स्थानिक गट व गणातील ग्रामस्थांचा आयात उमेदवाराला प्रचंड विरोध. इंदापूर तालुक्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीचे वारे मोठ्या प्रमाणात वाहत असुन. तालुक्यातील पुढाऱ्यांनी स्वताच्या बगलबच्यांच्या कल्याणासाठी गण व गट निर्माण केले. असले तरी गण व गटातील आरक्षणा मुळे पेच निर्माण झाला आहे. अशी चर्चा सुरू झाली आहे. आणि त्यातून आपल्या गण व गटात संधी मिळत नाही. म्हणून दुसऱ्याच्या गण आणी गटात उभारायचे, गाव पुढाऱ्यांचा मनसुबा आहे. आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा डाव आहे. पण गण व गटातील नागरिकांचा प्रचंड विरोध असुन, आपल्या गण गटात आपली सोय करावी. आम्ही दुसऱ्यांच्या सतरंज्या उचलायला कुणाचे बांधिल नाही. अशी लोकांत चर्चा आहे. नेमका कुठला पक्ष आयात उमेदवार देतोय, त्या पक्षाला जबर किंमत मोजावी लागणार.अन्यथा आम्ही विरोधी गटाला आतुन मदत करू, आयात उमेदवारांची चांगलीच जिरवू असा लोकांन मध्ये सुर आहे.त्यामुळे मोठ मोठ्या पुढाऱ्यांनी पंचायत होणार आहे. खोबरे तिकडे चांगभले म्हणणार्यांची काय अवस्था होईल. हा येणारा काळच ठरवेल.त्यामुळे तालुक्यातील नेतृत्व...
सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई माने -कोळेकर घरोघरी जाऊन भावांचे औक्षणकरून दिली मिठाई भेट.
इंदापूर: भाऊबीज हा रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून. प्रेम आणि विश्वासाचा सन आहे. ज्यांना बहिण किंवा भाऊ नाही. तेही हा सण उत्साहात साजरा करू शकतात. दिवाळीतील महत्वाचा आणि भाऊ, बहिणीच्या अतुट नात्याचा सण म्हणून भाऊबीजे कडे पाहीले जाते. बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्या साठी. सुखासाठी प्रार्थना करते. तर भाऊ बहीणीला भेट वस्तू देऊन तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. जवळच्या किंवा शेजारच्या व्यक्तीला भाऊ भाऊ मानून त्याला टिळा लावून. औक्षण केले जाते. त्यामुळे मैत्रीचे नाते अधिक दृढ होते. धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या भाऊबीज हा केवळ रक्ताच्या नात्या पुरता मर्यादित नसून. प्रेम विश्वास आणि संरक्षणाच्या भावनेतून जोडल्या गेलेल्या पवित्र नात्याचा उत्सव आहे. असे सरपंच सुप्रियाताई माने -कोळेकर म्हणाल्या.