मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वडापुरी -माळवाडी गटात, गणात आयात उमेदवाराला दाखवणार आस्मान,

स्थानिक गट व गणातील ग्रामस्थांचा आयात उमेदवाराला प्रचंड विरोध. इंदापूर तालुक्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीचे वारे मोठ्या प्रमाणात वाहत असुन. तालुक्यातील पुढाऱ्यांनी स्वताच्या बगलबच्यांच्या कल्याणासाठी  गण व गट निर्माण केले. असले तरी गण व गटातील आरक्षणा मुळे पेच निर्माण झाला आहे. अशी चर्चा सुरू झाली आहे. आणि त्यातून आपल्या गण व गटात संधी मिळत नाही. म्हणून दुसऱ्याच्या गण आणी गटात उभारायचे, गाव पुढाऱ्यांचा मनसुबा आहे. आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा डाव आहे. पण गण व गटातील नागरिकांचा प्रचंड विरोध असुन, आपल्या गण गटात आपली सोय करावी. आम्ही दुसऱ्यांच्या सतरंज्या उचलायला कुणाचे बांधिल नाही. अशी लोकांत चर्चा आहे. नेमका कुठला पक्ष आयात उमेदवार देतोय, त्या पक्षाला जबर किंमत मोजावी लागणार.अन्यथा आम्ही विरोधी गटाला आतुन मदत करू, आयात उमेदवारांची चांगलीच जिरवू असा लोकांन मध्ये सुर आहे.त्यामुळे मोठ मोठ्या पुढाऱ्यांनी पंचायत होणार आहे. खोबरे तिकडे चांगभले म्हणणार्‍यांची  काय अवस्था होईल. हा येणारा काळच ठरवेल.त्यामुळे तालुक्यातील नेतृत्व...
अलीकडील पोस्ट

सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई माने -कोळेकर घरोघरी जाऊन भावांचे औक्षणकरून दिली मिठाई भेट.

इंदापूर:  भाऊबीज हा रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून.  प्रेम आणि विश्वासाचा सन आहे. ज्यांना बहिण किंवा भाऊ नाही. तेही हा सण उत्साहात साजरा करू शकतात.  दिवाळीतील महत्वाचा आणि भाऊ, बहिणीच्या अतुट नात्याचा सण म्हणून भाऊबीजे कडे पाहीले जाते. बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्या साठी.  सुखासाठी प्रार्थना करते. तर भाऊ बहीणीला भेट वस्तू देऊन तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. जवळच्या किंवा शेजारच्या व्यक्तीला भाऊ भाऊ मानून त्याला टिळा लावून.  औक्षण केले जाते. त्यामुळे मैत्रीचे नाते अधिक दृढ होते. धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या भाऊबीज हा केवळ रक्ताच्या नात्या पुरता मर्यादित नसून. प्रेम विश्वास आणि संरक्षणाच्या भावनेतून जोडल्या गेलेल्या पवित्र नात्याचा उत्सव आहे. असे सरपंच सुप्रियाताई माने -कोळेकर म्हणाल्या.

स्व.मंगेशबाबा पाटील प्रतिष्ठान व पतंजली योग समिती च्या संयुक्त विद्यमाने संगीतमय दिवाळी पहाट हा कार्यक्रम धुमधडाक्यात

 इंदापूर स्व.मंगेशबाबा पाटील प्रतिष्ठान व पतंजली योग समिती इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर शहरांमध्ये संगीतमय दिवाळी पहाट हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक व दोन नगरपालिके शेजारी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी ओंकार साळुंखे बालगंधर्व पुरस्कार सन्मानित सर्व कलाकार स्वरवृंद ग्रुप यांनी सर्व कलाकारांनी पहाटेची भक्ती गीते भावगीते दिवाळी गीते या सुमधुर गीतांची मैफिल करत इंदापूरकरांची मने जिंकली या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते त्यावेळी त्यांनी माझे सहकारी स्व. मंगेश पाटील यांची आठवण आणि त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचे काम गेले चार वर्षे दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित करून शेखर पाटील हे या कार्यक्रमाचे आयोजन करतात त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले यापुढेही असेच कार्यक्रम जीवनामध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा हा जपला पाहिजे असे उद्गगार यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी काढले या कार्यक्रमासाठी स्व.मंगेशबाबा पाटील प्रतिष्ठानचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे पतंजली परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते ...

भारतीय पत्रकार संघाने अनेकांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य

वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ  पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक  कार्यातही अग्रगण्य असणाऱ्या भारतीय पत्रकार संघाकडून यंदा गरीब कुटुंबातील सदस्यांना दिवाळीचा फराळ घरपोच देण्यात आल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटताना पहावयास मिळाल्या आहेत. यावेळी भारतीय पत्रकार संघाच्या बारामतीसह पुणे शहर विभागाकडून फराळ वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.या आनंददायी उपक्रमामुळे भारतीय पत्रकार संघाला समाजात मानाचे स्थान मिळाले असल्याची भावना पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष रमेश ( मामा ) गणगे पाटील यांनी व्यक्त केली.  भारतीय पत्रकार संघाकडून यापूर्वी आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, पूरग्रस्तांना मदत असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत .परंतु यावर्षी दीपावली निमित्त गरीब कुटुंबातील सदस्यांना फराळ वाटप करण्याचा निर्णय पुरंदर मधील निरा - शिवतक्रार ग्रामपंचायत कार्यालय येथे  नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला होता . या बैठकीत भारतीय पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बारामती तालुक्याचे नवनिर्वाचि...

समाजातील दुर्बल घटकांपर्यंत सणाचा आनंद पोहोचविणे हीच खरी दिवाळी - महारुद्र पाटील

इंदापूर, सणाच्या उत्साहात स्वतःच्या आनंदाबरोबर इतरांच्या चेहऱ्यावरही हसू उमटविण्याचा प्रयत्न करणं, हीच खरी दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. याच भावनेतून इंदापूर शहरातील श्रावण बाळ अनाथ आश्रम येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अनाथ बालकांसाठी दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला. समाजातील वंचित घटकांपर्यंत सणाचा आनंद पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.आसे मत महारूद्र पाटील कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर यांनी व्यक्त केले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, शहराध्यक्ष ॲड. इनायातअली काझी, तालुका महिला अध्यक्षा छाया पडसळकर, तसेच राजीव करडे, गणेश देवकर, अमोल मुळे, समद सय्यद, आप्पासाहेब गायकवाड, विकास खिलारे, अक्षय कोकाटे, केशव भापकर, दादा थोरात, भारत जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी मुलांना फराळ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला. बालकांच्या निरागस हास्याने वा...

वडापुरी गणात आणखी एका इच्छुकाने थोपटले दंड.

इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचे आरक्षणही स्पष्ट झाले असून संभाव्य उमेदवार मतदार संघ आपल्याच वाट्याला या अपेक्षेने मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत.  भारतीय जनता पार्टीचे प्रविण भैय्या माने यांचे खंदे समर्थक इंदापूर तालुका बाजार समितीचे माजी संचालक सरडेवाडी येथील राजाराम सागर यांनी थोपटले दंड आयात उमेदवारा विरोधात शंभर टक्के लढणारच. कार्यकर्ते, मित्र परिवार, मतदार बंधु भगिनी व आमचे नेते प्रविण भैय्या माने यांच्या पाठबळावर नक्कीच विजयश्री खेचून आणू असे राजाराम सागर म्हणाले.विविध गावात जलजीवन योजनाही अपूर्ण अवस्थेत असल्याने पाण्यासाठीही नागरिकांना धावाधाव करावी लागते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही. यावर कोणताही पक्ष आक्रमक भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.पण माळवाडी वडापुरी गटातून राजाराम सागर यांच्या नावाला जनतेतून पंसती दर्शविली जात आहे,

ग्रामीण संस्थेचे कार्य कौतुकास्पद -भालेराव

वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ  एकीकडे दिवाळी साजरी होत असताना पुरंदर हवेलीतील मुस्लिम समाजासह इतर समाजातील निराधार तसेच गरीब व गरजू कुटूंबातील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा , त्यांचीही दिवाळी गोड व्हावी याउद्देशाने गेली १८ वर्षांपासून वंचित घटकांना फराळ वाटप करणाऱ्या ग्रामीण संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत जेष्ठ विधितज्ञ विजय भालेराव यांनी व्यक्त केले. वाल्हे (ता. पुरंदर ) येथील मुस्लिम बांधवांना माजी आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण संस्थेच्या वतीने दीपावलीनिमित्त फराळाचे वाटप विजय भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भालेराव पुढे म्हणाले, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी संजय जगताप यांनी परंपरेनुसार पुरंदर हवेलीतील मुस्लिम समाजासह कुंभारवळण येथील सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदनात तसेच दुःखद घटना घडलेल्या आणि इतर गरीब कुटुंबापर्यंत दिवाळीचा फराळ पोहोचवविण्याचे काम सुरू केल्याने जवळपास साडेतीन हजार कुटुंबाची दिवाळी गोड होणार आहे.तर संस्थेचे सदस्य मोहन शिंदे यांसह मोबीन बागवान यां...