मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज,शिवसृष्टी न्युज

इंदापुर तालुक्यातील  बिजवडी येथील कर्मयोगी साखर कारखान्यात वाहतूकदारांची संवाद साधताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.
इंदापूर : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे  यंदाचे  ऊस गळीत हंगामात 14 लाख टनाचे गाळपाचे  उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सभासदांनी नोंदलेला सर्व ऊसगाळप करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे माजी सहकारमंत्री कर्मयोगी चे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
मंगळवार  2 जून रोजी बिजवडी येथील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात तोडणी वाहतूकदार यांच्या बैठकीत माजी मंत्री पाटील यांच्या हस्ते ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे  उस तोड्णी वाहतूकीच्य करारास शुभारंभ करण्यात आला. वाहतूक करणाऱ्या वाहन धारंकाना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा उचलीचे वाटप करण्यात आले आहे .
 यावेळी पाटील वाहतूकदारांना मार्गदर्शन करताना बोलत होते पाटील पुढे म्हणाले कर्मयोगी साखर कारखान्याच्या वाहतूक करायला सुरुवात झाली असून पाचशे बैल गाड्या ,450 ट्रक व  ट्रॅक्टर, पाच हार्वेस्टर आणि ४००  बजाट 
याचे नियोजन केलेले आहे. 
यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात 35 हजार  एकराची नोंद झाली असून 14 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवलेले आहे उसाची परिस्थिती उत्तम असून यंदा पावसाचे लवकर आगमन झालेने एकरी ऊस उत्पादनात वाढ होणार असली तरी सभासदांचा  नोंदलेला  सर्व ऊस गाळपाला घेणार आहोत. गेल्या गळीत हंगामात दुष्काळामुळे व  उस वाहतूक यंत्रणेच्या कमतरतेमुळे सर्वच कारखान्यांचे गाळप 
कमी प्रमाणात झाले.  यंदाच्या गळीत हंगामाची सर्व तयारी जवळपास पूर्ण होत आली  असून लॉक डाऊन उठल्यानंतर कारखाना मशिनरीची  दुरुस्ती  सुरू करण्यात येणार असून जुन्या  प्लॅन्ट मध्ये मशिनरीची निगा व दुरूस्तीची  गरज नसून नवीन प्लॅन्ट मध्ये ती केली जाणार आहे.  बॉयलींग हाऊस तसेच आसावनी  प्रकल्प  सुस्थितीत असून लॉकडाऊन   शिथिल झाल्यानंतर  अधिकारी-कर्मचारी हे चांगल्या पद्धतीने नियोजन करणार आहेत.  तसेच ऊस  उत्पादक शेतकऱ्यांचे काही देणी राहिले आहेत, तसेच वाहन  धारंकाचे  काही देणे राहिलेले आहेत.  तसेच  कामगारांच्या  पगाराचा प्रश्न देखिल  संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन तातडीने मार्गी लावण्यात येणार आहे. यावरती  योग्य त्या उपाय योजनेचे कामकाज जलद गतीने सुरू आहे. कारखान्याना   एफआरपी प्रमाणे सर्व रक्कम उस   उत्पादकांना अदा  करणार आहे.तरी 
 सभासदांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यास   पिकवीलेला सर्व ऊस गाळपासाठी द्यावा असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार  कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले.
 तर सूत्रसंचालन कार्यालय अधीक्षक शरद काळे यांनी केले. यावेळी कारखान्याचे संचालक भरत शहा, भास्कर गुरगुडे, सुभाष काळे आदी सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते .
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...