मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापूर: शहरात कोरोनाच्या लॉकडाऊन परिस्थितीत गोरगरिब लोकांचे हाल होत होते . अशा परिस्थितीत  शहरातील दानशूर लोक देखील आपआपल्या परिने मदत करीत होते . पण हि मदत विशेषपणे प.पू.डाॅ.  बाबासाहेब आंबेडकर नगर , आण्णा भाऊ साठे नगर , सिद्धार्थनगर , लोकमान्य नगर , रामोशी गल्ली , वडार गल्ली या भागात मदतीची गरजवंताना गरज असताना तोकडी मदत होत होती तर शासन केवळ गहू , तांदूळ या दोनच वस्तूचे वाटप करीत होते , अशा स्थितीत काय करावं म्हणून अॅड नारायण ढावरे  व सतत सामाजिक कार्यातअग्रेसर आसणारे सामाजिक कार्यकर्ते  बाळासाहेब सरवदे विचार करीत होते . त्याच वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधाना नुसार जीवीत व व्यक्तीगत स्वातंत्र्य दिले आहे . मूलभूत हक्काच्या अनुच्छेद २१नुसार अन्न हक्क ,जीवीत हक्क समावेश केला आहे व नगरपालिका जबाबदारी व कर्तव्य संविधान परिशिष्ठ १२व अनुच्छेद २४३ ब नुसार निश्चित केले आहे . तर महा नगरपालिका अधिनियम १९६५ अन्वये कलम ४९ ( ट) नुसार व इतर कलमा अन्वये मुख्याधिकारी यांचे कर्तव्य आणि अधिकार दिलेले आहेत . याची जाणीव झाली .त्यानुसार  नारायण ढावरे व बाळासाहेब सरवदे यांनी मुख्याधिकारी डॉ.प्रदिप ठेंगल यांचेकडे अर्ज दिला , त्यानंतर  विचारमंथन ग्रुपचे मार्गदर्शक अरविंद वाघ यांचेशी चर्चा केली , तर मुख्याधिकारी डॉ ठेंगल व भरतशेठ शहा  यांचेशी माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे , प्रा कृष्णा ताटे,भावी नगरसेवक दादा सोनवणे , आरपीआयचे संघटक सचिव शिवाजीराव मखरे , वंचित आघाडीचे हनुमंत कांबळे ,संदीपान कडवळे, प्रा . अशोक मखरे ,  अनिल पवार  व इतर मान्यवरांनी सकारात्मक चर्चा करुन जीवनावश्यक वस्तू किट योग्यपणे वाटप करण्याचा निर्णय घेतला ,
       त्या अगोदर अनेक नगरसेवकांना फोनद्वारे , समक्ष भेटून किट वाटपाची मागणी करा म्हणून विनंती केली होती मात्र एकाने हि धाडस दाखवले नाही , आज मात्र श्रेय घेण्यासाठी वाद निर्माण करू पाहत आहेत . त्यांना ऐवढेच सांगणे आहे . हे सर्व डॉ .बाबासाहेब आंबडेकरांनी संविधानात्मक केलेल्या तरतूदी मुळे शक्य झाले आहे .....
    पुन्हा एकदा माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने इंदापूर नगर परिषदेचे  मुख्याधिकारी डॉ . प्रदिप ठेंगल , नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांचे जाहीर आभार ...... तसेच वरील परिसरात नगरपालिकेचे हेड क्लार्क श्री .गजानन पुंडे , श्री .अशोकराव चिंचकर व इतर कामगारांनी प्रमाणिकपणे किट वाटपाचे काम केले त्या सर्वांचे आभार 
    तसेच सर्व पत्रकार बांधवांचे जाहीर आभार वेळोवेळी आमच्या विनंतीस मान देऊन बातम्या दिल्या म्हणून मानण्यात आले आसल्याची माहिती अॅड,.नारायणराव ढावरे व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांनी शिवसृष्टी न्युज संपादक धनंजय कळमकर व लक्ष्मी वैभव न्युज चे संपादक विलासराव गाढवे यांच्या शी बोलताना दिली.या वेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित या दरम्यान सोशल डिस्टंनस पाळण्यात आला, मास्कचा वापर करण्यात आला.शासनच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते