मुंबई प्रतिनीधी :(सतिश वि.पाटील) प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर मतदार याद्या विभाजित केल्या जातील. १ जुलैपर्यंत मतदार यादीत जे नाव असेल ते गृहीत धरून मतदार निश्चित होतील असं राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यात राज्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. आगामी निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत निवडणूकपूर्व तयारीची माहिती दिली. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, ४ महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यानुसार मनपा, जिल्हा परिषद, नगरपालिका अशा सर्व निवडणुकांचा कार्यक्रम टप्प्याटप्याने घेण्यात येईल. नाशिकमध्ये ५...
सरडेवाडी :-विठ्ठल महाडिक म्हणजे. दिलेला शब्द पाळणारा नेता सरडेवाडी येथील शेतकऱ्यांनी मागणी करताच काही काही तासातच ट्रान्सफॉर्मर (डि पी) बसविला शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. दि.६/९/००२५रोजी. ट्रान्सफॉर्मर जळाला होता. शेतकऱ्यांनी वरिष्ठांना तक्रार करूनही काही उपयोग झाला नाही. शिवनेरी नगर, गायकवाड वस्ती,जाधव वस्ती, देवकाते वस्ती ऐकाड वस्ती,येथील शेतकरी व घरगुती ग्राहक हैराण झाले होते.विठ्ठल महाडिक साहेब यांना कळताच काही तासातच ट्रान्सफॉर्मर डि पी बसला.एक पैसाही न खर्च करता डि पी बसविला त्या मुळे गणेश गायकवाड, सुरेश ऐकाड, सागर गायकवाड, दादा राऊत, सोमनाथ देवकाते,आल्हाबक्ष पठाण,सागर विटकर यांनी दत्ता मामा भरणे विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक साहेब यांचे आभार मानले.