मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज,शिवसृष्टी न्युज

इंदापुर तालुक्यातील  बिजवडी येथील कर्मयोगी साखर कारखान्यात वाहतूकदारांची संवाद साधताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.
इंदापूर : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे  यंदाचे  ऊस गळीत हंगामात 14 लाख टनाचे गाळपाचे  उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सभासदांनी नोंदलेला सर्व ऊसगाळप करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे माजी सहकारमंत्री कर्मयोगी चे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
मंगळवार  2 जून रोजी बिजवडी येथील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात तोडणी वाहतूकदार यांच्या बैठकीत माजी मंत्री पाटील यांच्या हस्ते ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे  उस तोड्णी वाहतूकीच्य करारास शुभारंभ करण्यात आला. वाहतूक करणाऱ्या वाहन धारंकाना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा उचलीचे वाटप करण्यात आले आहे .
 यावेळी पाटील वाहतूकदारांना मार्गदर्शन करताना बोलत होते पाटील पुढे म्हणाले कर्मयोगी साखर कारखान्याच्या वाहतूक करायला सुरुवात झाली असून पाचशे बैल गाड्या ,450 ट्रक व  ट्रॅक्टर, पाच हार्वेस्टर आणि ४००  बजाट 
याचे नियोजन केलेले आहे. 
यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात 35 हजार  एकराची नोंद झाली असून 14 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवलेले आहे उसाची परिस्थिती उत्तम असून यंदा पावसाचे लवकर आगमन झालेने एकरी ऊस उत्पादनात वाढ होणार असली तरी सभासदांचा  नोंदलेला  सर्व ऊस गाळपाला घेणार आहोत. गेल्या गळीत हंगामात दुष्काळामुळे व  उस वाहतूक यंत्रणेच्या कमतरतेमुळे सर्वच कारखान्यांचे गाळप 
कमी प्रमाणात झाले.  यंदाच्या गळीत हंगामाची सर्व तयारी जवळपास पूर्ण होत आली  असून लॉक डाऊन उठल्यानंतर कारखाना मशिनरीची  दुरुस्ती  सुरू करण्यात येणार असून जुन्या  प्लॅन्ट मध्ये मशिनरीची निगा व दुरूस्तीची  गरज नसून नवीन प्लॅन्ट मध्ये ती केली जाणार आहे.  बॉयलींग हाऊस तसेच आसावनी  प्रकल्प  सुस्थितीत असून लॉकडाऊन   शिथिल झाल्यानंतर  अधिकारी-कर्मचारी हे चांगल्या पद्धतीने नियोजन करणार आहेत.  तसेच ऊस  उत्पादक शेतकऱ्यांचे काही देणी राहिले आहेत, तसेच वाहन  धारंकाचे  काही देणे राहिलेले आहेत.  तसेच  कामगारांच्या  पगाराचा प्रश्न देखिल  संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन तातडीने मार्गी लावण्यात येणार आहे. यावरती  योग्य त्या उपाय योजनेचे कामकाज जलद गतीने सुरू आहे. कारखान्याना   एफआरपी प्रमाणे सर्व रक्कम उस   उत्पादकांना अदा  करणार आहे.तरी 
 सभासदांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यास   पिकवीलेला सर्व ऊस गाळपासाठी द्यावा असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार  कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले.
 तर सूत्रसंचालन कार्यालय अधीक्षक शरद काळे यांनी केले. यावेळी कारखान्याचे संचालक भरत शहा, भास्कर गुरगुडे, सुभाष काळे आदी सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते .
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते