मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याकडून शेतकरी हितास सर्वोच्च प्राधान्य-हर्षवर्धन पाटील

- उच्चांकी रु. 3350 दराबद्दल हर्षवर्धन पाटील व बाबुराव बोत्रे पाटील यांचा सत्कार इंदापूर : प्रतिनिधी दि.12/12/25                                       कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टीलरी लि.कडून शेतकरी हितास सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. परिणामी, चालू गळीत हंगामामध्ये उच्चांकी रु. 3350 प्रति टन दर जाहीर करण्यात आला आहे. आता कारखान्याचा अडचणीचा काळ संपला असून, आगामी काळात कारखाना प्रत्येक वर्षी उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम राखेल, असे गौरवोद्गार कारखान्याचे अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि. 11) काढले.            महात्मा फुलेनगर (बिजवडी) ता. इंदापूर  येथे कारखाना कार्यस्थळावर आयोजित शेतकरी सभासद सुसंवाद कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी उच्चांकी ऊस दर रु. 3350 दिलेबद्दल कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व ओंक...
अलीकडील पोस्ट

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब : जयंती विशेष

(दि. १२ डिसेंबर २०२५)*   आज दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री , गृहमंत्री, समाजभूषण, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.  सामान्य कार्यकर्त्यांपासून राजकारणाच्या सर्वोच्च पदापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला. विदर्भ–मराठवाडा–महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा आवाज म्हणून ते नेहमीच ओळखले गेले. गोपीनाथ मुंडे साहेबांचे व्यक्तिमत्त्व जमिनीवरचे नेतृत्व, निर्णयक्षम वृत्ती, कार्यकर्त्यांशी जिव्हाळा आणि निर्धार यासाठी प्रसिद्ध होते. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, विद्यार्थी, महिलांचे प्रश्न त्यांनी सदैव अग्रक्रमाने हाताळले. जनता दरबार, घरदार मोहीम, साखळी उपोषणे अशा माध्यमातून त्यांनी जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला. ऊसतोड कामगारांच्या हालअपेष्टा आणि स्थलांतरित जीवनाची वेदना ओळखून त्यासाठी ठामपणे लढणारे नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे. साखर पट्ट्यातील हजारो कामगारांचा आवाज बनवून त्यांनी मजूर दर, सुरक्षा, आरोग्य आणि सामाजिक संरक्षणासाठी सातत्याने संघर्ष केला. वंचितांची बाजू घेणारा नेता म्हणून ऊसतोड कामगार आणि गोप...

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचा रु. 3350 प्रमाणे ऊस दर - हर्षवर्धन पाटील -शेतकरी हितास सर्वोच्च प्राधान्य

इंदापूर : प्रतिनिधी दि.8/12/25 महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व सहयोग मा.बाबुराव बोत्रे पाटील चेअरमन ओंकार शुगर अँड डिस्टिलरीने चालु सन 2025-26 च्या गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन रु. 3350 प्रमाणे उच्चांकी दर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिला हप्ता रु. 3200/- प्रमाणे असून, उर्वरित रु. 150 प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीला अदा केली जाईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना उत्कृष्टपणे चालू असून आज अखेर कारखान्याने 1,65,000 मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याच्या माध्यमातून व ओंकार शुगरचा सहयोगातून सहकार टिकविण्याचा हा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या सहयोगातून सहकारातील शेतकरी, कामगार टिकवण्याचे काम यशस्वीपणे केले जात आहे. ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांचे माध्यमातून प्रति टन रु. 3350 प्रमाणे उच्चांकी दर द...

दिव्यांगांच्या पदसुनिश्चितीसाठी तज्ज्ञ समितीची पुनर्रचना- सचिव तुकाराम मुंढे

* प्रक्रियेसाठी एकसमान कार्यपद्धती निश्चित *  मुंबई, दि. ०३ : दिव्यांग व्यक्तींना शासकीय, निमशासकीय सेवेत नियुक्ती आणि पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षणाचा कायदेशीर हक्क प्रभावीपणे मिळावा, यासाठी पदसुनिश्चिती प्रक्रियेसाठी एकसमान कार्यपद्धती (एसओपी) तयार केली आहे. पदसुनिश्चिती प्रक्रिया अधिक शास्त्रीय आणि पारदर्शक करण्याच्या हेतूने तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो दिव्यांग उमेदवारांसाठी रोजगार, सर्व स्तरांवर समान संधी सुनिश्चित होण्यास मदत होणार असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.     सचिव तुकाराम मुंढे म्हणाले, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पदसुनिश्चिती प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय, निमशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच स्वायत्त संस्था आणि महामंडळांमधील मंजूर पदांचा सखोल आढावा घेऊन दिव्यांग व्यक्ती कोणत्या पदांवर कार्यक्षमतेने काम करू शकतील, हे ओळखणे आता बंधनकारक राहणार आहे. प्रत्येक मंत्रालयीन विभागात यासाठी तज्ज्ञांचा...

*आदर्श शिक्षक श्री. नानासाहेब सानप सर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व* वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन

  (*५० व्या वाढदिवसाच्या/ सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!*) *इंदापूर*: ज्ञानाची दीपशिखा पेटवणारे, विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला घडवणारे,मूल्यांचे संस्कार रुजवणारे आदर्श शिक्षक जेव्हा अर्ध शतकाचा टप्पा गाठतात तेव्हा तो क्षण खरोखरच अभिमान आणि प्रेरणादायी ठरतो. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील एका खेडेगावात जन्मलेले सुपुत्र हे इंदापूर येथे सन १९९४ - ९५ या शैक्षणिक वर्षात इंदापूर येथील दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या भिमाई आश्रमशाळेत शिक्षकपदी रुजू झाले. गेली ३१ वर्षापासून अध्यापनाचे कार्य अतिशय प्रामाणिकपणे करत आहे. त्याचबरोबर त्यांचा सामाजिक सलोखा देखील वाखाणण्याजोगा आहे. शिव, फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारधारेने प्रेरित होऊन शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात स्वतः ला अविरतपणे झोकून दिले आहे. सानप सरांनी दिवंगत रत्नाकर (तात्या) मखरे, लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि संत भगवान बाबा यांना आदर्श मानून आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यास प्रारंभ केला.सामाजिक बांधिलकी जपणारे सानप सर यांनी आपल्या वर्तणुकीतून व कार्यातून जनमानसात आपलं वेगळं स्थान निर्माण केल...

निरा भिमा करखान्याचे 7 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी सहकार्य करावे -हर्षवर्धन पाटील यांचे आवाहन

• संस्थापक हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांचा रु. 3101 उच्चांकी उचलीबद्दल सत्कार  इंदापूर :                                  नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन 2025-26 च्या रौप्यमहोत्सव गळीत हंगामामध्ये प्रति टन रु. 3101 प्रमाणे उच्चांकी उचल ही विना कपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शुक्रवारी जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अधिकच्या ऊस दरासाठी चालू हंगामामध्ये 7 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी आवाहन कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि. 5) केले.          शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे नीरा भीमा कारखाना कार्यस्थळावर शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रमांमध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी कारखान्याच्या इतिहासामध्ये प्रथमच उच्चांकी अशी प्रति टन रु. 3101 प्रमाणे उचल जाहीर केलेबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त ...

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...