मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका!

मुंबई प्रतिनीधी :(सतिश वि.पाटील) प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर मतदार याद्या विभाजित केल्या जातील. १ जुलैपर्यंत मतदार यादीत जे नाव असेल ते गृहीत धरून मतदार निश्चित होतील असं राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यात राज्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. आगामी निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत निवडणूकपूर्व तयारीची माहिती दिली.  राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, ४ महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यानुसार मनपा, जिल्हा परिषद, नगरपालिका अशा सर्व निवडणुकांचा कार्यक्रम टप्प्याटप्याने घेण्यात येईल. नाशिकमध्ये ५...
अलीकडील पोस्ट

नेता असावा तर असा.शेतकऱ्यांनी मागणी करताच काही काही तासातच ट्रान्सफॉर्मर हजर

सरडेवाडी  :-विठ्ठल महाडिक म्हणजे. दिलेला शब्द पाळणारा नेता सरडेवाडी येथील शेतकऱ्यांनी मागणी करताच काही काही तासातच ट्रान्सफॉर्मर (डि पी) बसविला शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. दि.६/९/००२५रोजी. ट्रान्सफॉर्मर जळाला होता. शेतकऱ्यांनी वरिष्ठांना तक्रार करूनही काही उपयोग झाला नाही. शिवनेरी नगर, गायकवाड वस्ती,जाधव वस्ती, देवकाते वस्ती ऐकाड वस्ती,येथील शेतकरी व घरगुती ग्राहक हैराण झाले होते.विठ्ठल महाडिक साहेब यांना कळताच काही तासातच ट्रान्सफॉर्मर डि पी बसला.एक पैसाही न खर्च करता डि पी बसविला त्या मुळे गणेश गायकवाड, सुरेश ऐकाड, सागर गायकवाड, दादा राऊत, सोमनाथ देवकाते,आल्हाबक्ष पठाण,सागर विटकर यांनी दत्ता मामा भरणे विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक साहेब यांचे आभार मानले.

महा किड्सची वैष्णवी कर्चे बुद्धिबळामध्ये तालुक्यात प्रथम

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ  सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत नातेपुते येथील महा किड्स सी.बी.एस.ई स्कूल मधील इयत्ता ६ वी मधील विद्यार्थिनी कु.वैष्णवी रवींद्र कर्चे हिने १४ वर्षीय मुलींच्या वयोगटातून तालुका पातळीवर दिमाखदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकविला आहे. यावेळी स्पर्धा स्विस पद्धतीने वयोगट १४ तसेच १७ आणि १९ मध्ये घेतल्या गेल्या. या स्पर्धेत वैष्णवी कचरे हिने एकूण ५ पैकी ४ मॅच जिंकत ३८.२६. पॉईंट्स मिळविल्याने तिची निवड जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.  यावेळी संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक अँड.शिवशंकर पांढरे यांनी तिचा सन्मान केला. याप्रसंगी संस्थेच्या कॉर्डिनेटर विद्या घोगरे क्रीडा शिक्षक रणजित मोहिते व कोमल रणदिवे उपस्थित होते.

*अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि सीएससीमध्ये सामंजस्य करार*

* आता लाभार्थ्यांना महामंडळाच्या सेवा सीएससीमध्ये माफक दरात मिळणार * पुणे, दि.१०: (जिमाका वृत्तसेवा): अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना सामान्य सेवा केंद्रामार्फत (सीएससी) महामंडळाच्या योजनांचा लाभ माफक दरात देण्याबाबत व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख व सीएससीचे प्रमुख वैभव देशपांडे यांच्या उपस्थितीत महामंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयामध्ये सामजस्य करार करण्यात आला.  सीएससी हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध सरकारी आणि खासगी सेवा पुरवण्याचे महत्वाचे माध्यम आहे, या करारानुसार लाभार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या सीएससी केंद्रावर महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, योजनेची सद्यस्थिती तपासणे आणि आवश्यक मार्गदर्शन मिळवणे यांसारख्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या करारामुळे लाभार्थ्यांचा वेळ आणि खर्चामध्ये बचत होणार आहे. येत्या काळात लाभार्थ्याकरिता मोबाईल अॅप व चॅट बॉट सारख्या सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नवीन उपक्रमामुळे महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रियाअधिक सोपी, पारदर्शक आणि कि...

कै.शिवाजीराव जामदार यांचे दुखःद निधन

 इंदापूर येथील कै.शिवाजीराव गोविंद जामदार, यांचेअल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले त्यांचे वय 85,वर्ष होते,त्यांचे पश्चात्ताप पत्नी दोन मुले एक मुलगी, सुना नातवंडे आसा परीवार होता,सामाजिक कार्यकर्ते बापूराव जामदार यांचे ते थोरले बंधु होते,त्यांच्या जाण्याने इंदापूरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

डाॅ.सुश्रुत शहा व सहकाऱ्यांचा डास निर्मुलनाचा बिजवडी पॅटर्न संपूर्ण राज्यात गेला - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

इंदापूर, तालुका प्रतिनिधी, डॉ. संदेश शहा. प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत शहा व सहकाऱ्यांचा डास निर्मुलनाचा बिजवडी पॅटर्न संपूर्ण राज्यात गेला. त्याचे कौतुक राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटवार यांनी केले. या आरोग्य केंद्राने १०० दिवसात लक्षवेधी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले. त्याची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेवून या केंद्राचे विशेष पत्रा व्दारे अभिनंदन केले. त्यामुळे इंदापूर तालुक्याचा नावलौकिक संपूर्ण राज्यात झाला. याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांना आहे असे प्रतिपादन  कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.  आरोग्य केंद्र बिजवडी, काटी आणि शेळगावच्या २०० कर्मचाऱ्यांच्या यशोगाथेचा आयुष्मान आरोग्यदूत गौरव सोहळा इंदापूर येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवन मध्ये संपन्न झाला. तत्पूर्वी समाजभूषण शरदकुमार माणिकचंद शहा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून निमगाव केतकी येथील आरोग्य उपकेंद्राच्या नूतन सुशोभीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन देखील मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवीण डोंगरे, देवराज जाध...

*महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा संविधानविरोधी* — ॲड. राहुल मखरे

इंदापूर : प्रतिनिधी           महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा संविधान विरोधी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस ॲड. राहुल मखरे यांनी केले.    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या निषेधार्थ इंदापूर नगरपरिषदेच्या प्रांगणात आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.       पुढे बोलताना ते म्हणाले की, जनसुरक्षा कायदा हा संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारांचे हनन करणारा कायदा आहे. मुलभूत अधिकारांवर गदा आणणारा कायदा संसदेत एकमताने जरी मंजूर झाला तरी सुप्रीम कोर्ट त्या कायद्याला मान्यता देत नाही. कारण लोकशाहीत लोकांच्या स्वातंत्र्याला प्राधान्य असते. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यास मारक असलेला महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा संविधान विरोधी असल्याने त्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला तसेच महायुती सरकारने हा कायदा मागे घ्यावा अशी ही मागणी त्यांनी केली.        राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य अमोल ...