मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

पालखी महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत- हर्षवर्धन पाटील
            इंदापूर: तालुक्यातील भवानीनगर ते लुमेवाडी दरम्यान च्या गावातील रस्त्यालगतचे क्षेत्र जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी संपादित होणार आहे. या महामार्गसाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत,असे प्रतिपादन राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री  हर्षवर्धन पाटील यांनी केले.इंदापूर येथे बुधवारी (दि.15) भूसंपादन शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बारामती विभागाचे प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाटील बोलत होते.
   पालखी महामार्गसाठी भूसंपादित इंदापूर तालुक्यातील शेतकरी, व्यापारी आणि रहिवासी यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आपल्या न्याय मागण्यासाठी निवेदन दिले होते तसेच कोणकोणत्या प्रकारच्या अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते याविषयी आपले प्रश्न मांडले होते. या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बारामती विभागाचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते.
     हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' पुणे जिल्ह्यातील 39 गावांपैकी 22 गावे इंदापूर तालुक्यातील या पालखी महामार्गसाठी भू संपादित आहेत. तालुक्यातील भवानीनगर ते लुमेवाडी असा 73 किलोमीटर रस्ता या संपादनासाठी आहे. एकूण 3044 शेतकऱ्यांचे भूसंपादन यासाठी होणार आहे. त्यांच्या या संदर्भात अनेक महत्वपूर्ण समस्या असून या समस्यांना प्राधान्य देऊन त्यांच्या न्याय्य हक्कासाठी प्रयत्न झाला पाहिजे. सदर संपादीत होत असलेले क्षेत्र इंदापूर तालुक्यातील शेतकरी, व्यापारी आणि रहिवासी यांचे असल्याने त्यांच्या पुढील मागण्यास न्याय मिळावा. ताबेवहिवटी प्रमाणे सर्व संपादित क्षेत्राची मोजणी करून प्रत्यक्ष संपादित क्षेत्र समजावे. चालू अस्तित्वातील रस्ता सोडून भूसंपादनाचा मोबदला मिळावा. पंचनामा, बांधकाम मूल्यांकन रिपोर्ट ( व्हॅल्यूएशन रिपोर्ट ), जॉईंट मेजरमेंट सर्व्ह या सर्व कादपत्रंची उपलब्धता करून देण्यात यावी.फळबागांचे पंचनामे, ( व्हॅल्यूएशन रिपोर्ट ), उपलब्ध करून देणे.रस्ता अलाईमेंट नकाशे उपलब्ध करून देणे. यासारखे प्रश्न प्राधान्याने सोडवून त्यांना न्याय द्यावा.
     प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले तसेच यावर त्वरित उपाययोजना करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या शिष्टमंडळास सांगितले.
      यावेळी संतोष देशमुख,डॉ. सुभाष सावंत, उमेश मेहर, अशोक भोसले, राजेंद्र कुरुळे, अजिनाथ कदम, चंद्रसेन कोरटकर, राजेंद्र निंबाळकर, आबासाहेब निंबाळकर, उमेश कोकाटे, नवनाथ डाके, शिवाजी तरंगे, शिवाजी शिंदे, देवबा जाधव, रामदास कोरटकर, चंद्रकांत कोकाटे उपस्थित होते.
________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...