मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात भाजीपाला,फळे विकणा-या व्यापाऱ्याकडून सामान्य नागरिकांची आडवणूक व्यापारी , दलाल यांच्याकडून शेतकऱ्याचा माल कवडीमोल भावांनी खरेदी ; सामान्य नागरिका कडून संताप
  इंदापूर :जगभरामध्ये कोरोना आजाराने थैमान घातले असताना भारतामध्ये लॉकडाऊन आणि संचारबंदी आसल्यामुळे प्रत्येक नागरिक त्याचे कुटुंब घरांमध्येच बसून आहे. अशा काळामध्ये इंदापूर तालुका मध्ये ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भाजीपाला, फळे अत्यावश्यक सेवा मधील वस्तुची विक्री करण्यास परवानगी दिली असताना इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात व्यापाऱ्यांंकडून भाजीपाला , फळे जादा भावात विक्री केली जात आहे .अनेक ठिकाणी भाजीपाला फळे विकण्यासाठी व्यापारी बसले असता ग्रामीण भागातील महिला , नागरिक यांच्याकडून चढ्या भावात बटाटा, लसूण , कांदे अनेक भाज्या खेरदी करतानां व्यापाय्रांकडून आडवणूक केली जाते.व्यापारी व दलाल यांच्याकडून निलावामध्ये शेतकऱ्याकडून कवडीमोल दराने भाजीपाला, फळे खरेदी करतात. व्यापारी , दलाल कलिंगड, टरबुज , चकू, पाच रुपये , सात रूपये किलो दराने भाजीपाला दोन रुपये , हिरवी मिरची ,पंधरा रुपये , बटाटा दहा रुपये ते पंधरा. रुपये रुपये , कमीत कमी सतरा रुपये दराने दर पाडून मागितला जातोय , खरेदी केला जातो . सामान्य नागरिकाला बटाटा ३० ते ४० रुपये किलो, लसून दीडशे ते दोनशे रुपये किलो, मिरची असेल, भाज्या आसतील अत्यावश्यक सेवा मध्ये समाविष्ट आसतानां सुध्दा चढ्या भावाने आणि जादा दराने अडवणूक करून खरेदी करण्यास भाग पाडतात .ग्रामीण भागातल्या बँक , एटीएम बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांकडे पैसा उपलब्ध नसल्याने अतिशय गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सरकारने अत्यावश्यक सेवा साठा करणाय्रावर आणि जादा दराने माल विकणाय्रावर कायदेशीर कारवाई करू असा आदेश काढला असताना सुद्धा अनेक ग्रामीण भागात भाजीपाला, फळे वगैरे खरेदी करतानां सामान्य नागरिकांकडून आडवणूक करून माल खरेदी करण्यास भाग पाडलं जातयं आडवणूक करून पैसे घेतले जातात. तुम्हाला घ्यायचा असला तर घ्या नाही तर घेऊ नका अशी अरेरावीची भाषा बोलली जाते .सामान्य नागरिकांची लूट केली जाते अनेक भाजीपाला , फळे खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांनी सांगितलं कि, शासनाने तात्काळ लक्ष घालून ह्या साठे बाजार करणाऱ्या व्यापारी व भाजपाला चढ्या दराने विकणाय्रावर कायदेशीर कारवाई करावी आणि रास्त भावात भाजीपाला ,फळे या संकट काळात सामान्य नागरिकांना विक्री करावा अशी अनेक नागरिकांनी संपत प्रतिक्रिया दिल्या. मुख्य खरेदी विक्री या ठिकाणी जो सकाळी निलाव आसतो तेथे शेतकऱ्यांंकडून बटाटा १० ते १५ रुपये पर्यंत खरेदी केला जातो. ग्रामीण भागात सध्या ग्राहकांना ३० ते ४० रुपये किलोने विकला जातो .लसून असेल , कांदा असेल हा चढ्या दरात विकला जातोय जर अशा चढ्या भावाने विकला तर ह्या इतक्या मोठ्या संकटांमध्ये नागरिकांनी जनता व देश आसतानां कसं जीवन जगायचं हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे .सदर प्रशांसन अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील नागरिकांकडून विनंती केली आहे कि , सदर जिथे जिथे भाजीपाला , फळे विकले जातो तिथे पाळत ठेवून किंवा जो व्यापारी जादा दराने व आडवणूक करुन माल विकतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी अनेक नागरिकांनी व महिलांनी संपत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक तर जमाव बंदी प्रत्येकाने अंतर ठेवून सुरक्षित माल खरेदी करत असताना अनेक ठिकाणे सुरक्षेचा बोजवारा उडतो हे दिसत आहे.जादा भाव ( दर ) सांगितल्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांमध्ये वाद निर्माण होतात त्या वादामुळे अनेक लोक एकत्र येतात त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे . त्यामुळे प्रशांसन अधिकारी यांनी सर्वांनी या गोष्टीकडे गांभीर्य घेऊन त्याची दखल घेऊन तात्काळ असे जे व्यापारी व दलाल शेतकऱ्यांचा कवडीमोल भावाने कलिंगड , टरबूज , हिरवी मिरची, पालेभाज्या , फळे खरेदी करतात आणि चढ्या भावामध्ये ग्राहकाला विकतात यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आशी मागणी जनतेतून होत आहे. हे तर मग अश आहे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणारे या म्हणी प्रमाणे काही आपल्या भारत देशावर संकट आसतानां , संकटाचा काळ असताना सुद्धा पैसे कमवायला व साठे बाजार करून पैसे कमवून पैशाचे व्यवहार करणारे महाभाग लोकं या देशात सुद्धा असला घाणेरडा प्रकार करतात अशा अनेक नागरिकांनी व महिलांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या . संकटात मदत करायचं सोडून आडवणूक करून माल खरेदी , विक्री केला जातोय अनेक महिलांनी आपल्या तिखट प्रतिक्रिया दिल्या. सदर प्रशांसनाने तात्काळ जिथे-जिथे भाजीपाला , फळे विक्री केली जातो तेथे गुप्त पाळत ठेवून कुठला व्यापारी साठे बाजार करून ग्राहकांना चढ्या भावात विक्री करतो त्याच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी सामान्य नागरिकांतून मागणी होत आहे.--------




====================================

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...