मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापूर: कोपर्डीच्या ताईला तात्काळ न्याय मिळावा, मराठा समाजाच्या विविध मागण्या शासनाने मान्य कराव्यात, या आशयाचे निवेदन सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांना सोमवारी (दि.13) देण्यात आले.सदरचे निवेदन पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, ऋतुजा नायकुडे, निकिता पवळ, प्रतिभा करपे तसेच जयंत नायकुडे, प्रा. कृष्णा ताटे, पवन घोगरे, प्रवीण पवार, राम आसबे, सचिन सावंत, प्रेमकुमार जगताप,भारत जामदार आदींनी तहसिदारांना दिले.
              कोपर्डीच्या भगिनीचा दि.13 जुलै रोजीचा स्मृती दिन राज्यभर मराठा समाज हा काळा दिवस म्हणून पाळत आहे. अनेक वर्षांपासून मराठा समाज हा आपल्या कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळावा म्हणून शांततेच्या मार्गाने प्रयत्न करीत आहे, परंतु आजही कोपर्डीच्या ताईस न्याय मिळू शकला नाही.त्या  आरोपींना तात्काळ न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे, यासाठी सरकार गंभीर दिसत नाही. मराठा समाज रेकॉर्ड ब्रेक संख्येने न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरला,परंतू कोपर्डीच्या भगिनीला जनतेने निवडून दिलेले सरकार न्याय देत नाही यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. यावर्षी आम्ही राज्यसरकारला जागे करण्यासाठी राज्यातील मराठा समाज शांततेच्या मार्गाने  निषेध करीत आहे व कोपर्डीच्या नराधमांना एक महिन्याच्या आत फाशी द्यावी,अशी आमची मागणी आहे, यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत, असे निवेदनात नमूद करण्यात आहे.तसेच मराठा आरक्षण कायम राहावे यासाठी सरकारने आपली बाजू न्यायालयामध्ये ताकदीने मांडली पाहिजे
यासाठी अभ्यास असणारे कायदेतज्ज्ञ नेमावेत.आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजातील गरीब आणि होतकरू युवकांना राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत यासाठी कायदा करावा व कर्ज द्यावे.राज्यातील प्रत्येक जिल्यात सरकारी वसतिगृह मराठा समाजातील युवकांसाठी निर्माण करावे.सारथी संस्थेमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्याचा चौकशी अहवाल तत्काळ आणावा व संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करावेत.सारथी बाबत आठ कोटी रूपये ची बोळवण न करता पाचशे कोटी रूपये देण्यात यावेत.मराठा आंदोलनातील शहिद कुटुंबियांच्या घरातील एका व्यक्तीस एस.टी.महामंडळात सामावून घेणे व प्रत्येक कुटंबाला ५० लाख रूपया पर्यंत मदत जाहीर करावी.राज्यात मराठा आरक्षण चळवळीच्या काळात मराठा युवकावरील खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत या बाबत ज्या युवकावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या युवकाची बाजू मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी एकदा ऐकून घेण्यात यावी. मराठा समाजातीत १३५०० हुन जास्त युवकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत याबाबत  सर्व गुन्हांची पुन्हा चौकशी करण्यात यावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकाच्या कामास सरकारने येत्या दोन महिन्यात सुरवात करावी व याबाबत कामाचा अहवाल दर आठ दिवसांनी जनतेला देण्यात यावा,आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.दरम्यान,निवेदनातील सर्व मागण्या शासनाकडे पाठविण्यात येतील,असे तहसीलदार तहसीलदार सोनाली मेटकरी यांना यावेळी सांगितले. 
________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते