मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शालेय शिक्षण विभागाच्या नूतनीकृत बालभवन इमारतीचे लोकार्पण व कोनशिला अनावरण.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज मुंबई येथे शालेय शिक्षण विभागाच्या नूतनीकृत बालभवन इमारतीचे अनावरण केले. याप्रसंगी त्यांनी इमारतीमधील प्रेक्षागृह, ग्रंथालय, संगीत कक्ष, नाटक कक्ष, बहुउद्देशीय सभागृह व कार्यालयाची पाहणी केली. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दादाजी भुसे, आमदार दिपक केसरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

पुणे शहरात १४ दिवसांसाठी जमावबंदी.

मुंबई प्रतिनिधी  :(सतिश पाटील ) पुणे शहरात पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असतानाच, प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. पुणे शहरात उद्या (मंगळवारी) रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी 'जमावबंदीचे आदेश' लागू करण्यात आले आहेत. या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने आणि सभा घेण्यास प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे. सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करण्यात आला आहे. जमावबंदी हा सर्वात जास्त वापरले जाणारे उपकलम आहे. मोर्चे, मिरवणुका, सभा बंद करता येतात. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी लोकांच्या जमावावर निर्बंध घातले जातात हा आदेश साधारणत १५ दिवसांपर्यंत लागू राहू शकतो; पुढे वाढवण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी लागते. कोणत्या गोष्टीवर बंदी? सध्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात राजकीय संघटना आणि सामाजिक संघटनांकडे आंदोलन करण्यात येते त्या पार्श्वभूमीवर आदेश काढलेत का? असा प्रश्न वि...

अपघातातील जखमीचा जीव वाचवून 'दाळज' वाहतूक पोलिसांची माणुसकी; नागरिकांकडून कौतुक

इंदापूर असिफभाई शेख  इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोल नाक्याजवळ, संगम हॉटेलसमोर झालेल्या एका भीषण मोटारसायकल अपघातात, दालज वाहतूक पोलीस विभागाने समयसूचकता आणि तत्परता दाखवत एका जखमी व्यक्तीचा जीव वाचवला आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.सरडेवाडी टोल नाक्याजवळ मोटारसायकलचा अपघात झाल्याची माहिती मिळताच, दालज वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले. अपघात स्थळी झालेली गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता, पोलिसांनी सर्वप्रथम वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर, कोणतीही वेळ न घालवता टोल प्रशासनाच्या रुग्णवाहिकेला तातडीने पाचारण केले आणि जखमी व्यक्तीला उपचारासाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.अपघातानंतर दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि माणुसकीच्या या कार्याबद्दल खालील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक होत आहे. ए.एस.आय. भानुदास बंडगर, ए.एस.आय. ए.एस आय सतिश हिरवे,सचिन वाघ, ए.एस.आय. देविदास ढोले, हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड, हेड कॉन्स्टेबल शशिकांत खाडे  नागरिकांकडून पोलिसांचे अभिनंदन  पोलिसांच्या या तत्परत...

अवकाळी चक्रीवादळ पावसामुळे टाकळी हाजी परिसरात शेतीचे मोठे नुकसान; सरपंच दामू अण्णा घोडे यांची पंचनाम्यासाठी धाव

टाकळी हाजी: टाकळी हाजी, होणेवाडी, साळवेंद, घोडे वस्ती, थोरात वस्ती, भैरवनाथ वाडी आणि भाकरीवाडी या परिसरात आज झालेल्या अचानक अवकाळी चक्रीवादळ पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या वादळी पावसामुळे डाळिंब, केळी आणि आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. तसेच काही ठिकाणी गाईंचे गोठेही उद्ध्वस्त झाले आहेत. ## सरपंचांकडून तातडीने पाहणी आणि सूचना नुकसानीची माहिती मिळताच टाकळी हाजी गावचे आदर्श सरपंच श्री. दामू अण्णा घोडे यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार साहेब, सर्कल भाऊसाहेब आणि तलाठी दादा यांच्याशी दूरध्वनीवरून त्वरित संपर्क साधला. त्यांनी अधिकाऱ्यांना या भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ## शेतकऱ्यांना आवाहन सरपंचांनी परिसरातील सर्व प्रभावित शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या झालेल्या नुकसानीचे फोटो पंचनाम्यासाठी काढून सुरक्षित ठेवावेत, जेणेकरून शासनाकडून योग्य ती मदत मिळण्यास मदत होईल.

इंदापूर तालुक्यात वीज वितरणचा सावळागोंधळ; रात्रीच्या ऐन वेळीच ६ ते १० लाईट गुल, शेतकरी अन् जनता हैराण! 'काय चाललंय राव..!

इंदापूर: "काय चाललंय राव या तालुक्यात?" असा संतप्त सवाल सध्या इंदापूर तालुक्यातील प्रत्येक नागरिक आणि शेतकरी महावितरणला विचारत आहे. दिवसभराच्या कष्टाने दमून-भागून घरी आलेल्या जनतेला आणि पिकांना पाणी देण्याच्या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीच महावितरणकडून 'अंधाराचा शॉक' दिला जात आहे. रोज रात्री ठीक ६ ते १० या ऐन गर्दीच्या आणि गरजेच्या वेळीच वीज गायब होत असल्याने संपूर्ण इंदापूर तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे डिजिटल इंडिया आणि २४ तास विजेच्या गप्पा मारल्या जातात, तर दुसरीकडे इंदापूर तालुक्याला मात्र जाणीवपूर्वक अंधारात ढकलले जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रात्री ६ ते १० ही वेळ गृहिणींसाठी स्वयंपाकाची, मुलांसाठी अभ्यासाची आणि व्यापाऱ्यांसाठी धंद्याची असते. नेमक्या याच ४ तासांत वीज गुल करून महावितरणने जनतेचे जगणे असह्य केले आहे."रात्रीच्या वेळी साप-विंचवाचा धोका पत्करून शेतकरी शेतात जातो, पण तिथे गेल्यावर लाईट गायब असते. पिके जळून चाललीत आणि अधिकारी एसी केबिनमध्ये बसून फक्त कारणे सांगत आहेत,"** अशी संतप्त...

इंदापूर नगर परिषद द्वारा शहर स्वच्छता और जन-जागरूकता अभियान का भव्य शुभारंभ

 इंदापूर नगर परिषद की अनूठी और महत्वाकांक्षी पहल के तहत शहर में व्यापक स्वच्छता और जन-जागरूकता अभियान की अत्यंत उत्साहपूर्ण माहौल में शुरुआत की गई है। इस विशेष अभियान का औपचारिक प्रारंभ प्रभाग क्रमांक 5 के अंतर्गत आने वाले अंबिका नगर परिसर स्थित ऐतिहासिक महादेव मंदिर से किया गया। इस बहुआयामी अभियान का मुख्य उद्देश्य न केवल शहर को कचरा-मुक्त बनाना है, बल्कि आम नागरिकों की मानसिकता में सकारात्मक बदलाव लाकर उन्हें 'स्वच्छ भारत अभियान' की मुख्यधारा से जोड़ना भी है !इस स्वच्छता और जन-जागरूकता अभियान के तहतविभिन्न गतिविधियों और रणनीतियों को धरातल पर उतारा गया, जो इस प्रकार हैं: १. सघन कचरा संग्रहण एवं परिसर स्वच्छताअभियान के पहले ही दिन अंबिका नगर और उसके आसपास के रिहायशी व व्यावसायिक क्षेत्रों में व्यापक सफाई अभियान चलाया गया। परिसर के खुले भूखंडों (ओपन प्लॉट्स) और सड़कों के किनारे लंबे समय से जमा हुए कचरे, प्लास्टिक और मलबे को पूरी तरह से हटाकर डंपिंग ग्राउंड तक पहुंचाया गया। नगर परिषद की स्वच्छता टीमों ने आधुनिक उपकरणों और वाहनों की मदद से पूरे परिसर को पूरी तरह स्वच्छ...

इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने शहर स्वच्छता आणि जनजागृती अभियानाचा शुभारंभ

इंदापूर नगरपरिषदेच्या पुढाकाराने शहरात स्वच्छता आणि जनजागृती मोहिमेची उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ५ मधील अंबिका नगर परिसरातील महादेव मंदिर येथून या अभियानाचा प्रारंभ झाला. या मोहिमेचे प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत कचरा संकलन व स्वच्छता: अभियानांतर्गत अंबिका नगर परिसरातील मोकळ्या जागेत साचलेला कचरा गोळा करून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.आयोजक व मार्गदर्शक: या मोहिमेचे आयोजन नगराध्यक्ष भरतभाऊ शेठ शहा, प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक अक्षय सूर्यवंशी आणि नगरसेविका दिप्ती राऊत यांच्या पुढाकारातून करण्यात आले. प्रमुख उपस्थिती: मोहिमेत उपनगराध्यक्ष शैलेश पवार, नगरसेवक उमेश मखरे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील राऊत, भारत नाना शिंदे, अमर नलावडे, अजिंक्य भैय्या जावीर, माजी नगरसेवक जावेद भाई शेख आणि नगरपरिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.* पथनाट्याद्वारे जनजागृती: नागरिकांमध्ये स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्यासाठी आर्यमान गानबोटे आणि बालकलाकार ओम कारंडे यांच्या 'संकल्प' पथनाट्य टीमने 'स्वच्छ परिसर, सुंदर इंदापूर' या विषयावर प्रभावी कलावि...