इंदापुर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी साखर कारखान्यात वाहतूकदारांची संवाद साधताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.
इंदापूर : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे यंदाचे ऊस गळीत हंगामात 14 लाख टनाचे गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सभासदांनी नोंदलेला सर्व ऊसगाळप करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे माजी सहकारमंत्री कर्मयोगी चे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
मंगळवार 2 जून रोजी बिजवडी येथील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात तोडणी वाहतूकदार यांच्या बैठकीत माजी मंत्री पाटील यांच्या हस्ते ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे उस तोड्णी वाहतूकीच्य करारास शुभारंभ करण्यात आला. वाहतूक करणाऱ्या वाहन धारंकाना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा उचलीचे वाटप करण्यात आले आहे .
यावेळी पाटील वाहतूकदारांना मार्गदर्शन करताना बोलत होते पाटील पुढे म्हणाले कर्मयोगी साखर कारखान्याच्या वाहतूक करायला सुरुवात झाली असून पाचशे बैल गाड्या ,450 ट्रक व ट्रॅक्टर, पाच हार्वेस्टर आणि ४०० बजाट
याचे नियोजन केलेले आहे.
यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात 35 हजार एकराची नोंद झाली असून 14 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवलेले आहे उसाची परिस्थिती उत्तम असून यंदा पावसाचे लवकर आगमन झालेने एकरी ऊस उत्पादनात वाढ होणार असली तरी सभासदांचा नोंदलेला सर्व ऊस गाळपाला घेणार आहोत. गेल्या गळीत हंगामात दुष्काळामुळे व उस वाहतूक यंत्रणेच्या कमतरतेमुळे सर्वच कारखान्यांचे गाळप
कमी प्रमाणात झाले. यंदाच्या गळीत हंगामाची सर्व तयारी जवळपास पूर्ण होत आली असून लॉक डाऊन उठल्यानंतर कारखाना मशिनरीची दुरुस्ती सुरू करण्यात येणार असून जुन्या प्लॅन्ट मध्ये मशिनरीची निगा व दुरूस्तीची गरज नसून नवीन प्लॅन्ट मध्ये ती केली जाणार आहे. बॉयलींग हाऊस तसेच आसावनी प्रकल्प सुस्थितीत असून लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अधिकारी-कर्मचारी हे चांगल्या पद्धतीने नियोजन करणार आहेत. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे काही देणी राहिले आहेत, तसेच वाहन धारंकाचे काही देणे राहिलेले आहेत. तसेच कामगारांच्या पगाराचा प्रश्न देखिल संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन तातडीने मार्गी लावण्यात येणार आहे. यावरती योग्य त्या उपाय योजनेचे कामकाज जलद गतीने सुरू आहे. कारखान्याना एफआरपी प्रमाणे सर्व रक्कम उस उत्पादकांना अदा करणार आहे.तरी
सभासदांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यास पिकवीलेला सर्व ऊस गाळपासाठी द्यावा असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले.
तर सूत्रसंचालन कार्यालय अधीक्षक शरद काळे यांनी केले. यावेळी कारखान्याचे संचालक भरत शहा, भास्कर गुरगुडे, सुभाष काळे आदी सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते .
टिप्पण्या