मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापुर:साखरेचा किमान विक्री दर व एफआरपी यांचा समन्वय बसत नसल्याने साखर उद्योग गेली 3 वर्षांपासून अडचणीत आलेला आहे. या अडचणीतून साखर उद्योगाला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) रू. 3500 करावा, अशी मागणी राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.19) केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
               साखर कारखान्यांचा साखर उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी, सद्य:स्थितीमध्ये उत्पादन खर्च व एफआरपीची तुलना करता साखर कारखान्यांना प्रतिटन सुमारे रू.400 एवढा तोटा सहन करावा लागत आहे. या अडचणीतून साखर उद्योगाला बाहेर काढण्यासाठी साखरेचा किमान  विक्री दर हा रू.3100 वरून रू. 3500 करणे अत्यावश्यक आहे.या मागणीसाठी  केंद्र सरकारकडे विविध स्तरावरून  पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
              ते पुढे म्हणाले, साखरेचा उत्पादन खर्च व  उसाची एफआरपीची रक्कम यांचा ताळमेळ बसत नसल्याने साखर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये गेले आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर कमी आहेत तसेच  देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला उठाव नसल्याने साखर उद्योग अडचणीत आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम देण्यास साखर कारखान्यांना आर्थिक अडचणी येत आहेत. 
                गेल्या चार-पाच वर्षांपासून राज्यातील साखर कारखानदारी ही साखरेचे घसरलेले दर, दुष्काळी परिस्थिती यामुळे तोट्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपीची रक्कम वेळेवर देण्यासाठी व कारखानदारीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने साखरेचा प्रति क्विंटलला किमान विक्री दर (एमएसपी) रू. 3500 करण्याचा निर्णय घ्यावा,असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
                दरम्यान, लॉकडानमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा साखर उद्योगावर विपरीत परिणाम झालेला आहे,निर्यात बंद आहे, व्यापाऱ्यांकडून साखरेला फारसा उठाव नाही. या साखर उद्योगाच्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये साखरेचा किमान विक्री दर रु.3500 पर्यंत वाढविल्याशिवाय शेतकऱ्यांच्या एफआरपीचा व  कामगारांचा विषय मार्गी लागणार नाही.तसेच साखरेच्या दरात थोडीशी वाढ झाली तरीही  ग्राहकांच्या मासिक बजेटमध्ये फारशी वाढ होणार नाही,असेही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
_______________________________
फोटो:- हर्षवर्धन पाटील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते