतला संघर्ष समितीने यापूर्वीही ही कोरोना काळात स्थलांतरितांना अन्नदान, पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची तपासणी, नगरपालिकेच्या कर्मचार्यांची तपासणी, गरजूंना औषध व मास्क वाटप करण्यात आले, हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार सोशल डिस्टंनस पाळून सॅनिटायझरचा वापर करूण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला,
टिप्पण्या