इंदापुर:तालुक्यातील निरा नरसिंहपुर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉक डाऊन केले त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली . सुतार समाज हा ग्रामीण भागात खेडेगावांमध्ये शेतकर्यांना शेती विषयक अवजारे बनवुन देण्याचे काम करतो.आणि कामाच्या बदल्यात तो शेतकी माल शेतकर्यांना कडून घेतो किंवा काही लोग त्याच्या बदल्यात पैसे देत असतात आणि त्यावर ते आपला जीवनाचा उदरनिर्वाह करतात
हातावरचे पोट असणाऱ्या सुतार समाजाचा फर्निचर व इतर दैनंदिन लाकूडकाम व्यवसाय बंद असल्याने हा वर्ग अडचणीत सापडला आहे.
घरगुती व इतर फर्निचरचे काम बंद असल्याने सुतार कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या आठवडय़ातपासून काम बंद असल्याने व आगामी काही दिवस काम बंद राहणार असल्याने या कारागीरांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे बाहेर काम करता येत नाही. त्यातच जीवनाशक्य वस्तू संपल्या असून रोज हातावरचे पोट असल्याने पैसे आणायचे कोठून हा प्रश्न त्यांना सतावत आहे.
सुतारकाम या क्षेत्रातील कामगार हे असंघटित कामगार आहे. गोरगरीब सुतार काम करीत असलेल्या या समाजावर कोरोना व संचारबंदीमुळे अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. आज जवळपास ८०% समाज अजूनही कारागिरी व लाकडी फर्निचरचेच काम करतो. आता यंत्रांनी पारंपरिक काम करणार्यांनी जागा घेतल्याने तसेच हा समाज कोरोना व संचारबंदीमुळे पूर्णपणे खचला आहे. खेड्यापाड्यातील सुतारकाम करणाऱ्याची स्थिती यापेक्षाही भयानक आहे.
या कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने प्रत्येक गावातील शासकीय अधिकाऱ्यामार्फत माहिती मागवून समाजाला योग्य ती मदत देण्याची गरज आहे.

टिप्पण्या