मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  इंदापूर शहरात कोरोना वाढताना दिसत असून वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोरोना चाचण्या वाढविण्यास प्राधान्य देण्याची अधिकची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री  हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर नगरपरिषद मध्ये आयोजित केलेल्या आढावा बैठकीमध्ये केले. 
  इंदापूर शहरारात बारा दिवसात कोरोनाचे 13 नवीन रुग्ण आढळून आल्याने बुधवार दि.17 जून रोजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर नगरपरिषदेच्या कार्यालयात अधिकारी वर्गाची आढावा बैठक घेतली.यावेळी पाटील यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्याधिकारी डाॅ.प्रदीप ठेंगल,नगरसेवक भरत शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील,गटनेते कैलास कदम यांनी शहरतील  सद्यस्थिती व उपाययोजना या बाबत पाटील यांच्याशी संवाद साधला. 
  हर्षवर्धन पाटील म्हणाले कि,  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना चाचण्याना अधिकचे प्राधान्य देण्याची गरज आहे.सध्या शहरी भागात कोरोनाचा विळखा वाढला असल्याने एन.आय.व्ही.मध्ये शहरातील कोरोना चाचण्याना अधिकचे प्राधान्य दिले जात आहे. साहजिकच त्यामुळे ग्रामीण भागातील तपासण्या कमी होतात. शिवाय तपासणी अहवाल मिळण्यासही विलंब लागत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने  एन. आय. व्ही. मध्ये जादा स्टाफ नेमून ग्रामीण भागातील तपाण्याना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. 
 शहरातील वाढता प्रादुर्भाव रोखन्यासाठी पाटील यांनी नगरपरिषद प्रशासनास काही सुचना देखील दिल्या. यावेळी पाटील म्हणाले कि, ज्यावेळी शहरात एकही रुग्ण नव्हता त्यावेळी नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत होते. मात्र आज परिस्थिती उलट आहे.शहरात रुग्ण वाढत असताना मात्र नागरिक याला गांभीर्याने घेत नाहीत. असे चित्र पहायला मिळत आहे. याला रोखन्यासाठी नगरपरिषदेने राज्य सरकार व जिल्हाधिकारी यांना लेखी पत्राव्दारे अनुक्रमे इंदापूर शहरातील संपर्कातील नागरिकांच्या जास्तीत जास्त घशातील स्त्रवाचे नमुने तपासणीला प्राधान्य द्यावे. इंदापूर शहरातील नागरिकांच्या ऑक्सिजन लेवल तपासण्या करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनास किट पुरवण्यात यावेत. शिवाय शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात यावा. या कामी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मदत मिळावी अशा अशायाच्या विविध मागण्या तात्काळ कराव्यात अशा सुचना हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या. 
 याशिवाय शहरातील सर्वच नगरसेवक व पदाधिकारी यांनी आपले योगदान देऊन शहरात नागरिकामध्ये जनजागृती करावी. शहरातील वाढता धोका कसा कमी करता येईल यासाठी उपाययोजना कराव्यात. बाहेरील शहरातुन इंदापूर शहरात दाखल होणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यावरती लक्ष ठेऊन लक्षणे जावणताच याची कल्पना प्रशासनास द्यावी तरच हा संसर्ग आपण रोखू शकतो. तसेच नागरिकांनी व्यापाऱ्यानी स्वयंशिस्त ठेऊन शासनाच्या अटींच्या अधीन राहून व्यवहार करण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर शहरातील जनतेला केले आहे. 
  यावेळी शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद, नगरसेवक जगदीश मोहीते,पांडुरंग शिंदे,गुड्डू मोमीन, रमेश धोत्रे,जावेद शेख आणि नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते