मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापूर: शहर नागरी संघर्ष समिती व  जय इन्स्टिट्यूट यांच्यावतीने दत्तनगर येेथील नर्सिंग कॉलेज येथे कारगील मधील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले,  तसेच मुंबई येथील श्री, माने व सौ. वैशाली माने यांनी कोरोनात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी जयंत नायकुडे , प्रा. कृष्णा ताटे , अॅड. नारायणराव ढावरे, गफुरभाई सय्यद सामाजिक कार्यकर्ते संतोषराव देवकर, हर्षवर्धन  कांबळे ,  प्रवीण पवार, मोहन शुक्ल, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते,
या वेळी  अशोकराव पोळ यांनी समता सैनिक दल यांच्यावतीने उभयतांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला  या कार्यक्रमांमध्ये श्री व सौ माने यांचा सत्कार करण्यात आला माने यांची यशोगाथा सांगताना प्रा. कृष्णा ताटे बोलताना म्हणाले श्री.  माने दाम्पत्यांची यशोगाथा फार मोठी आहे कोरोना काळात त्यांनी केलेली कामगिरी ही अभिमानस्पद आहे, भारत देशाला अशा कोविड योध्या ची गरज आहे. सौ.वैशाली माने यांनी स्वतः रुग्णांची सेवा केली जय इन्स्टिट्यूटच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी असलेल्या सौ.माने मुंबईतील हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत त्या शासकीय सेवेत असल्यातरी जनसेवा म्हणूनच त्या 
कोरोनाग्रस्तची सेवा करत आहेत वैशाली माने या प्रेग्नेंट असतानाही ही प्रेग्नन्सी रजा न घेता रुग्णांची सेवा केली अनेक रुग्णांना मदत केली, अनेक रुग्ण बरे होण्यासाठी त्यांना औषध उपचार पुरवला आपल्या व्यवसायिक तत्त्वाला बांधील राहून त्यांनी मुंबईमध्ये चार महिने सेवा केली.
बारावी विज्ञान ची परीक्षा पास झाले एम एस सी केली एम एस सी नंतर शरीर विज्ञान शास्त्र या विषयांमध्ये पीएचडी करून डॉक्टरेट मिळवली कोरोना च्या काळामध्ये हजारो  रुग्ण मृत्युमुखी पडले ज्या रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक त्यांना पाहण्यासाठी सुद्धा येत नव्हते त्यांच्या अंत्यविधीची जबाबदारी घेत नव्हते अशा परिस्थितीत माने यांनी या हजारो मृत कोरोना. 
रूग्णा वरती अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी घेतली अंत्यसंस्कार केले प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक केली ते कधीही कोरूना पॉझिटिव्ह झाले नाहीत दोघेही पती-पत्नी रात्रंदिवस कष्ट करून कोरोणा रुग्णाची सेवा आपापल्या कार्यक्षेत्रात करत होते अशा या पती-पत्नीचा सत्कार इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला हा सत्कार घडवून आणण्यासाठी जय इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष जयंत नायकुडे यांनी पुढाकार घेतला संघर्ष समितीने यापूर्वीही ही कोरोना काळात स्थलांतरितांना अन्नदान, पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची तपासणी, नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांची तपासणी, गरजूंना औषध व  मास्क वाटप करण्यात आले, हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार सोशल डिस्टंनस पाळून सॅनिटायझरचा वापर करूण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...